शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सायबर सुरक्षा काळाची गरज : हॅरल्ड डिकोस्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 18:37 IST

वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून सायबर गुन्हे घडतात. त्यामुळे सायबर सुरक्षा काळाची गरज बनली आहे.

ठळक मुद्दे ‘वाढती गुन्हेगारी’ विषयावर व्याख्यानआपली कोणतीही वैयक्तिक माहिती इंटरनेटवर टाकू नका

पुणे : भारतात कोट्यवधी लोक इंटरनेटचा वापर करतात. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अ‍ॅपवर आपण वैयक्तिक माहिती टाकत असतो. परंतु, ही माहिती कोणत्या सर्व्हरमध्ये जतन केली जात आहे, याबद्दल आपल्याला माहिती नसते. वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून सायबर गुन्हे घडतात. त्यामुळे सायबर सुरक्षा काळाची गरज बनली आहे. स्वच्छ भारतप्रमाणे स्वच्छ इंटरनेट सेवा देखील आपल्याला मिळायला हवी, असे मत सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ हॅरल्ड डिकॉस्टा यांनी व्यक्त केले. आॅल इंडिया अ‍ॅन्टी करप्शन, क्राईम प्रिव्हेंटिव्ह अँड ह्युमन राईट्स कमिटी पुणे शहर व जिल्हातर्फे ‘सायबर क्राईम आणि वाढती गुन्हेगारी’ याविषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्र कडू, स्वप्निल खडके, सचिन फोलाने, नितीन गावडे, धीरज अरगडे, निलेश डहाळे, आयोजक मकरंद कलबुर्गी आदी उपस्थित होते. डिकॉस्टा म्हणाले, ‘इंटरनेटवरून आपण मोबाईलमध्ये विविध अ‍ॅप डाऊनलोड करतो. परंतु, डाऊनलोड करताना त्याच्या नियम व अटी वाचत नाही. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅॅपचा सर्व्हर अमेरिकेत असून तुमची सगळी माहिती त्यांच्याकडे जतन होते. त्यामुळे आपल्या माहितीचा दुरुपयोग होऊ नये यासाठी प्रत्येकाने दक्षता घ्यायला हवी.’ ते म्हणाले, ‘आपली कोणतीही वैयक्तिक माहिती इंटरनेटवर टाकू नका. आपली गोपनीय माहिती मेसेजच्या माध्यमातून पाठवू नका. मोबाईल, लॅपटॉप स्वत: खरेदी केलेलेच वापरा. आपला मोबाईल, लॅपटॉप, क्रेडीट-डेबीट कार्ड स्वत:जवळ ठेवा. रात्रीच्या वेळेत मोबाईलमधील इंटरनेट बंद ठेवा. कारण यावेळेमध्ये अधिक गुन्हे घडण्याची शक्यता असते. ग्रामीण भागातील लोकांनाही याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.’  

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमSocial Mediaसोशल मीडिया