शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

नदीच्या शुद्धीकरणासाठी आत्मदृष्टी हवी - डॉ. राजेंद्रसिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 01:55 IST

केवळ पैशांनी नद्या स्वच्छ होणार नाहीत. त्यासाठी आपल्यातील व्यवहार, संस्कार आणि आत्मदृष्टीमध्ये परिवर्तन झाले पाहिजे. तरच आपली नदी स्वच्छ होऊ शकेल, नदीला समजून घेत नदीवर प्रेम करा. आमच्या पाण्यावर अदानी व अंबानीला हक्क गाजवू न देण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले.

आळंदी - केवळ पैशांनी नद्या स्वच्छ होणार नाहीत. त्यासाठी आपल्यातील व्यवहार, संस्कार आणि आत्मदृष्टीमध्ये परिवर्तन झाले पाहिजे. तरच आपली नदी स्वच्छ होऊ शकेल, नदीला समजून घेत नदीवर प्रेम करा. आमच्या पाण्यावर अदानी व अंबानीला हक्क गाजवू न देण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले.आळंदी येथे आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी डॉ. राजेंद्रसिंह यांना पहिला पसायदान राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी आणि कार्यवाह प्रकाश पायगुडे आदी उपस्थित होते.डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, ‘नदी वाचवण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी कितीही पैसा खर्च केला तरी, त्या कामाला योग्य दृष्टीची जोड मिळाली नाही, तर ते काम पूर्णत्वास जाऊ शकत नाही. त्यासाठी नदीवर प्रेम करणे, तिला समजून घेणे आवश्यक आहे. मी हाती घेतलेल्या नदी संवर्धनाच्या कार्यात कोणत्याही राजकारण्याकडून एकही पैसा घेतला नाही आणि कोणत्याही कॉपोर्रेट कंपनीला पाण्याचा एकही थेंब दिला नाही. कारण नदीच्या पाण्यावर पहिला हक्क हा शेतकरी बांधवाचा असतो. समाजात ज्ञानाचा दीप लावून कार्र्य पुढे नेण्यासाठी आपण पसायदानाचे तत्व अंगीकारले पाहिजे.’कौतिकराव ठाले-पाटील म्हणाले, ‘आजच्या समाजातही दहशत आणि भितीचे वातावरण आहे. त्यात फारसा फरक पडलेलला दिसत नाही. ज्ञानेश्वरांप्रमाणे आजच्या काळातही कोणीतरी आशेचा किरण दाखविण्याची गरज आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विविध संस्थांची सुमारे शंभर साहित्य संमेलने होतात, ही अतिशय महत्त्वाची बाब असून हे प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण लक्षण आहे.’डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, ‘स्त्री आणि पुरूष असा भेद न करता आपण सगळे प्रकृती आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. पंचतत्वांच्या मूळावर आज आपण घाव घालत आहोत. त्यातून आपण विनाशाकडे जात आहोत, असे वाटते. प्रकृतीच्या संवधार्नाचा, सृष्टीच्या संपन्नतेचा वारसा जपण्याचा निर्धार या संमेलनाच्या निमित्ताने आपण करायला हवा.’प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे