शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पेन्शनअभावी नौसैैनिक त्रस्त, न्यायालयाचे आदेश : सरकारचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 01:22 IST

उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी युद्दात सहभागी असलेल्या नौसैैनिकांना पेन्शन देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकारने ५३० सैनिक पात्र ठरवले आहेत, तर सुमारे तीन हजार सैैनिकांना अपात्र ठरवले आहे

पिंपरी : १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील अनेक नौसैैनिकांना अद्याप पेन्शन मिळाली नाही. उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही सरकारकडून त्याची अमंलबजावणी होत नसल्याचा आरोप निवृत्त नेव्ही पोलीस प्रकाशचंद्र तेलंग यांनी केला आहे.

उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी युद्दात सहभागी असलेल्या नौसैैनिकांना पेन्शन देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकारने ५३० सैनिक पात्र ठरवले आहेत, तर सुमारे तीन हजार सैैनिकांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे देशाच्या संरक्षणासाठी सैैन्यात सामील झालेल्या सैैनिकांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत. १९७१ च्या युद्दावेळी नवीन सैैनिकांची नेव्हीमध्ये भरती करण्यात आली. त्या वेळी दहा अधिक दहा या नियमाने सैैनिकांची भरती केली. म्हणजेच दहा वर्ष नोकरी व दहा वर्ष रिझर्व्ह सर्व्हिस या नियमाने सैैनिकांची भरती करण्यात आली. मंत्रालयातील नेव्ही विभागाने सैैनिकांबरोबर करार केला होता. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारकडून या सैैनिकांना पेन्शन देणे बंधनकारक होते. मात्र सैैनिकांबरोबर जो करार झाला होता तो सरकारने परस्पर रद्द केल्यामुळे हे नौसैैनिक पेन्शनसाठी अपात्र ठरत आहेत. ठरलेल्या १० अधिक १० या नियमाऐवजी युद्धानंतर या सैैनिकांकडून संमतीपूर्वक नोकरी सोडण्याचे पत्रक घेण्यात आले. त्याचाच आधार घेऊन सुरक्षा मंत्रालय पेन्शन देण्यास नकार देत आहे. १९७१ च्या युद्दावेळी नवीन सैैनिकांची नेव्हीमध्ये भरती करण्यात आली. त्या वेळी दहा अधिक दहा या नियमाने सैैनिकांची भरती केली. म्हणजेच दहा वर्ष नोकरी व दहा वर्ष रिझर्व्ह सर्व्हिस या नियमाने सैैनिकांची भरती करण्यात आली होती, असेही नौसैैनिकांनी सांगितले.न्यायालयाचे आदेश : सरकारचे दुर्लक्षगेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पेन्शनपासून वंचित आहोत. मात्र याची दखल कुठलेच प्रशासन घेत नाही. न्यायालयाने पेन्शन देण्याचे आदेश दिल्यानंतरही आम्हाला सरकारकडून पेन्शन नाकारली जात आहे.- उल्हास सुर्वे, सेवानिवृत्त सीमन

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय