शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

हिरडा उत्पादक चिंताग्रस्त, खरेदी केंद्र अद्याप बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 02:13 IST

हिरड्याच्या उत्पादनास एकाधिकार खरेदी योजनेतून वगळून केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किमतीखाली आणण्यात आले आहे. बाळ हिरड्याचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु, आदिवासी महामंडळाकडून हिरड्याची खरेदी सुरू झाली नाही. नाइलाजास्तव त्यांनी हिरडा खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे.

डिंभे - हिरड्याच्या उत्पादनास एकाधिकार खरेदी योजनेतून वगळून केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किमतीखाली आणण्यात आले आहे. बाळ हिरड्याचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु, आदिवासी महामंडळाकडून हिरड्याची खरेदी सुरू झाली नाही. नाइलाजास्तव त्यांनी हिरडा खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. उत्पादित झालेला हिरडा विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ नसल्याने ते अस्वस्थ असून, महामंडळाची हिरडा खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी केली जात आहे.आदिवासी शेतकºयांच्या आर्थिक उत्पन्नाचे एकमेव साधन असणारा हिरडा शासनाच्या आधारभूत योजनेतून ऐच्छिक खरेदीत गेला. त्यानंतर तो पुन्हा आता किमान अधारभूत गौणउपज खरेदी योजनेखाली आणण्यात आला आहे. त्यामुळे महामंडळाकडून हिरडा खरेदी केला जाईल की नाही, याची शाश्वती नसल्याने हिरडा खासगी व्यापाºयांना देण्यास सुरुवात केली आहे.पारंपरिक भात, नागली, सावा, वरई या पिकांबरोबरच आदिवासी शेतकºयांकडून पैशाअडक्यासाठी मोठ्या प्रमाणात हिरडा गोळा केला जातो. कधी आधारभूत तर कधी एकाधिकार, कधी ऐच्छिक खरेदी, तर कधी सातबारा अशा वेगवेगळ्या कारणांनी आदिवासींचा हिरडा व जंगलमाल खरेदी करण्यास शासनाकडून विलंब होत गेला आहे. मागील हंगामापासून हिरड्याचे उत्पादनास किमान आधारभूत गौणउपज किंमत लागू केली आहे. केंद्र शासनाच्या या आधारभूत योजनेअंतर्गत येणाºया शेतमालाचे बाजारभाव ठरविण्याचे अधिकार केंद्रशासनाला आहेत. याबरोबरच महामंडळाच्या खरेदीकेंद्रावर हिरडा विक्रीसाठी आणताना शेतकºयांनी आपला सातबाराही बरोबर आणण्यायाची जाचक अटही घालण्यात आली आहे. या अटीमुळे चोरट्यामार्गाने बाजारात येणाºया हिरड्यास आळा घालणे शक्य असले, तरी दिवसभर काबाडकष्ट करून हिरडा जमा करणाºया आदिवासी शेतकºयांवर एकप्रकारे अविश्वास दाखवून त्यांच्या भावना दुखावल्याची भावना आदिवासी शेतकºयांमध्ये निर्माण झाली आहे. पेसा कायद्यांतर्गत आदिवासी भागातील हिरडा,बेहडा व गौण उपज आदिवासींना जमा करण्याचे अधिकार असताना ही अट कशासाठी, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.- यंदा बाळहिरड्याचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु अजूनही आदिवासी विकास महामंडळाची हिरडा खरेदी केंद्रे सुरू झाली नाहीत. यामुळे शेतकºयांना हक्काचे आर्थिक उत्पादन मिळवून देणारे हिरड्यापासून मिळणाºया उत्पादनाचा मार्गच बंद झाला आहे.- ही खरेदी केंद्रे कधी सुरू होतील याचीही शाश्वती नसल्याने नाइलाजास्तव जामा केलेला हिरडा आदिवासी शेतकºयांना खासगी व्यापाºयाच्या दारात घेऊन जाण्याची वेळ आली आहे.- खरेदीचे दर व्यापारीच ठरवत असल्याने यामध्ये शेतकºयांची प्रचंड आर्थिक पिळवणूक होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीnewsबातम्या