शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नीरा नदीवरील बंधारे निखळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 02:59 IST

येथील नीरा नदीवर शेती व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना उपयोग व्हावा म्हणून बांधलेले कोल्हापूर बंधारे दिवसेंदिवस निरुपयोगी झाले आहेत. हे बंधारे निखळले असून, भगदाडं पडली आहेत. पिलरही वाहून गेले असल्याने पाणी थांबतच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना काही उपयोग होताना दिसत नाही.

भोर  - येथील नीरा नदीवर शेती व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना उपयोग व्हावा म्हणून बांधलेले कोल्हापूर बंधारे दिवसेंदिवस निरुपयोगी झाले आहेत. हे बंधारे निखळले असून, भगदाडं पडली आहेत. पिलरही वाहून गेले असल्याने पाणी थांबतच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना काही उपयोग होताना दिसत नाही.दगडी बंधाºयांपैकी सर्वच बंधाºयांना साधारणपणे २० ते २५ वर्षे झाल्याने दगड, सिमेंट निघाले आहेत. आलेले पाणी वाहून गेल्याने शेतीच्या पाणी उपसा योजना, नळपाणी पुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे. काही दिवसांत नळपाणीपुरवठा योजनाही अडचणीत येतील. मात्र पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, दुरुस्तीची मागणी केली आहे.नीरा नदीवर निगुडघर, आपटी, नांदगाव, आंबेघर, शिंद, वेनवडी, येवली, वडगावडाळ या ठिकाणी शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना उपयोग व्हावा म्हणून पाटबंधारे विभागाच्या वतीने कोल्हापूर पद्धतीचे दगडी बांधकाम असलेले बंधारे बांधण्यात आले होते. मात्र निकृष्ट दर्जाचे कामामुळे अनेक बंधाºयांचे सिमेंट, दगड निघाले असून, मोठमोठी भगदाडं पडली आहेत. मोºया वाहून गेल्या असून, अनेक ठिकाणचा स्लॅब पडला आहे. पिलर वाहून गेल्यामुळे बंधाºयावरून अलीकडे व पलीकडे जाता येत नाही. पायातून पाणी वाहून जात आहे.अनेक वर्षांपासून पाणीसाठाच होत नाहीअशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात बंधाºयाच्या पाण्यावरअवलंबून असलेल्या साळव रायरी, कंकवाडी, निगुडघर, आपटी, नांदगाव, आंबेघर, वाठार,पोम्बर्डी, शिंद, वेनवडीया गावच्या नळपाणीपुरवठा योजना धोक्यात येऊ शकतात.त्यामुळे बंधाºयांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्रयाकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बंधारे दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी पाठवले असल्याचे पाटबंधारे विभाग सांगत आहे. दोन वर्षांत काहीच मंजुरी मिळाली नाही.असून अडचण नसून खोळंबा...आठ ठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र गळती लागल्याने अनेक बंधाºयांत पाणीसाठा होत नसल्याने ते कोरडे पडतात. त्यामुळे शेतीला व पिण्याच्या पाण्याला काहीच उपयोेग होत नसल्याने बंधाºयाची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे, त्यामुळे सदर बंधाºयांची दुरुस्ती करण्याची मागणी येवलीचे माजी सरपंच सुनील धुमाळ यांनी केली आहे.शिंद, वेनवडी, येवली व वडगाव येथील बंधाºयांच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक शासनाकडे मंजुरीसाठी सादर केले आहे.त्याला मंजुरी मिळाल्यावर दुरुस्ती करण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या