शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

पुढचा अतिरेकी हल्लाही समुद्रमार्गेच होण्याचा धोका - दत्तात्रय शेकटकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 03:17 IST

दत्तात्रय शेकटकर : अतिरेकी संहारक अस्त्रे वापरू शकतात

मुंबई : मुंबईवर २६/११चा हल्ला समुद्रमार्गे झाला, तशाच प्रकारच्या हल्ल्याचा धोका भविष्यातही आहे. मात्र, पुढच्या वेळी अतिरेकी किनारपट्टीवर न उतरता दूर समुद्रातूनच क्षेपणास्त्रासारखी अधिक संहारक अस्त्रे वापरून हल्ला करू शकतात; आणि हा हल्ला २६/११ पेक्षाही अधिक संहारक असू शकेल, अशी भीती केंद्राच्या लष्करी आधुनिकीकरण समितीचे प्रमुख, निवृत्त लेफ्ट. जनरल डी. बी. शेकटकर यांनी व्यक्त केली.

माजी केंद्रीय अप्पर गृहसचिव आर. व्ही. एस. मणी यांनी लिहिलेल्या आणि अरुण करमरकर यांनी अनुवादित केलेल्या ‘हिंदू दहशतवाद एक थोतांड’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी शेकटकर यांच्या हस्ते करण्यात आले. २६/११ च्या हल्ल्याला १० वर्षे झाल्यानिमित्त या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलेल्या मुंबईतील ताजमहाल या हॉटेलातच हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यात स्थानिकांचाही सहभाग असल्याची कबुली अजमल कसाब याने चौकशीदरम्यान दिली होती. त्याच्या या जबाबाची माहिती तपास यंत्रणांनी तत्कालीन सरकारलाही दिली. मात्र, पुढे जाणीवपूर्वक हा विषय बाजूला सारण्यात आला. हिंदू दहशतवाद म्हणून जे थोतांड उभारण्यात आले, त्याचा सर्वाधिक फटका मराठी तरुणांना बसला. महाराष्ट्राला हिंदू दहशतवादाची प्रयोगशाळा म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असे मूळ इंग्रजी पुस्तकाचे लेखक मणी यांनी या वेळी सांगितले.

दहशतवादाला कोणताही धर्म, रंग नसतो. मात्र, त्याला धार्मिक रंग दिल्यामुळे देशाच्या भावी पिढ्यांची अपरिमित हानी होत आहे. भारतीयांची एकंदर लोकसंख्या पाहता, सध्या जगातील प्रत्येक सहावी व्यक्ती भारतीय किंवा भारतीय वंशाची आहे, अशा वेळी दहशतवादाला धार्मिक लेबले लावल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलू शकतो, असे मत शेकटकर यांनी वेळी व्यक्त केले. या वेळी व्यासपीठावर आर. व्ही. एस. मणी, अरुण करमरकर, पत्रकार मकरंद मुळ्ये आदी मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :MumbaiमुंबईTerror Attackदहशतवादी हल्ला