शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

नीरा नदीवरील बंधारे निखळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 02:59 IST

येथील नीरा नदीवर शेती व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना उपयोग व्हावा म्हणून बांधलेले कोल्हापूर बंधारे दिवसेंदिवस निरुपयोगी झाले आहेत. हे बंधारे निखळले असून, भगदाडं पडली आहेत. पिलरही वाहून गेले असल्याने पाणी थांबतच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना काही उपयोग होताना दिसत नाही.

भोर  - येथील नीरा नदीवर शेती व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना उपयोग व्हावा म्हणून बांधलेले कोल्हापूर बंधारे दिवसेंदिवस निरुपयोगी झाले आहेत. हे बंधारे निखळले असून, भगदाडं पडली आहेत. पिलरही वाहून गेले असल्याने पाणी थांबतच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना काही उपयोग होताना दिसत नाही.दगडी बंधाºयांपैकी सर्वच बंधाºयांना साधारणपणे २० ते २५ वर्षे झाल्याने दगड, सिमेंट निघाले आहेत. आलेले पाणी वाहून गेल्याने शेतीच्या पाणी उपसा योजना, नळपाणी पुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे. काही दिवसांत नळपाणीपुरवठा योजनाही अडचणीत येतील. मात्र पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, दुरुस्तीची मागणी केली आहे.नीरा नदीवर निगुडघर, आपटी, नांदगाव, आंबेघर, शिंद, वेनवडी, येवली, वडगावडाळ या ठिकाणी शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना उपयोग व्हावा म्हणून पाटबंधारे विभागाच्या वतीने कोल्हापूर पद्धतीचे दगडी बांधकाम असलेले बंधारे बांधण्यात आले होते. मात्र निकृष्ट दर्जाचे कामामुळे अनेक बंधाºयांचे सिमेंट, दगड निघाले असून, मोठमोठी भगदाडं पडली आहेत. मोºया वाहून गेल्या असून, अनेक ठिकाणचा स्लॅब पडला आहे. पिलर वाहून गेल्यामुळे बंधाºयावरून अलीकडे व पलीकडे जाता येत नाही. पायातून पाणी वाहून जात आहे.अनेक वर्षांपासून पाणीसाठाच होत नाहीअशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात बंधाºयाच्या पाण्यावरअवलंबून असलेल्या साळव रायरी, कंकवाडी, निगुडघर, आपटी, नांदगाव, आंबेघर, वाठार,पोम्बर्डी, शिंद, वेनवडीया गावच्या नळपाणीपुरवठा योजना धोक्यात येऊ शकतात.त्यामुळे बंधाºयांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्रयाकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बंधारे दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी पाठवले असल्याचे पाटबंधारे विभाग सांगत आहे. दोन वर्षांत काहीच मंजुरी मिळाली नाही.असून अडचण नसून खोळंबा...आठ ठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र गळती लागल्याने अनेक बंधाºयांत पाणीसाठा होत नसल्याने ते कोरडे पडतात. त्यामुळे शेतीला व पिण्याच्या पाण्याला काहीच उपयोेग होत नसल्याने बंधाºयाची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे, त्यामुळे सदर बंधाºयांची दुरुस्ती करण्याची मागणी येवलीचे माजी सरपंच सुनील धुमाळ यांनी केली आहे.शिंद, वेनवडी, येवली व वडगाव येथील बंधाºयांच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक शासनाकडे मंजुरीसाठी सादर केले आहे.त्याला मंजुरी मिळाल्यावर दुरुस्ती करण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या