शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

नदीच्या शुद्धीकरणासाठी आत्मदृष्टी हवी - डॉ. राजेंद्रसिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 01:55 IST

केवळ पैशांनी नद्या स्वच्छ होणार नाहीत. त्यासाठी आपल्यातील व्यवहार, संस्कार आणि आत्मदृष्टीमध्ये परिवर्तन झाले पाहिजे. तरच आपली नदी स्वच्छ होऊ शकेल, नदीला समजून घेत नदीवर प्रेम करा. आमच्या पाण्यावर अदानी व अंबानीला हक्क गाजवू न देण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले.

आळंदी - केवळ पैशांनी नद्या स्वच्छ होणार नाहीत. त्यासाठी आपल्यातील व्यवहार, संस्कार आणि आत्मदृष्टीमध्ये परिवर्तन झाले पाहिजे. तरच आपली नदी स्वच्छ होऊ शकेल, नदीला समजून घेत नदीवर प्रेम करा. आमच्या पाण्यावर अदानी व अंबानीला हक्क गाजवू न देण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले.आळंदी येथे आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी डॉ. राजेंद्रसिंह यांना पहिला पसायदान राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी आणि कार्यवाह प्रकाश पायगुडे आदी उपस्थित होते.डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, ‘नदी वाचवण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी कितीही पैसा खर्च केला तरी, त्या कामाला योग्य दृष्टीची जोड मिळाली नाही, तर ते काम पूर्णत्वास जाऊ शकत नाही. त्यासाठी नदीवर प्रेम करणे, तिला समजून घेणे आवश्यक आहे. मी हाती घेतलेल्या नदी संवर्धनाच्या कार्यात कोणत्याही राजकारण्याकडून एकही पैसा घेतला नाही आणि कोणत्याही कॉपोर्रेट कंपनीला पाण्याचा एकही थेंब दिला नाही. कारण नदीच्या पाण्यावर पहिला हक्क हा शेतकरी बांधवाचा असतो. समाजात ज्ञानाचा दीप लावून कार्र्य पुढे नेण्यासाठी आपण पसायदानाचे तत्व अंगीकारले पाहिजे.’कौतिकराव ठाले-पाटील म्हणाले, ‘आजच्या समाजातही दहशत आणि भितीचे वातावरण आहे. त्यात फारसा फरक पडलेलला दिसत नाही. ज्ञानेश्वरांप्रमाणे आजच्या काळातही कोणीतरी आशेचा किरण दाखविण्याची गरज आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विविध संस्थांची सुमारे शंभर साहित्य संमेलने होतात, ही अतिशय महत्त्वाची बाब असून हे प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण लक्षण आहे.’डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, ‘स्त्री आणि पुरूष असा भेद न करता आपण सगळे प्रकृती आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. पंचतत्वांच्या मूळावर आज आपण घाव घालत आहोत. त्यातून आपण विनाशाकडे जात आहोत, असे वाटते. प्रकृतीच्या संवधार्नाचा, सृष्टीच्या संपन्नतेचा वारसा जपण्याचा निर्धार या संमेलनाच्या निमित्ताने आपण करायला हवा.’प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे