शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

नवी राजवट ही काळजी करण्यासारखी: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव

By अजित घस्ते | Updated: July 18, 2023 22:20 IST

-अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट तर्फे भूषण पुरस्कार प्रदान सोहळा.

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : देश कोणाच्या नावाने चालक नाही तर भारतीय राज्यघटने प्रमाणे चालला पाहिजे. देशापुढे अनेक प्रश्न आहेत मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्त्री- पुरुष समानता, धर्मनिरपेक्ष,स्वातंत्र्य,समता, बधुंता हे सारखेच असे आपण म्हणतो. मात्र देशात सध्या भेदभाव करुन विषमता सुरु आहे. देशात देखील राजकीय जोरात भांडण सुरु आहे. तर सध्याची नवी राजवट ही काळजी करण्यासारखी आहे. त्यामुळे आता घरी बसून चालणार नाही त्यासाठी सर्वानी आपल्या न्याय हक्कासाठी एकजूट झाले पाहिजे असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव यांनी व्यक्त केले. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, अ‍ॅड.सुषमा अंधारे, बाळासाहेब अमराळे, वैशाली गाडगीळ, पराग गाडगीळ, अ‍ॅड. प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, सपना लालचंदानी, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव इ. उपस्थित होते.

यावेळी विविध कला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारीका क्षेत्रातील विविध मान्यवरांना भूषण पुरस्कार देऊन गौवरवण्यात आले. यामध्ये यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संचालक सौरभ गाडगीळ,  उद्योग भूषण पुरस्कार युवराज ढमाले, कला भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे, संगीत भूषण पुरस्कार कौशल इनामदार, धार्मिक भूषण पुरस्कार श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट शिरगावचे विश्वस्त प्रकाश देवळे आणि पत्रकारिता भूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे संपादक संजय आवटे यांना प्रदान करण्यात आला.

अ‍ॅड. सुषमा अंधारे म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री- पुरूष भेदभाव न करता घटनेत समानता दिली. महिलांनी पुढाकरा घ्यावा साठी विशेष प्रयत्न केले. प्रत्येक महिला आपल्या कुटुंबासाठी उर्जेचा स्त्रोत असते. कुटुंबाला उभे करण्यात महिलांचा मोठा वाटा असतो.प्रबळ इच्छाशक्ती असेल तर प्रतिकूलतेवर मात करता येते आणि आपण राजकारणासह कोणत्याही क्षेत्रात यशस्वीपणे काम करु शकतो.

पत्रकारिता भुषण पुरस्कारर्थी संजय आवटे म्हणाले, ज्या देशात महिला सक्षम आहेत त्या देशात काहीच वाईट घडू शकत नाही. पुरूष आणि स्त्रीयांमध्ये समता असणे अत्यंत महत्वाचे आहे आणि या समतेच्या न्याय हक्कासाठी संविधानासाठी पत्रकारीका फार महत्तावाची आहे. तसेच पुरस्काराला उत्तर देताना प्रिया बेर्डे म्हणाल्या, कला क्षेत्र म्हणजे ग्लॅमर, पैसा या गोष्टी दिसतात. मात्र, त्यामागे मोठे कष्ट असतात. घरातील परिस्थिती, आलेली संकटे यांना तोंड देत आम्ही रसिकांचे मनोरंजन करीत असतो. जेव्हा रसिकांची कौतुकाची थाप पडते, तेव्हा कलाकारामधील उत्साह व उमेद वाढते, असेही त्यांनी सांगितले. रामदास फुटाणे यांनी मनोगत व्यक्त केले. निवृत्ती जाधव यांनी प्रास्ताविक केले. अबोली सुपेकर यांनी सूत्रसंचलन केले.

टॅग्स :Baba Adhavबाबा आढावPuneपुणे