शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

हिरडा उत्पादक चिंताग्रस्त, खरेदी केंद्र अद्याप बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 02:13 IST

हिरड्याच्या उत्पादनास एकाधिकार खरेदी योजनेतून वगळून केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किमतीखाली आणण्यात आले आहे. बाळ हिरड्याचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु, आदिवासी महामंडळाकडून हिरड्याची खरेदी सुरू झाली नाही. नाइलाजास्तव त्यांनी हिरडा खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे.

डिंभे - हिरड्याच्या उत्पादनास एकाधिकार खरेदी योजनेतून वगळून केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किमतीखाली आणण्यात आले आहे. बाळ हिरड्याचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु, आदिवासी महामंडळाकडून हिरड्याची खरेदी सुरू झाली नाही. नाइलाजास्तव त्यांनी हिरडा खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. उत्पादित झालेला हिरडा विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ नसल्याने ते अस्वस्थ असून, महामंडळाची हिरडा खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी केली जात आहे.आदिवासी शेतकºयांच्या आर्थिक उत्पन्नाचे एकमेव साधन असणारा हिरडा शासनाच्या आधारभूत योजनेतून ऐच्छिक खरेदीत गेला. त्यानंतर तो पुन्हा आता किमान अधारभूत गौणउपज खरेदी योजनेखाली आणण्यात आला आहे. त्यामुळे महामंडळाकडून हिरडा खरेदी केला जाईल की नाही, याची शाश्वती नसल्याने हिरडा खासगी व्यापाºयांना देण्यास सुरुवात केली आहे.पारंपरिक भात, नागली, सावा, वरई या पिकांबरोबरच आदिवासी शेतकºयांकडून पैशाअडक्यासाठी मोठ्या प्रमाणात हिरडा गोळा केला जातो. कधी आधारभूत तर कधी एकाधिकार, कधी ऐच्छिक खरेदी, तर कधी सातबारा अशा वेगवेगळ्या कारणांनी आदिवासींचा हिरडा व जंगलमाल खरेदी करण्यास शासनाकडून विलंब होत गेला आहे. मागील हंगामापासून हिरड्याचे उत्पादनास किमान आधारभूत गौणउपज किंमत लागू केली आहे. केंद्र शासनाच्या या आधारभूत योजनेअंतर्गत येणाºया शेतमालाचे बाजारभाव ठरविण्याचे अधिकार केंद्रशासनाला आहेत. याबरोबरच महामंडळाच्या खरेदीकेंद्रावर हिरडा विक्रीसाठी आणताना शेतकºयांनी आपला सातबाराही बरोबर आणण्यायाची जाचक अटही घालण्यात आली आहे. या अटीमुळे चोरट्यामार्गाने बाजारात येणाºया हिरड्यास आळा घालणे शक्य असले, तरी दिवसभर काबाडकष्ट करून हिरडा जमा करणाºया आदिवासी शेतकºयांवर एकप्रकारे अविश्वास दाखवून त्यांच्या भावना दुखावल्याची भावना आदिवासी शेतकºयांमध्ये निर्माण झाली आहे. पेसा कायद्यांतर्गत आदिवासी भागातील हिरडा,बेहडा व गौण उपज आदिवासींना जमा करण्याचे अधिकार असताना ही अट कशासाठी, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.- यंदा बाळहिरड्याचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु अजूनही आदिवासी विकास महामंडळाची हिरडा खरेदी केंद्रे सुरू झाली नाहीत. यामुळे शेतकºयांना हक्काचे आर्थिक उत्पादन मिळवून देणारे हिरड्यापासून मिळणाºया उत्पादनाचा मार्गच बंद झाला आहे.- ही खरेदी केंद्रे कधी सुरू होतील याचीही शाश्वती नसल्याने नाइलाजास्तव जामा केलेला हिरडा आदिवासी शेतकºयांना खासगी व्यापाºयाच्या दारात घेऊन जाण्याची वेळ आली आहे.- खरेदीचे दर व्यापारीच ठरवत असल्याने यामध्ये शेतकºयांची प्रचंड आर्थिक पिळवणूक होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीnewsबातम्या