शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

नीरा प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक

By admin | Updated: August 6, 2016 00:52 IST

गळणारे छत, वाकलेले बिम, मोडकळीस आलेली इमारत अशा धोकादायक शाळेत ७०० विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे गिरवित आहेत

सोमेश्वरनगर : नीरा (ता. पुरंदर) येथील प्राथमिक शाळा क्र. १ व शाळा क्र. २मध्ये गळणारे छत, वाकलेले बिम, मोडकळीस आलेली इमारत अशा धोकादायक शाळेत ७०० विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याने ३१ आॅगस्टपर्यंत याकडे लक्ष न दिल्यास शाळा बंद तसेच उपोषणाचा इशारा नीरेचे उपसरपंच दीपक काकडे यांच्यासह १० सदस्यांनी दिला आहे. नीरा (ता. पुरंदर) येथील प्राथमिक शाळा क्र. १ व २ या शाळांमधून सुमारे ७०० मुले-मुली शिक्षण घेत आहेत. ही २० शिक्षकी शाळा असून पुरंदर तालुक्यातील सर्वांत मोठी प्राथमिक शाळा आहे. मात्र, प्रशासन या शाळेकडे जाणीवपूर्वक काणाडोळा करत असल्याने ७०० मुलांना जीव मुठीत धरून शिकावे लागत आहे. आज नीरेतील ग्रामस्थ, ग्रामपंचयात सदस्य व शाळा व्यवस्थापन सदस्य यांनी अचानक शाळेची पाहणी केल्यानंतर अनेक धक्कादायक परिस्थिती पुढे आली. या शाळेमध्ये एकूण २५ वर्गखोल्या आहेत. यातील १० ते १२ वर्गखोल्यांचे छत गळत आहे. काही वर्गखोल्यांमधून तर चक्क पाणी भरले आहे. मुलांना पाण्यामध्येच बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. इमारतीचा वरील मजला पूर्णत: खिळखिळा झाला आहे. स्लॅब कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. बिम वाकले आहेत. तसेच पूर्णत: बांधकाम झुकले आहे. ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती आहे. वास्तविक या शाळेची जागा नीरा ग्रामपंचायतीची आहे. जिल्हा परिषद नीरा ग्रामपंचायतीला दर महिन्याला २३ हजारप्रमाणे वर्षाला ३ लाख रुपये भाडे देते. मात्र, हे भाडे ५ वर्षापासून दिले गेले नसल्याने जिल्हा परिषदेकडे १५ लाखांच्या आसपास भाडे येणे असल्याने या शाळेची डागडुजी होऊ शकली नाही. आता जिल्हा परिषदेने याची डागडुजी करत न बसता नवीन इमारत बांधावी अशी मागणी होत आहे. या वळी उपसरपंच दीपक काकडे म्हणाले, जिल्हा परिषद व राज्य सरकार या शाळेत शिकणाऱ्या ७०० मुलांच्या आयुष्याशी खेळत आहे. या वेळी नीरेचे माजी सरपंच राजेश काकडे, उपसरपंच दीपक काकडे, सदस्य बाळासाहेब भोसले, शालेय व्यवस्थापन समितीचे राधा माने, सुदाम बंडगर, सतीश गालिंदे, अप्पा दारोळे, हरिभाऊ जेधे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)>शाळेची एवढी दयनीय अवस्था झालेली असतानाही याकडे संबंधित विभाग काणाडोळा करत आहे. त्यामुळे या शाळेचे स्ट्रक्चरल आॅडिट व्हावे, अशी मागणी काकडे यांनी केली आहे.तसेच याबाबत ३१ आॅगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास शाळा बंद तसेच उपोषणाचा इशारा काकडे यांनी दिला आहे.