शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नीरा नदीवरील बंधारे निखळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 02:59 IST

येथील नीरा नदीवर शेती व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना उपयोग व्हावा म्हणून बांधलेले कोल्हापूर बंधारे दिवसेंदिवस निरुपयोगी झाले आहेत. हे बंधारे निखळले असून, भगदाडं पडली आहेत. पिलरही वाहून गेले असल्याने पाणी थांबतच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना काही उपयोग होताना दिसत नाही.

भोर  - येथील नीरा नदीवर शेती व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना उपयोग व्हावा म्हणून बांधलेले कोल्हापूर बंधारे दिवसेंदिवस निरुपयोगी झाले आहेत. हे बंधारे निखळले असून, भगदाडं पडली आहेत. पिलरही वाहून गेले असल्याने पाणी थांबतच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना काही उपयोग होताना दिसत नाही.दगडी बंधाºयांपैकी सर्वच बंधाºयांना साधारणपणे २० ते २५ वर्षे झाल्याने दगड, सिमेंट निघाले आहेत. आलेले पाणी वाहून गेल्याने शेतीच्या पाणी उपसा योजना, नळपाणी पुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे. काही दिवसांत नळपाणीपुरवठा योजनाही अडचणीत येतील. मात्र पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, दुरुस्तीची मागणी केली आहे.नीरा नदीवर निगुडघर, आपटी, नांदगाव, आंबेघर, शिंद, वेनवडी, येवली, वडगावडाळ या ठिकाणी शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना उपयोग व्हावा म्हणून पाटबंधारे विभागाच्या वतीने कोल्हापूर पद्धतीचे दगडी बांधकाम असलेले बंधारे बांधण्यात आले होते. मात्र निकृष्ट दर्जाचे कामामुळे अनेक बंधाºयांचे सिमेंट, दगड निघाले असून, मोठमोठी भगदाडं पडली आहेत. मोºया वाहून गेल्या असून, अनेक ठिकाणचा स्लॅब पडला आहे. पिलर वाहून गेल्यामुळे बंधाºयावरून अलीकडे व पलीकडे जाता येत नाही. पायातून पाणी वाहून जात आहे.अनेक वर्षांपासून पाणीसाठाच होत नाहीअशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात बंधाºयाच्या पाण्यावरअवलंबून असलेल्या साळव रायरी, कंकवाडी, निगुडघर, आपटी, नांदगाव, आंबेघर, वाठार,पोम्बर्डी, शिंद, वेनवडीया गावच्या नळपाणीपुरवठा योजना धोक्यात येऊ शकतात.त्यामुळे बंधाºयांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्रयाकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बंधारे दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी पाठवले असल्याचे पाटबंधारे विभाग सांगत आहे. दोन वर्षांत काहीच मंजुरी मिळाली नाही.असून अडचण नसून खोळंबा...आठ ठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र गळती लागल्याने अनेक बंधाºयांत पाणीसाठा होत नसल्याने ते कोरडे पडतात. त्यामुळे शेतीला व पिण्याच्या पाण्याला काहीच उपयोेग होत नसल्याने बंधाºयाची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे, त्यामुळे सदर बंधाºयांची दुरुस्ती करण्याची मागणी येवलीचे माजी सरपंच सुनील धुमाळ यांनी केली आहे.शिंद, वेनवडी, येवली व वडगाव येथील बंधाºयांच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक शासनाकडे मंजुरीसाठी सादर केले आहे.त्याला मंजुरी मिळाल्यावर दुरुस्ती करण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या