शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

पुढचा गळीत हंगाम अडचणीचा, आगामी गळीत कार्यक्रमाची आखणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 05:10 IST

पुणे : राज्यासह देशात उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाल्याने, पुढील वर्षी विक्रमी ऊस उत्पादन होऊन गळीत हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे.

पुणे : राज्यासह देशात उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाल्याने, पुढील वर्षी विक्रमी ऊस उत्पादन होऊन गळीत हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी आतापासूनच तयारीला लागणे आवश्यक असून, पुढील गळीत कार्यक्रमाची आखणी करावी, अशी सूचना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मंगळवारी येथे केली.मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) ४१व्या विशेष सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, कलाप्पा आवाडे, शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव नागवडे या वेळी उपस्थित होते.पवार म्हणाले, देशात सर्वच ठिकाणी उसाचे क्षेत्र वाढले असल्याने, काळजी करण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फटका पुढील गळीत हंगामाला होईल. त्यामुळे आत्तापासूनच पुढच्या गळीत हंगामाची तयारी करावी. कदाचित पुढील हंगामात कारखाने लवकर सुरू करावे लागतील. तसे न केल्यास कारखाने जूनपर्यंत चालू ठेवावे लागतील. परिणामी, साखरेच्या उताºयात घट होईल. त्यामुळे ऊस उत्पादकांना उसाची योग्य किंमत देताना कारखान्यांना कसरत करावी लागेल.उसाचे उत्पादन वाढल्यास इथेनॉल करण्याची शिफारस अनेकांनी केली आहे. ब्राझिलसारख्या देशात थेट उसाच्या रसापासून इथेनॉल तयार केला जातो. ती पद्धत भारतासाठी सध्या अनुकुल नाही. ही पद्धत अधिक खर्चिक असल्याचे प्रयोगावरुन लक्षात आले आहे. त्यामुळे कारखान्यांनी मोलॅसिस साठवून, पुढे त्याचा वापर इथेनॉलसाठी करावा. त्याचबरोबर खर्चात काटकसर करावी, साखरेच्या उत्पादनखर्चात कपात कशी होईल याचे नियोजन केले पाहिजे, असे पवार या वेळी म्हणाले.साखर कारखानदारी अडचणीत असताना या पूर्वी राज्यासह केंद्र सरकारने देखील मदतीची भूमिका घेतली आहे. सध्याच्या सरकारची तशी भूमिका असल्याचे वाटत नाही. साखर कारखानदारी हा व्यवसाय असून, त्यातील तोटा आणि नफा हा त्या उद्योगांनी पाहावा, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. त्यामुळे हे लक्षात घेऊनच अपल्याला उद्योगाचे नियोजन करावे लागेल. पुढील हंगामात ज्या ठिकाणी ऊस तुलनेने कमी असेल, त्यांनी जास्तीचा ऊस असणाºया भागातील उत्पादकांशी करार करावेत, असा सल्लाही पवार यांनी दिला.>ऊस आणि साखर उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ आणि विविध साखर कारखान्यांना वसंतदादा साखर संस्थेच्या वतीने संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंगळवारी (ता.२६) संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी राज्यातील सर्वाेत्कृष्ट कै. वसंतदादा पाटील सोनहिरा (वांगी, ता.कडेगाव, जि. सांगली) या कारखान्याला प्रदान करण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवार