शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

मूळव्याधीविषयी मोकळेपणाने बोलण्याची गरज : सदानंद सरदेशमुख यांनी परिसंवादात व्यक्त केले मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 6:08 PM

जागतिक मूळव्याध दिनानिमित्त प्रकृती आयुर्वेदिक क्लिनिकतर्फे ‘मूळव्याधीवर प्रतिबंधात्मक उपचार’ या परिसंवादाचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते.

ठळक मुद्देमूळव्याध हा आजार उपद्रवी असून अजूनही त्याविषयी पुरेशी जागरुकता नाही : डॉ. कुणाल कामठेबसून काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक : डॉ. नंदकुमार बोरसे

पुणे : मूळव्याधीविषयी अजूनही लोकांमध्ये जागरुकता दिसत नाही. या आजारावर योग्यवेळी उपचार करणे गरजेचे असून समाजामध्ये जनजागृती व्हायला हवी. या आजाराविषयी मोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे, असे मत सेंट्रल काऊन्सिल आॅफ इंडियन मेडिसीनचे सदस्य डॉ. सदानंद सरदेशमुख यांनी व्यक्त केले.जागतिक मूळव्याध दिनानिमित्त प्रकृती आयुर्वेदिक क्लिनिकतर्फे ‘मूळव्याधीवर प्रतिबंधात्मक उपचार’ या परिसंवादाचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. यावेळी डॉ. शिवकुमार गोरे, डॉ. मिलिंद भोई, प्रकृती आयुर्वेदिक क्लिनिकचे डॉ. कुणाल कामठे, डॉ. शर्मिला कामठे, डॉ. नितीन बोरा, डॉ. धनराज गायकवाड, डॉ. नंदकुमार बोरसे, कर्नल संभाजी पाटील, अ‍ॅड. प्रताप परदेशी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पाईल्स केअर या अ‍ॅपचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. सरदेशमुख म्हणाले, ‘मूळव्याध या आजाराच्या उपचारांविषयी असलेल्या अनेक गोष्टी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मूळव्याध असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांनी तपासल्याशिवाय, त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारची औषधे घेऊ नयेत.’  डॉ. कुणाल कामठे म्हणाले, ‘मूळव्याध हा आजार उपद्रवी असून अजूनही त्याविषयी पुरेशी जागरुकता दिसून येत नाही. त्यामुळे या आजाराकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. हॉटेलमध्ये मिळणारे अन्नपदार्थ, जंक फूड टाळले पाहिजेत. दैनंदिन जीवनात आहार आणि व्यायाम यांचा समतोल राखल्यास अशाप्रकारचे आजार होणार नाहीत.’ डॉ. मिलींद भोई म्हणाले, ‘खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांमध्ये मूळव्याधीचे प्रमाण वाढले आहे. या आजाराविषयी जागृती होण्यासाठी लोकशिक्षण, लोकसभा अशा गोष्टी करणे आवश्यक आहे.’ डॉ. नंदकुमार बोरसे म्हणाले, ‘बसून काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक दिसून येते. फळभाज्या, पालेभाज्यांचा अधिक वापर, डाळीचे पदार्थ कमी खाणे, ताक पिणे, भरपूर पाणी पिणे या गोष्टींचे पालन केल्यास हा आजार आटोक्यात आणण्यास मदत होते.’ यावेळी कर्नल संभाजी पाटील, शिवकुमार गोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. 

टॅग्स :Healthआरोग्यPuneपुणे