शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

पुढचा अतिरेकी हल्लाही समुद्रमार्गेच होण्याचा धोका - दत्तात्रय शेकटकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 03:17 IST

दत्तात्रय शेकटकर : अतिरेकी संहारक अस्त्रे वापरू शकतात

मुंबई : मुंबईवर २६/११चा हल्ला समुद्रमार्गे झाला, तशाच प्रकारच्या हल्ल्याचा धोका भविष्यातही आहे. मात्र, पुढच्या वेळी अतिरेकी किनारपट्टीवर न उतरता दूर समुद्रातूनच क्षेपणास्त्रासारखी अधिक संहारक अस्त्रे वापरून हल्ला करू शकतात; आणि हा हल्ला २६/११ पेक्षाही अधिक संहारक असू शकेल, अशी भीती केंद्राच्या लष्करी आधुनिकीकरण समितीचे प्रमुख, निवृत्त लेफ्ट. जनरल डी. बी. शेकटकर यांनी व्यक्त केली.

माजी केंद्रीय अप्पर गृहसचिव आर. व्ही. एस. मणी यांनी लिहिलेल्या आणि अरुण करमरकर यांनी अनुवादित केलेल्या ‘हिंदू दहशतवाद एक थोतांड’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी शेकटकर यांच्या हस्ते करण्यात आले. २६/११ च्या हल्ल्याला १० वर्षे झाल्यानिमित्त या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलेल्या मुंबईतील ताजमहाल या हॉटेलातच हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यात स्थानिकांचाही सहभाग असल्याची कबुली अजमल कसाब याने चौकशीदरम्यान दिली होती. त्याच्या या जबाबाची माहिती तपास यंत्रणांनी तत्कालीन सरकारलाही दिली. मात्र, पुढे जाणीवपूर्वक हा विषय बाजूला सारण्यात आला. हिंदू दहशतवाद म्हणून जे थोतांड उभारण्यात आले, त्याचा सर्वाधिक फटका मराठी तरुणांना बसला. महाराष्ट्राला हिंदू दहशतवादाची प्रयोगशाळा म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असे मूळ इंग्रजी पुस्तकाचे लेखक मणी यांनी या वेळी सांगितले.

दहशतवादाला कोणताही धर्म, रंग नसतो. मात्र, त्याला धार्मिक रंग दिल्यामुळे देशाच्या भावी पिढ्यांची अपरिमित हानी होत आहे. भारतीयांची एकंदर लोकसंख्या पाहता, सध्या जगातील प्रत्येक सहावी व्यक्ती भारतीय किंवा भारतीय वंशाची आहे, अशा वेळी दहशतवादाला धार्मिक लेबले लावल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलू शकतो, असे मत शेकटकर यांनी वेळी व्यक्त केले. या वेळी व्यासपीठावर आर. व्ही. एस. मणी, अरुण करमरकर, पत्रकार मकरंद मुळ्ये आदी मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :MumbaiमुंबईTerror Attackदहशतवादी हल्ला