शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

संस्कृत भाषेचे संवर्धन गरजेचे : सुधीर मुनगंटीवार; स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 12:11 IST

मुक्तछंद संस्थेतर्फे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक पं. गुलाम दस्तगीर बिराजदार, प्रसिद्ध लेखक वसंत लिमये, प्रसिद्ध हिंदी साहित्यिक सुनील केशव देवधर आणि चित्रकार नीलेश जाधव यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देविचारांच्या आदानप्रदानातून देश घडविण्याची प्रक्रिया : सुधीर मुनगंटीवारराजकीय नेते फक्त आश्वासने देतात : पं. गुलाम दस्तगीर बिराजदार

पुणे : सरकारमध्ये झालेला बदल हा आश्वासनांच्या पूर्तीतून दिसून येईल. संस्कृत ही आपल्या देशाची भाषा असून, अनेक वर्षे त्याकडे दुर्लक्ष झाले. संस्कृतचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची गरज आहे. सध्या अमेरिकेत २० लाख लोक संस्कृतचा अभ्यास करीत आहेत. विचारांच्या आदानप्रदानातून देश घडविण्याची प्रक्रिया होत असल्याचे मत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. मुक्तछंद संस्थेतर्फे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक पं. गुलाम दस्तगीर बिराजदार, प्रसिद्ध लेखक वसंत लिमये, प्रसिद्ध हिंदी साहित्यिक सुनील केशव देवधर आणि चित्रकार नीलेश जाधव यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी मुनगंटीवार बोलत होते. या वेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके आणि संस्थेच्या अध्यक्षा आमदार प्रा. मेधा कुलकर्णी उपस्थित होते. शिवछत्रपती गौरव पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे मानकरी असलेले संघटक आणि खेळाडूंचा या वेळी सन्मान करण्यात आला. ‘स्वातंत्र्यासाठी सावरकर यांच्यासह अनेकांनी बलिदान दिले. मात्र, स्वातंत्र्यामध्ये आम्ही जनतेला न्याय दिला का, याचा विचार राजकीय नेत्यांनी करायला हवा, देश महान बनविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कर्माची आहुती द्याायला हवी’, अशी अपेक्षा संबित पात्रा यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आधुनिक काळातील हिंदू जीवनशैलीचे विश्वस्त आहेत, असे लिमये यांनी सांगितले. ‘सावरकर यांचे हिंदुत्व समजून न घेता त्यांच्यावर हिंदुत्वनिष्ठ असा ठपका ठेवला गेला. भारताला कोणी धर्मनिरपेक्षता शिकविण्याची गरज नाही’, असे देवधर यांनी स्पष्ट केले. मेधा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

इंदिरा गांधी यांच्या काळापासून मी मंत्रिमंडळाच्या संपर्कात आहे. त्यामुळे राजकीय नेते फक्त आश्वासने देतात, त्यांना प्रत्यक्ष कृती करण्याची इच्छा असली तरी नोकरशाही निर्माण करीत असलेल्या अडथळ्यांमुळे आश्वासनांची पूर्ती होत नाही. शालेय अभ्यासक्रमात इयत्ता सहावीपासून संस्कृत विषय अनिवार्य करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. या गोष्टीला वर्ष उलटून गेल्यानंतरही अद्याप कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही.

- पं. गुलाम दस्तगीर बिराजदार

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारPuneपुणेBJPभाजपा