शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होण्याची गरज, ‘नाबार्ड’ची भूमिका महत्त्वाची : मुरलीधर मोहोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 16:28 IST

प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचे केंद्र सरकारच्या माध्यमातून बळकटीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी या संस्थांना विविध २५ व्यवसाय करण्याची परवानगी दिली जात आहे.

पुणे : “सहकार हाच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आत्मा असून, २०४७ मध्ये विकसित भारत करायचा असल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होण्याची गरज आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकाराची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

त्यामुळेच केंद्र सरकारने गाव पातळीवरील प्राथमिक कृषी सहकारी संस्था बळकट करण्याचे ठरविले आहे. त्यात ‘नाबार्ड’ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.

‘नाबार्ड’च्या ४४व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्याचे सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे, राज्य शिखर बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, ‘नाबार्ड’च्या मुख्य सरव्यवस्थापक रश्मी दराड, गोवर्धन रावत, रायगड सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार जयंत पाटील, ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी यावेळी उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, “प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचे केंद्र सरकारच्या माध्यमातून बळकटीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी या संस्थांना विविध २५ व्यवसाय करण्याची परवानगी दिली जात आहे. आतापर्यंत ६८ हजार संस्थांचे संगणकीकरण करण्यात आले असून, राज्यातही हे काम सुरू आहे. मात्र, त्यात फारशी प्रगती नसल्याचे चित्र आहे. गावपातळीवरील या संस्थांमध्ये संगणकीकरण महत्त्वाचे आहे.”

दराडे म्हणाले, “प्राथमिक कृषी सेवा सहकारी संस्थांना व्यवसाय म्हणून आता सामायिक सुविधा केंद्र खते विक्री व गोदाम उभारण्यासाठी राज्यपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. राज्य सहकारी बँकांनी या संस्थांसाठी कर्ज देण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन केल्यास त्यांचे सक्षमीकरण करण्यास गती मिळेल. यापुढे या संस्थांच्या माध्यमातून सोयाबीन, तूर, हरभरा या शेतमालाची खरेदी करण्याचा विचार आहे. राज्यात २८ हजार ग्रामपंचायती असून, आतापर्यंत २१ हजार गावांमध्ये प्राथमिक कृषी सहकारी संस्था स्थापन झाल्या आहेत. अजूनही सात हजार गावांमध्ये अशा संस्था स्थापन करण्याची गरज आहे.”

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड