शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

सायबर सुरक्षा काळाची गरज : हॅरल्ड डिकोस्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 18:37 IST

वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून सायबर गुन्हे घडतात. त्यामुळे सायबर सुरक्षा काळाची गरज बनली आहे.

ठळक मुद्दे ‘वाढती गुन्हेगारी’ विषयावर व्याख्यानआपली कोणतीही वैयक्तिक माहिती इंटरनेटवर टाकू नका

पुणे : भारतात कोट्यवधी लोक इंटरनेटचा वापर करतात. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अ‍ॅपवर आपण वैयक्तिक माहिती टाकत असतो. परंतु, ही माहिती कोणत्या सर्व्हरमध्ये जतन केली जात आहे, याबद्दल आपल्याला माहिती नसते. वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून सायबर गुन्हे घडतात. त्यामुळे सायबर सुरक्षा काळाची गरज बनली आहे. स्वच्छ भारतप्रमाणे स्वच्छ इंटरनेट सेवा देखील आपल्याला मिळायला हवी, असे मत सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ हॅरल्ड डिकॉस्टा यांनी व्यक्त केले. आॅल इंडिया अ‍ॅन्टी करप्शन, क्राईम प्रिव्हेंटिव्ह अँड ह्युमन राईट्स कमिटी पुणे शहर व जिल्हातर्फे ‘सायबर क्राईम आणि वाढती गुन्हेगारी’ याविषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्र कडू, स्वप्निल खडके, सचिन फोलाने, नितीन गावडे, धीरज अरगडे, निलेश डहाळे, आयोजक मकरंद कलबुर्गी आदी उपस्थित होते. डिकॉस्टा म्हणाले, ‘इंटरनेटवरून आपण मोबाईलमध्ये विविध अ‍ॅप डाऊनलोड करतो. परंतु, डाऊनलोड करताना त्याच्या नियम व अटी वाचत नाही. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅॅपचा सर्व्हर अमेरिकेत असून तुमची सगळी माहिती त्यांच्याकडे जतन होते. त्यामुळे आपल्या माहितीचा दुरुपयोग होऊ नये यासाठी प्रत्येकाने दक्षता घ्यायला हवी.’ ते म्हणाले, ‘आपली कोणतीही वैयक्तिक माहिती इंटरनेटवर टाकू नका. आपली गोपनीय माहिती मेसेजच्या माध्यमातून पाठवू नका. मोबाईल, लॅपटॉप स्वत: खरेदी केलेलेच वापरा. आपला मोबाईल, लॅपटॉप, क्रेडीट-डेबीट कार्ड स्वत:जवळ ठेवा. रात्रीच्या वेळेत मोबाईलमधील इंटरनेट बंद ठेवा. कारण यावेळेमध्ये अधिक गुन्हे घडण्याची शक्यता असते. ग्रामीण भागातील लोकांनाही याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.’  

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमSocial Mediaसोशल मीडिया