शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

संस्कृत भाषेचे संवर्धन गरजेचे : सुधीर मुनगंटीवार; स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 12:11 IST

मुक्तछंद संस्थेतर्फे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक पं. गुलाम दस्तगीर बिराजदार, प्रसिद्ध लेखक वसंत लिमये, प्रसिद्ध हिंदी साहित्यिक सुनील केशव देवधर आणि चित्रकार नीलेश जाधव यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देविचारांच्या आदानप्रदानातून देश घडविण्याची प्रक्रिया : सुधीर मुनगंटीवारराजकीय नेते फक्त आश्वासने देतात : पं. गुलाम दस्तगीर बिराजदार

पुणे : सरकारमध्ये झालेला बदल हा आश्वासनांच्या पूर्तीतून दिसून येईल. संस्कृत ही आपल्या देशाची भाषा असून, अनेक वर्षे त्याकडे दुर्लक्ष झाले. संस्कृतचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची गरज आहे. सध्या अमेरिकेत २० लाख लोक संस्कृतचा अभ्यास करीत आहेत. विचारांच्या आदानप्रदानातून देश घडविण्याची प्रक्रिया होत असल्याचे मत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. मुक्तछंद संस्थेतर्फे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक पं. गुलाम दस्तगीर बिराजदार, प्रसिद्ध लेखक वसंत लिमये, प्रसिद्ध हिंदी साहित्यिक सुनील केशव देवधर आणि चित्रकार नीलेश जाधव यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी मुनगंटीवार बोलत होते. या वेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके आणि संस्थेच्या अध्यक्षा आमदार प्रा. मेधा कुलकर्णी उपस्थित होते. शिवछत्रपती गौरव पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे मानकरी असलेले संघटक आणि खेळाडूंचा या वेळी सन्मान करण्यात आला. ‘स्वातंत्र्यासाठी सावरकर यांच्यासह अनेकांनी बलिदान दिले. मात्र, स्वातंत्र्यामध्ये आम्ही जनतेला न्याय दिला का, याचा विचार राजकीय नेत्यांनी करायला हवा, देश महान बनविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कर्माची आहुती द्याायला हवी’, अशी अपेक्षा संबित पात्रा यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आधुनिक काळातील हिंदू जीवनशैलीचे विश्वस्त आहेत, असे लिमये यांनी सांगितले. ‘सावरकर यांचे हिंदुत्व समजून न घेता त्यांच्यावर हिंदुत्वनिष्ठ असा ठपका ठेवला गेला. भारताला कोणी धर्मनिरपेक्षता शिकविण्याची गरज नाही’, असे देवधर यांनी स्पष्ट केले. मेधा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

इंदिरा गांधी यांच्या काळापासून मी मंत्रिमंडळाच्या संपर्कात आहे. त्यामुळे राजकीय नेते फक्त आश्वासने देतात, त्यांना प्रत्यक्ष कृती करण्याची इच्छा असली तरी नोकरशाही निर्माण करीत असलेल्या अडथळ्यांमुळे आश्वासनांची पूर्ती होत नाही. शालेय अभ्यासक्रमात इयत्ता सहावीपासून संस्कृत विषय अनिवार्य करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. या गोष्टीला वर्ष उलटून गेल्यानंतरही अद्याप कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही.

- पं. गुलाम दस्तगीर बिराजदार

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारPuneपुणेBJPभाजपा