शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

गांधी विचारांची ‘केस’ लढण्याची गरज डॉ. रझिया पटेल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 12:18 IST

ही लढाई नथुराम विरोधातली नाही तर त्यामागे असलेल्या विचार आणि प्रेरणेची आहे.

ठळक मुद्दे ‘ओह माय गोडसे’ या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : सध्याचे सरकार हे भारतीय जनता पक्षाचे नव्हे तर संघाचे आहे. एकीकडे देश-विदेशात गांधींबद्दल बोलायचे आणि दुसरीकडे देशामधून हळूहळू गांधी संपवायचे असे प्रकार सुरू आहेत. आता आणीबाणीची वेळ आली आहे. गांधींच्या खुनाची केस घेऊन लढायचे की विचारांची? ही लढाई नथुराम विरोधातली नाही तर त्यामागे असलेल्या विचार आणि प्रेरणेची आहे. गांधी विचारांची केस लढण्याची गरज आहे, असे परखड विचार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रझिया पटेल यांनी व्यक्त केले. विश्वकर्मा पब्लिकेशनच्या वतीने विनायक होगाडे  लिखित ‘ओह माय गोडसे’ या पुस्तक प्रकाशनाप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी प्रसिद्ध कायदे अभ्यासक असीम सरोदे, प्रकाशक मनोहर सोनावणे आणि लेखक विनायक होगाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुभाष वारे यांनी भूषविले. गांधींबद्दल कपोलकल्पित कथा सांगितल्या जात असून, गोबेल्स नीती म्हणजे त्यांच्याबद्दलच्या खोट्या गोष्टी कशा खºया आहेत हे जनतेच्या मनावर वारंवार बिंबवून त्यांना सातत्याने मारण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगून रझिया पटेल म्हणाल्या, हिंदुतत्ववाद्यांना सामाजिक न्याय, समता, एकात्मकता, धर्मनिरपेक्षता, यावर काम करणारेी लोक शत्रू वाटत असून, त्यांना संपविले जात आहे. नथुराम जरी संपला असला तरी त्यामागची प्रवृत्ती संपलेली नाही. पालकांना आपण कशाच्या बदल्यात काय देतोय हे कळलं नाही तर नथुराम तयार होत राहातील.  लेखक विनायक  होगाडे आणि सुभाष वारे यांनीही मनोगत व्यक्त केले...........गांधी आपल्या काळातील  मोठं वास्तव आहे. गांधी आणि आंबेडकर यांचा हात सोडल्यामुळे गांधी अनाथ झाल्यासारखे झाले आहेत. त्यामुळे भाजप गांधी हायजॅक करत आहेत. वृत्तवाहिन्यांनी महात्मा गांधी नायक की खलनायक हा कार्यक्रम करावा. जेवढे ते खलनायक सांगितले जातील. तेवढे ते नायक म्हणून पुढं येतील. गांधी कधीच कालबाह्य होऊ शकत नाही. गांधी विचार टाकून दिला तर अस्मितेच्या आधारे हिंसाचाराची स्थिती उदभवू शकते. त्यामुळे आता राष्ट्रपिता आणि महात्मा गांधी संतस्वरूपात नव्हे तर क्रांतिकारी रूपात पुढे आणण्याची गरज आहे.  - अँड असीम सरोदे ........

टॅग्स :PuneपुणेMahatma Gandhiमहात्मा गांधीNathuram Godseनथुराम गोडसे