शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

नीरा प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक

By admin | Updated: August 6, 2016 00:52 IST

गळणारे छत, वाकलेले बिम, मोडकळीस आलेली इमारत अशा धोकादायक शाळेत ७०० विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे गिरवित आहेत

सोमेश्वरनगर : नीरा (ता. पुरंदर) येथील प्राथमिक शाळा क्र. १ व शाळा क्र. २मध्ये गळणारे छत, वाकलेले बिम, मोडकळीस आलेली इमारत अशा धोकादायक शाळेत ७०० विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याने ३१ आॅगस्टपर्यंत याकडे लक्ष न दिल्यास शाळा बंद तसेच उपोषणाचा इशारा नीरेचे उपसरपंच दीपक काकडे यांच्यासह १० सदस्यांनी दिला आहे. नीरा (ता. पुरंदर) येथील प्राथमिक शाळा क्र. १ व २ या शाळांमधून सुमारे ७०० मुले-मुली शिक्षण घेत आहेत. ही २० शिक्षकी शाळा असून पुरंदर तालुक्यातील सर्वांत मोठी प्राथमिक शाळा आहे. मात्र, प्रशासन या शाळेकडे जाणीवपूर्वक काणाडोळा करत असल्याने ७०० मुलांना जीव मुठीत धरून शिकावे लागत आहे. आज नीरेतील ग्रामस्थ, ग्रामपंचयात सदस्य व शाळा व्यवस्थापन सदस्य यांनी अचानक शाळेची पाहणी केल्यानंतर अनेक धक्कादायक परिस्थिती पुढे आली. या शाळेमध्ये एकूण २५ वर्गखोल्या आहेत. यातील १० ते १२ वर्गखोल्यांचे छत गळत आहे. काही वर्गखोल्यांमधून तर चक्क पाणी भरले आहे. मुलांना पाण्यामध्येच बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. इमारतीचा वरील मजला पूर्णत: खिळखिळा झाला आहे. स्लॅब कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. बिम वाकले आहेत. तसेच पूर्णत: बांधकाम झुकले आहे. ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती आहे. वास्तविक या शाळेची जागा नीरा ग्रामपंचायतीची आहे. जिल्हा परिषद नीरा ग्रामपंचायतीला दर महिन्याला २३ हजारप्रमाणे वर्षाला ३ लाख रुपये भाडे देते. मात्र, हे भाडे ५ वर्षापासून दिले गेले नसल्याने जिल्हा परिषदेकडे १५ लाखांच्या आसपास भाडे येणे असल्याने या शाळेची डागडुजी होऊ शकली नाही. आता जिल्हा परिषदेने याची डागडुजी करत न बसता नवीन इमारत बांधावी अशी मागणी होत आहे. या वळी उपसरपंच दीपक काकडे म्हणाले, जिल्हा परिषद व राज्य सरकार या शाळेत शिकणाऱ्या ७०० मुलांच्या आयुष्याशी खेळत आहे. या वेळी नीरेचे माजी सरपंच राजेश काकडे, उपसरपंच दीपक काकडे, सदस्य बाळासाहेब भोसले, शालेय व्यवस्थापन समितीचे राधा माने, सुदाम बंडगर, सतीश गालिंदे, अप्पा दारोळे, हरिभाऊ जेधे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)>शाळेची एवढी दयनीय अवस्था झालेली असतानाही याकडे संबंधित विभाग काणाडोळा करत आहे. त्यामुळे या शाळेचे स्ट्रक्चरल आॅडिट व्हावे, अशी मागणी काकडे यांनी केली आहे.तसेच याबाबत ३१ आॅगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास शाळा बंद तसेच उपोषणाचा इशारा काकडे यांनी दिला आहे.