शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

नीरा देवघर, भाटघर धरणांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:45 IST

पाणी योजना संकटात : मे महिन्यात दुष्काळाची तीव्रता वाढणार, पाण्याचे नियोजन करण्याची मागणी

भोर : यंदा नीरा देवघर व भाटघर धरणे १०० टक्के भरली होती. मात्र दोन महिन्यांपासून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा ३० टक्क्यांनी कमी झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी झाला आहे. उन्हाळ््याला अद्याप ४ महिने शिल्लक आहे तोपर्यंत पाण्याचा विसर्ग असाच कायम राहिल्यास दोन्ही धरणातील पाणीसाठा कमी होऊन धरण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.

आॅक्टोबर महिन्यात पाऊस थांबला. लगेच नोव्हेंबर महिन्यापासून भाटघर धरणातून गेल्या दोन महिने १८०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात सध्या ७३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. नीरादेवघर धरणातून ८०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू आहे. मागील वर्षी यावेळी नीरादेवघर धरणात ९५ टक्के पाणीसाठा होता. सध्या धरणात ७० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. भाटघर धरणात ७३ टक्के पाणीसाठा आहे. कालवे नसल्याने दोन्ही धरणातील पाणी नदीतून खाली जात आहे.भोरच्या पाण्यावर खालील भागातील बागायती शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जातो. मात्र दरवर्षी भाटघर धरणातील २४ टीएमसी, नीरादेवघर धरणातील १२ टीएमसी व चापटे गुंजवणी धरणातील ४ टीएमसी असे एकूण ३८ टीएमसी पाणी दर पावसाळ््यात साठवले जाते. उन्हाळा आला, की धरणे रिकामी होतात. स्थानिकांना मार्च महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.भाटघर धरण ब्रिटिशकाळात बांधले गेले. त्यामुळे धरणाला तालुक्यासाठी कालवे नसतील. मात्र नीरादेवघर धरण होऊन १५ वर्षे झाली, मात्र अद्यापही धरणाचा उजवा कालवा अपूर्ण तर डावा कालवा कागदावरच आहे. त्यामुळे नीरा नदीतून सोयीस्करपणे पाणी खाली जात आहे. स्थानिकांना पाण्याकडे बघण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. त्यामुळे उद्योगव्यवसाय नसलेल्या तरुणांचे बागायती शेती करून उदरनिर्वाह करण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते की काय, अशीच अवस्था निर्माण झाली आहे. यामुळे अनेक तरुण शिक्षण अर्धवट सोडून पुण्या-मुंबईला जाऊन हॉटेलात, हमाली, दुकानात मिळेल ते काम करून उदरनिर्वाह भागवतात.धरण उशाला, कोरड घशाला...भोर तालुक्यातील दोन्ही धरणे १०० टक्के भरतात आणि उन्हाळ््यात पुन्हा रिकामी होतात. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ््यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यामुळे येथील लोकांची अवस्था धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झाली असून दोन्ही धरणाच्या पाण्यावर तयार होणारी वीजही स्थानिकांना मिळत नाही.भोर तालुक्यातील भाटघर धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे नागरी सुविधांचे प्रश्न अद्याप प्रलंबित असून धरणात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, म्हणून शासनदरबारी हेलपाटे मारीत आहेत.अनेक धरणग्रस्त मातीआड गेले. मात्र अद्याप त्यांना न्याय मिळाला नाही. धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी यासाठी आमदार संग्राम थोपटे व धरणग्रस्त संघटना प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे