शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

नवी वाहने दोन वर्षे धावू शकणार, योग्यता प्रमाणपत्राची नाही गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 02:14 IST

नवीन प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची योग्यता प्रमाणपत्रातून सुटका झाली आहे. ही वाहने योग्यता प्रमाणपत्राशिवाय दोन वर्षांपर्यंत रस्त्यावर धावू शकतील.

पुणे : नवीन प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची योग्यता प्रमाणपत्रातून सुटका झाली आहे. ही वाहने योग्यता प्रमाणपत्राशिवाय दोन वर्षांपर्यंत रस्त्यावर धावू शकतील. याबाबतच्या सूचना परिवहन आयुक्त कार्यालयाने दिल्या आहेत.केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात सर्व नवीन माल व प्रवासी वाहनांना ब्रेक टेस्ट ट्रॅकवर घेणे बंधनकारक करण्यात आले होते. या तपासणीनंतरच संबंधित वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे आरटीओवरील कामाचा ताणही वाढला होता. मनुष्यबळाअभावी तपासणी विलंब होत असल्याने नवीन वाहने मार्गावर येण्यासाठी खूप दिवस लागत होते. त्यामुळे ही वाहने अनेक दिवस जागेवर उभी करावी लागत होती. वाहतूकदारांनी केलेल्या विरोधानंतर केंद्र सरकारने दि. २ नोव्हेंबर रोजी दोन वर्षांपर्यंत वाहनांना योग्यता प्रमाणपत्रातून सूट देण्याची अधिसूचना काढली; पण दोन महिने होत आले, तरी परिवहन विभागाकडून अंमलबजावणी केली जात नव्हती.नोंदणी दिनांकापासून २ वर्षांपेक्षा जास्त, परंतु ८ वर्षांपेक्षा कमी कालावधीतील वाहनांनाही दोन वर्षे कमी कालावधीतील वाहनांना दर दोन वर्षांनी, तर त्यानंतर दरवर्षी योग्यता प्रमाणपत्र बंधनकारक असेल.‘आरटीओ’ला दिलासापुणे आरटीओमधील मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या कार्यालयावर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. परिवहन विभागाच्या निर्णयामुळे आता नवीन वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याचा ताण कमी होणार आहे. त्यामुळे इतर कामांचा वेग वाढणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.केंद्र सरकारने एक महिन्यापूर्वी याबाबत आदेश काढूनही राज्य सरकारने आता आदेश काढला आहे. या कालावधीत घेतलेले शुल्क सरकार परत करणार का? आजही सॉफ्टवेअर राज्यातील आरटीओ कार्यालयात अद्ययावत नाहीत. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून नोंद झालेल्या वाहनांना या योजनेचा फायदा झालेला नाही.- बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य चालक-मालक वाहतूक संघटना

टॅग्स :Puneपुणे