नीरदेवघर धरणग्रस्त आक्रमक

By Admin | Updated: November 28, 2015 00:49 IST2015-11-28T00:49:24+5:302015-11-28T00:49:24+5:30

धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांची पूर्तता न करता फ क्त ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याने आजअखेर संतप्त नीरादेवघर धरणग्रस्त पुनर्वसन विकास शेतकरी संघटनेच्या वतीने

Neeradeghhar damaged aggressor | नीरदेवघर धरणग्रस्त आक्रमक

नीरदेवघर धरणग्रस्त आक्रमक

भोर : धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांची पूर्तता न करता फ क्त ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याने आजअखेर संतप्त नीरादेवघर धरणग्रस्त पुनर्वसन विकास शेतकरी संघटनेच्या वतीने पाटबंधारे विभागाच्या भाटघर, सांगवी येथील नीरादेवघर धरणाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले.
विविध मागण्यांसाठी नीरादेवघर धरणग्रस्त पुनर्वसन समितीच्या वतीने २६ आॅक्टोबरला धरणावर मोर्चा काढून काम बंद आंदोलन करण्यात आले. या वेळी पाटबंधारे विभागाकडून मागण्यांसंर्दभात ५ नोव्हेंबरला पुण्यात बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यावर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.
मात्र ५ नोव्हेंबरला बैठक झालीच नाही. त्यामुळे धरणग्रस्तांनी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. तरीही धरणग्रस्तांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त धरणग्रस्तांनी रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) नीरादेवघर धरणातून खाली सोडलेले पाणी व उजव्या कालव्याचे सुरू असलेले काम बंद केले. तरीही दखल न घेतल्याने आज दुपारी १२ वाजता कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात आले.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष बाळासोा मालुसरे, सचिव नथू दिघे, बापू शिरवले, धोंडिबा मालुसरे, चिमण शिरवले, संतोष शिंदे, राजेंद्र वाडकर, वसंत भेलके, शंकर वेनुपुरे, बाळू वेनुपुरे, लक्ष्मण धामुणसे, बबन मालुसरे, सुभाष मालुसरे, सीताबाई शिरवले, बाळासोा किंद्रे व धरणग्रस्त उपस्थित होते.
मागील वीस वर्षांपासून नीरादेवघर धरणग्रस्तांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. धरणग्रस्तांची फसवणूक झाली असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याबाबत बैठक घेऊन मागण्यांची पूर्तता करावी. मागील सरकारने पुनर्वसनाची कामे सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याला १८ महिने झाले तरी अद्याप काहीच झाले नाही. नवीन सरकारने तर धरणग्रतांना वाऱ्यावर सोडले असून त्यांची पिळवणूक सुरूआहे. (वार्ताहर)
नीरादेवघर धरणग्रस्तांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याबाबत वारंवार सूचना देऊनही पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याने धरणग्रस्तांचा संताप अनावर होऊन आता आंदोलन सुरू झाल्यावर अधिकारी बैठक घेण्याचे आश्वासन देत आहेत. जोपर्यंत धरणग्रस्तांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन करून ते अधिक तीव्र करण्यात येईल.
- संग्राम थोपटे, आमदार, भोर

Web Title: Neeradeghhar damaged aggressor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.