शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

मूळव्याधीविषयी मोकळेपणाने बोलण्याची गरज : सदानंद सरदेशमुख यांनी परिसंवादात व्यक्त केले मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 18:11 IST

जागतिक मूळव्याध दिनानिमित्त प्रकृती आयुर्वेदिक क्लिनिकतर्फे ‘मूळव्याधीवर प्रतिबंधात्मक उपचार’ या परिसंवादाचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते.

ठळक मुद्देमूळव्याध हा आजार उपद्रवी असून अजूनही त्याविषयी पुरेशी जागरुकता नाही : डॉ. कुणाल कामठेबसून काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक : डॉ. नंदकुमार बोरसे

पुणे : मूळव्याधीविषयी अजूनही लोकांमध्ये जागरुकता दिसत नाही. या आजारावर योग्यवेळी उपचार करणे गरजेचे असून समाजामध्ये जनजागृती व्हायला हवी. या आजाराविषयी मोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे, असे मत सेंट्रल काऊन्सिल आॅफ इंडियन मेडिसीनचे सदस्य डॉ. सदानंद सरदेशमुख यांनी व्यक्त केले.जागतिक मूळव्याध दिनानिमित्त प्रकृती आयुर्वेदिक क्लिनिकतर्फे ‘मूळव्याधीवर प्रतिबंधात्मक उपचार’ या परिसंवादाचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. यावेळी डॉ. शिवकुमार गोरे, डॉ. मिलिंद भोई, प्रकृती आयुर्वेदिक क्लिनिकचे डॉ. कुणाल कामठे, डॉ. शर्मिला कामठे, डॉ. नितीन बोरा, डॉ. धनराज गायकवाड, डॉ. नंदकुमार बोरसे, कर्नल संभाजी पाटील, अ‍ॅड. प्रताप परदेशी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पाईल्स केअर या अ‍ॅपचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. सरदेशमुख म्हणाले, ‘मूळव्याध या आजाराच्या उपचारांविषयी असलेल्या अनेक गोष्टी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मूळव्याध असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांनी तपासल्याशिवाय, त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारची औषधे घेऊ नयेत.’  डॉ. कुणाल कामठे म्हणाले, ‘मूळव्याध हा आजार उपद्रवी असून अजूनही त्याविषयी पुरेशी जागरुकता दिसून येत नाही. त्यामुळे या आजाराकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. हॉटेलमध्ये मिळणारे अन्नपदार्थ, जंक फूड टाळले पाहिजेत. दैनंदिन जीवनात आहार आणि व्यायाम यांचा समतोल राखल्यास अशाप्रकारचे आजार होणार नाहीत.’ डॉ. मिलींद भोई म्हणाले, ‘खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांमध्ये मूळव्याधीचे प्रमाण वाढले आहे. या आजाराविषयी जागृती होण्यासाठी लोकशिक्षण, लोकसभा अशा गोष्टी करणे आवश्यक आहे.’ डॉ. नंदकुमार बोरसे म्हणाले, ‘बसून काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक दिसून येते. फळभाज्या, पालेभाज्यांचा अधिक वापर, डाळीचे पदार्थ कमी खाणे, ताक पिणे, भरपूर पाणी पिणे या गोष्टींचे पालन केल्यास हा आजार आटोक्यात आणण्यास मदत होते.’ यावेळी कर्नल संभाजी पाटील, शिवकुमार गोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. 

टॅग्स :Healthआरोग्यPuneपुणे