शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

नवी वाहने दोन वर्षे धावू शकणार, योग्यता प्रमाणपत्राची नाही गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 02:14 IST

नवीन प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची योग्यता प्रमाणपत्रातून सुटका झाली आहे. ही वाहने योग्यता प्रमाणपत्राशिवाय दोन वर्षांपर्यंत रस्त्यावर धावू शकतील.

पुणे : नवीन प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची योग्यता प्रमाणपत्रातून सुटका झाली आहे. ही वाहने योग्यता प्रमाणपत्राशिवाय दोन वर्षांपर्यंत रस्त्यावर धावू शकतील. याबाबतच्या सूचना परिवहन आयुक्त कार्यालयाने दिल्या आहेत.केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात सर्व नवीन माल व प्रवासी वाहनांना ब्रेक टेस्ट ट्रॅकवर घेणे बंधनकारक करण्यात आले होते. या तपासणीनंतरच संबंधित वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे आरटीओवरील कामाचा ताणही वाढला होता. मनुष्यबळाअभावी तपासणी विलंब होत असल्याने नवीन वाहने मार्गावर येण्यासाठी खूप दिवस लागत होते. त्यामुळे ही वाहने अनेक दिवस जागेवर उभी करावी लागत होती. वाहतूकदारांनी केलेल्या विरोधानंतर केंद्र सरकारने दि. २ नोव्हेंबर रोजी दोन वर्षांपर्यंत वाहनांना योग्यता प्रमाणपत्रातून सूट देण्याची अधिसूचना काढली; पण दोन महिने होत आले, तरी परिवहन विभागाकडून अंमलबजावणी केली जात नव्हती.नोंदणी दिनांकापासून २ वर्षांपेक्षा जास्त, परंतु ८ वर्षांपेक्षा कमी कालावधीतील वाहनांनाही दोन वर्षे कमी कालावधीतील वाहनांना दर दोन वर्षांनी, तर त्यानंतर दरवर्षी योग्यता प्रमाणपत्र बंधनकारक असेल.‘आरटीओ’ला दिलासापुणे आरटीओमधील मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या कार्यालयावर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. परिवहन विभागाच्या निर्णयामुळे आता नवीन वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याचा ताण कमी होणार आहे. त्यामुळे इतर कामांचा वेग वाढणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.केंद्र सरकारने एक महिन्यापूर्वी याबाबत आदेश काढूनही राज्य सरकारने आता आदेश काढला आहे. या कालावधीत घेतलेले शुल्क सरकार परत करणार का? आजही सॉफ्टवेअर राज्यातील आरटीओ कार्यालयात अद्ययावत नाहीत. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून नोंद झालेल्या वाहनांना या योजनेचा फायदा झालेला नाही.- बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य चालक-मालक वाहतूक संघटना

टॅग्स :Puneपुणे