शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
4
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
5
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
6
"इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
7
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
8
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
9
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
10
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
11
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
12
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
13
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
14
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
15
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
16
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
17
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
18
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
19
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
20
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
Daily Top 2Weekly Top 5

हिरडा उत्पादक चिंताग्रस्त, खरेदी केंद्र अद्याप बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 02:13 IST

हिरड्याच्या उत्पादनास एकाधिकार खरेदी योजनेतून वगळून केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किमतीखाली आणण्यात आले आहे. बाळ हिरड्याचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु, आदिवासी महामंडळाकडून हिरड्याची खरेदी सुरू झाली नाही. नाइलाजास्तव त्यांनी हिरडा खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे.

डिंभे - हिरड्याच्या उत्पादनास एकाधिकार खरेदी योजनेतून वगळून केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किमतीखाली आणण्यात आले आहे. बाळ हिरड्याचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु, आदिवासी महामंडळाकडून हिरड्याची खरेदी सुरू झाली नाही. नाइलाजास्तव त्यांनी हिरडा खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. उत्पादित झालेला हिरडा विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ नसल्याने ते अस्वस्थ असून, महामंडळाची हिरडा खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी केली जात आहे.आदिवासी शेतकºयांच्या आर्थिक उत्पन्नाचे एकमेव साधन असणारा हिरडा शासनाच्या आधारभूत योजनेतून ऐच्छिक खरेदीत गेला. त्यानंतर तो पुन्हा आता किमान अधारभूत गौणउपज खरेदी योजनेखाली आणण्यात आला आहे. त्यामुळे महामंडळाकडून हिरडा खरेदी केला जाईल की नाही, याची शाश्वती नसल्याने हिरडा खासगी व्यापाºयांना देण्यास सुरुवात केली आहे.पारंपरिक भात, नागली, सावा, वरई या पिकांबरोबरच आदिवासी शेतकºयांकडून पैशाअडक्यासाठी मोठ्या प्रमाणात हिरडा गोळा केला जातो. कधी आधारभूत तर कधी एकाधिकार, कधी ऐच्छिक खरेदी, तर कधी सातबारा अशा वेगवेगळ्या कारणांनी आदिवासींचा हिरडा व जंगलमाल खरेदी करण्यास शासनाकडून विलंब होत गेला आहे. मागील हंगामापासून हिरड्याचे उत्पादनास किमान आधारभूत गौणउपज किंमत लागू केली आहे. केंद्र शासनाच्या या आधारभूत योजनेअंतर्गत येणाºया शेतमालाचे बाजारभाव ठरविण्याचे अधिकार केंद्रशासनाला आहेत. याबरोबरच महामंडळाच्या खरेदीकेंद्रावर हिरडा विक्रीसाठी आणताना शेतकºयांनी आपला सातबाराही बरोबर आणण्यायाची जाचक अटही घालण्यात आली आहे. या अटीमुळे चोरट्यामार्गाने बाजारात येणाºया हिरड्यास आळा घालणे शक्य असले, तरी दिवसभर काबाडकष्ट करून हिरडा जमा करणाºया आदिवासी शेतकºयांवर एकप्रकारे अविश्वास दाखवून त्यांच्या भावना दुखावल्याची भावना आदिवासी शेतकºयांमध्ये निर्माण झाली आहे. पेसा कायद्यांतर्गत आदिवासी भागातील हिरडा,बेहडा व गौण उपज आदिवासींना जमा करण्याचे अधिकार असताना ही अट कशासाठी, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.- यंदा बाळहिरड्याचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु अजूनही आदिवासी विकास महामंडळाची हिरडा खरेदी केंद्रे सुरू झाली नाहीत. यामुळे शेतकºयांना हक्काचे आर्थिक उत्पादन मिळवून देणारे हिरड्यापासून मिळणाºया उत्पादनाचा मार्गच बंद झाला आहे.- ही खरेदी केंद्रे कधी सुरू होतील याचीही शाश्वती नसल्याने नाइलाजास्तव जामा केलेला हिरडा आदिवासी शेतकºयांना खासगी व्यापाºयाच्या दारात घेऊन जाण्याची वेळ आली आहे.- खरेदीचे दर व्यापारीच ठरवत असल्याने यामध्ये शेतकºयांची प्रचंड आर्थिक पिळवणूक होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीnewsबातम्या