शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पेन्शनअभावी नौसैैनिक त्रस्त, न्यायालयाचे आदेश : सरकारचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 01:22 IST

उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी युद्दात सहभागी असलेल्या नौसैैनिकांना पेन्शन देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकारने ५३० सैनिक पात्र ठरवले आहेत, तर सुमारे तीन हजार सैैनिकांना अपात्र ठरवले आहे

पिंपरी : १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील अनेक नौसैैनिकांना अद्याप पेन्शन मिळाली नाही. उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही सरकारकडून त्याची अमंलबजावणी होत नसल्याचा आरोप निवृत्त नेव्ही पोलीस प्रकाशचंद्र तेलंग यांनी केला आहे.

उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी युद्दात सहभागी असलेल्या नौसैैनिकांना पेन्शन देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकारने ५३० सैनिक पात्र ठरवले आहेत, तर सुमारे तीन हजार सैैनिकांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे देशाच्या संरक्षणासाठी सैैन्यात सामील झालेल्या सैैनिकांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत. १९७१ च्या युद्दावेळी नवीन सैैनिकांची नेव्हीमध्ये भरती करण्यात आली. त्या वेळी दहा अधिक दहा या नियमाने सैैनिकांची भरती केली. म्हणजेच दहा वर्ष नोकरी व दहा वर्ष रिझर्व्ह सर्व्हिस या नियमाने सैैनिकांची भरती करण्यात आली. मंत्रालयातील नेव्ही विभागाने सैैनिकांबरोबर करार केला होता. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारकडून या सैैनिकांना पेन्शन देणे बंधनकारक होते. मात्र सैैनिकांबरोबर जो करार झाला होता तो सरकारने परस्पर रद्द केल्यामुळे हे नौसैैनिक पेन्शनसाठी अपात्र ठरत आहेत. ठरलेल्या १० अधिक १० या नियमाऐवजी युद्धानंतर या सैैनिकांकडून संमतीपूर्वक नोकरी सोडण्याचे पत्रक घेण्यात आले. त्याचाच आधार घेऊन सुरक्षा मंत्रालय पेन्शन देण्यास नकार देत आहे. १९७१ च्या युद्दावेळी नवीन सैैनिकांची नेव्हीमध्ये भरती करण्यात आली. त्या वेळी दहा अधिक दहा या नियमाने सैैनिकांची भरती केली. म्हणजेच दहा वर्ष नोकरी व दहा वर्ष रिझर्व्ह सर्व्हिस या नियमाने सैैनिकांची भरती करण्यात आली होती, असेही नौसैैनिकांनी सांगितले.न्यायालयाचे आदेश : सरकारचे दुर्लक्षगेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पेन्शनपासून वंचित आहोत. मात्र याची दखल कुठलेच प्रशासन घेत नाही. न्यायालयाने पेन्शन देण्याचे आदेश दिल्यानंतरही आम्हाला सरकारकडून पेन्शन नाकारली जात आहे.- उल्हास सुर्वे, सेवानिवृत्त सीमन

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय