शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

नदीच्या शुद्धीकरणासाठी आत्मदृष्टी हवी - डॉ. राजेंद्रसिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 01:55 IST

केवळ पैशांनी नद्या स्वच्छ होणार नाहीत. त्यासाठी आपल्यातील व्यवहार, संस्कार आणि आत्मदृष्टीमध्ये परिवर्तन झाले पाहिजे. तरच आपली नदी स्वच्छ होऊ शकेल, नदीला समजून घेत नदीवर प्रेम करा. आमच्या पाण्यावर अदानी व अंबानीला हक्क गाजवू न देण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले.

आळंदी - केवळ पैशांनी नद्या स्वच्छ होणार नाहीत. त्यासाठी आपल्यातील व्यवहार, संस्कार आणि आत्मदृष्टीमध्ये परिवर्तन झाले पाहिजे. तरच आपली नदी स्वच्छ होऊ शकेल, नदीला समजून घेत नदीवर प्रेम करा. आमच्या पाण्यावर अदानी व अंबानीला हक्क गाजवू न देण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले.आळंदी येथे आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी डॉ. राजेंद्रसिंह यांना पहिला पसायदान राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी आणि कार्यवाह प्रकाश पायगुडे आदी उपस्थित होते.डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, ‘नदी वाचवण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी कितीही पैसा खर्च केला तरी, त्या कामाला योग्य दृष्टीची जोड मिळाली नाही, तर ते काम पूर्णत्वास जाऊ शकत नाही. त्यासाठी नदीवर प्रेम करणे, तिला समजून घेणे आवश्यक आहे. मी हाती घेतलेल्या नदी संवर्धनाच्या कार्यात कोणत्याही राजकारण्याकडून एकही पैसा घेतला नाही आणि कोणत्याही कॉपोर्रेट कंपनीला पाण्याचा एकही थेंब दिला नाही. कारण नदीच्या पाण्यावर पहिला हक्क हा शेतकरी बांधवाचा असतो. समाजात ज्ञानाचा दीप लावून कार्र्य पुढे नेण्यासाठी आपण पसायदानाचे तत्व अंगीकारले पाहिजे.’कौतिकराव ठाले-पाटील म्हणाले, ‘आजच्या समाजातही दहशत आणि भितीचे वातावरण आहे. त्यात फारसा फरक पडलेलला दिसत नाही. ज्ञानेश्वरांप्रमाणे आजच्या काळातही कोणीतरी आशेचा किरण दाखविण्याची गरज आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विविध संस्थांची सुमारे शंभर साहित्य संमेलने होतात, ही अतिशय महत्त्वाची बाब असून हे प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण लक्षण आहे.’डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, ‘स्त्री आणि पुरूष असा भेद न करता आपण सगळे प्रकृती आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. पंचतत्वांच्या मूळावर आज आपण घाव घालत आहोत. त्यातून आपण विनाशाकडे जात आहोत, असे वाटते. प्रकृतीच्या संवधार्नाचा, सृष्टीच्या संपन्नतेचा वारसा जपण्याचा निर्धार या संमेलनाच्या निमित्ताने आपण करायला हवा.’प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे