शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

नवी वाहने दोन वर्षे धावू शकणार, योग्यता प्रमाणपत्राची नाही गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 02:14 IST

नवीन प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची योग्यता प्रमाणपत्रातून सुटका झाली आहे. ही वाहने योग्यता प्रमाणपत्राशिवाय दोन वर्षांपर्यंत रस्त्यावर धावू शकतील.

पुणे : नवीन प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची योग्यता प्रमाणपत्रातून सुटका झाली आहे. ही वाहने योग्यता प्रमाणपत्राशिवाय दोन वर्षांपर्यंत रस्त्यावर धावू शकतील. याबाबतच्या सूचना परिवहन आयुक्त कार्यालयाने दिल्या आहेत.केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात सर्व नवीन माल व प्रवासी वाहनांना ब्रेक टेस्ट ट्रॅकवर घेणे बंधनकारक करण्यात आले होते. या तपासणीनंतरच संबंधित वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे आरटीओवरील कामाचा ताणही वाढला होता. मनुष्यबळाअभावी तपासणी विलंब होत असल्याने नवीन वाहने मार्गावर येण्यासाठी खूप दिवस लागत होते. त्यामुळे ही वाहने अनेक दिवस जागेवर उभी करावी लागत होती. वाहतूकदारांनी केलेल्या विरोधानंतर केंद्र सरकारने दि. २ नोव्हेंबर रोजी दोन वर्षांपर्यंत वाहनांना योग्यता प्रमाणपत्रातून सूट देण्याची अधिसूचना काढली; पण दोन महिने होत आले, तरी परिवहन विभागाकडून अंमलबजावणी केली जात नव्हती.नोंदणी दिनांकापासून २ वर्षांपेक्षा जास्त, परंतु ८ वर्षांपेक्षा कमी कालावधीतील वाहनांनाही दोन वर्षे कमी कालावधीतील वाहनांना दर दोन वर्षांनी, तर त्यानंतर दरवर्षी योग्यता प्रमाणपत्र बंधनकारक असेल.‘आरटीओ’ला दिलासापुणे आरटीओमधील मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या कार्यालयावर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. परिवहन विभागाच्या निर्णयामुळे आता नवीन वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याचा ताण कमी होणार आहे. त्यामुळे इतर कामांचा वेग वाढणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.केंद्र सरकारने एक महिन्यापूर्वी याबाबत आदेश काढूनही राज्य सरकारने आता आदेश काढला आहे. या कालावधीत घेतलेले शुल्क सरकार परत करणार का? आजही सॉफ्टवेअर राज्यातील आरटीओ कार्यालयात अद्ययावत नाहीत. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून नोंद झालेल्या वाहनांना या योजनेचा फायदा झालेला नाही.- बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य चालक-मालक वाहतूक संघटना

टॅग्स :Puneपुणे