शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नेताजी बोस शाळेतील दहावीच्या चारशे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात, सहा महिन्यांपासून गणित, विज्ञानाचे शिक्षकच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 03:14 IST

येरवडा येथील पुणे महानगरपालिका संचालित नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १०वीत शिकत असलेल्या सुमारे चारशे विद्यार्थी व विद्यार्थिनींचे भवितव्य अंधारात असून...

येरवडा : येरवडा येथील पुणे महानगरपालिका संचालित नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १०वीत शिकत असलेल्या सुमारे चारशे विद्यार्थी व विद्यार्थिनींचे भवितव्य अंधारात असून, सहामाही परीक्षा होऊनही येथील विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक उपलब्ध नाहीत. परिणामी सहामाही परीक्षेचे या दोन्ही विषयांचे परीक्षांच्या उत्तरपत्रिका कोºया करकरीत टाकून गेले आहेत.येरवडा भागातील समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा या उद्देशाने महापालिकेच्या वतीने १९५३मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय उभारण्यात आले. यापूर्वी विद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची पटसंख्या सुमारे ५ हजार एवढ्या प्रमाणात होती. मात्र सध्या ही पटसंख्या घसरून अवघ्या २ हजारावर आली आहे. येथे इयत्ता ५वी ते १२ वीपर्यंत शिक्षण देण्यात येत आहे. सध्या दहावीत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या ८ तुकड्यांमध्ये ४०० विद्यार्थी व विद्यार्थिनींची आहे. गेल्या ६ महिन्यापासून गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक उपलब्ध नाहीत. या शाळेत एकूण ३ शिक्षकांची या दोन्ही विषयासाठी गरज आहे. पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाकडे वारंवार याबाबत शिक्षकांची मागणी करूनही संबंधित अधिकाºयांनी याकडे पाठ फिरवून शिक्षक उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरले आहेत.दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांसाठी आयुष्यातील टर्निंग पॉईंट असतो. यावरच विद्यार्थ्यांचे यश-अपयशाचे भवितव्य ठरत असते. संबंधित विषयाचे शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास सर्व विद्यार्थी नापास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.संबंधित दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन्ही विषयाचे शिक्षक मिळावेत याकरिता शिक्षण मंडळाकडे वारंवार पत्रव्यवहार करून शिक्षक उपलब्ध करण्याची मागणी करूनही मंडळाचे पदाधिकारी याकडे गांभीर्याने पाहात नाहीत. परिणामी गणित व विज्ञान शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे आयुष्य टांगणीला लागले आहे.- सुरेखा शिवशरण, शाळा प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयया शाळेत ४ लेखनिक असणे गरजेचे असून, मात्र त्या पैकी १ जण अंध असून दुसरा कायम तर्रर असल्याची तक्रार आहे. उर्वरित दोघे जण आवो जावो घर तुम्हारा असे समजून कधी शाळेत येतात तर कधी येत नाहीत . शिपायांची संख्या ५ असून, त्यातील बहुतांशजण काम न करता अंगावरच्या कपड्यांची घडीदेखील विसकटू देत नाहीत.विद्यालयातील माजी विद्यार्थी अरुण वाघमारे हे पालिका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होऊन गेले आहेत. त्यांच्या बरोबरीने अनेक माजी विद्यार्थी उच्चशिक्षित असून चांगल्या पदावर कार्यरत आहेत. शाळेतील सध्याच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक अवस्था पाहून लक्ष देणे गरजेचे आहे. 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थी