शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

व्यंगचित्रांकडे पाहण्याची निकोप दृष्टी निर्माण होण्याची गरज : शि.द फडणीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 17:42 IST

सध्याच्या काळात छोट्या छोट्या गोष्टींवरून लोकांच्या भावना दुखावतात. त्यासाठी निकोप दृष्टी निर्माण होण्याची गरजअसून, चित्रसाक्षरता महत्वाची आहे.

ठळक मुद्देपाच दशकांहून अधिककाळ वाचकांना हसविणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द फडणीस यांच्याशी संवाद

गतकालीन/ समकालीन व्यक्ती, घटना किंवा प्रसंग यात दडलेल्या विसंगत स्वरूपाच्या सूचित अर्थांचे मार्मिक आविष्कारातून रंजन करण्याची हातोटी व्यगंचित्रकारांकडे असते. कोरोना काळातही आपल्या अर्थपूर्ण व्यंगचित्रांद्वारे रसिकांच्या ओठावर हास्य फुलविण्याची जबाबदारी व्यंगचित्रकार पार पाडत आहेत. आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीने गेल्या पाच दशकांहून अधिककाळ वाचकांना हसविणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द फडणीस यांच्याशी 'लोकमत' ने संवाद साधला. सध्याच्या काळात छोट्या छोट्या गोष्टींवरून लोकांच्या भावना दुखावतात. त्यासाठी निकोप दृष्टी निर्माण होण्याची गरजअसून, चित्रसाक्षरता महत्वाची आहे, असे मत त्यांनी नोंदविले.--------------------------------------------------------------------------------------------नम्रता फडणीस* एक काळ असा होता की वृत्तपत्र, मासिकांमध्ये व्यंगचित्रांना प्रामुख्याने स्थान होते. मात्र आज माध्यमांमधून व्यगंचित्र काहीशी हद्द पार झाली आहेत. या स्थितीकडे तुम्ही कसे पाहाता?- वृत्तपत्र किंवा इतर तत्सम माध्यमांमध्ये व्यंगचित्रांना स्थान उरलेले नाही. यात काही अंशी तथ्य असलं तरी नवीन माध्यमं समोर येत आहेत.संमेलनांमध्ये व्यंगचित्र प्रदर्शनं किंवा मेळाव्यांना नव्या पिढीचाउत्तम प्रतिसाद मिळतोय. आता अभिव्यक्तीच माध्यमही बदललयं. सोशल मीडियावरव्यंगचित्रकार मोठ्या प्रमाणावर व्यंगचित्रं प्रसिद्ध करीत आहेत.* या नव्या माध्यमाबददलचं तुमचं निरीक्षण काय?-जी माध्यमं जन्माला येतात. ती स्वत:च स्थान घेऊन येतात. त्याचही स्वागत करायला हवं. पण ते कशा पद्धतीने स्वीकारल पाहिजे हे शेवटीमाध्यमकतर््यांच्या हातात आहे. हे माध्यम मुक्त असल्याने काही अनिष्टगोष्टी येऊ शकतात. ज्या तुम्हाला थांबवता येऊ शकत नाही. वृत्तपत्रामध्येकसे तुम्हाला जबाबदार धरता येऊ शकते. नव्या पिढीने या माध्यमाचाजबाबदारीने उपयोग केला पाहिजे.* नव्या युगात व्यंगचित्राची भाषा बदलली आहे का?-पूर्वीच्या काळी मी व्यक्तिश: व्यंगचित्रांसाठी शब्दांचा वापर खूप कमी करीत असे. मात्र  वर्तमान काळात शब्द माध्यमातूनही व्यंगचित्रं रेखाटली जात आहेत. दोन्हीचेही स्वागत करायला पाहिजे. परंतु एक आहे की शब्दविरहित व्यंगचित्र असतं तेव्हा त्याचा कँनव्हासही खूप मोठा असतो. प्रादेशिक भाषांमधले देखील त्याचा आस्वाद घेतला जाऊ शकतो. म्हणूनच आजही आंध्र प्रदेश, तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये छोट्या छोट्या मासिकांनी शब्दविरहित व्यंगचित्रांची परंपरा जपली आहे.* नवोदितांनी व्यगंचित्रे साकारताना कोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे?-व्यगंचित्रांची भाषा, त्याचे व्याकरण आत्मसात केले पाहिजे. मगचंकल्पनेला चित्ररूप द्यायला हकं. आपल्याला नक्की काय म्हणायचयं याचा अर्थबोध समोरच्याला समजला पाहिजे. जे शब्दातून व्यक्त होत नाही ते प्रभावीपणेचित्रांमधून मांडता आले पाहिजे. त्यासाठी सामाजिक घडामोडींचे निरीक्षणउत्तमप्रकारे करता आलं पाहिजे.* सध्याचे देशातील वातावरण व्यगंचित्रकारांसाठी पोषक आहे का? व्यंगचित्रकारांपुढची आव्हाने काय वाटतात?-पंडित नेहरूंच्या काळात व्यंगचित्रकार शंकर यांची चित्रे अत्यंत तिखट असायची. त्यावर निषेध नोंदविले गेले. नाराजीही व्यक्त झाली. मात्र तेकुणी बंद केले नाही. मात्र सध्याचा काळ असा नाही. कुणाच्या तरी लगेचभावना दुखावल्या जातात. निकोप दृष्टीकोन बाळगण्याची गरज आहे. त्यासाठीचित्र साक्षरता निर्माण व्हायला हवी. केवळ व्यंगचित्र म्हणजे राजकीय असंनाहीये. करमणूक, शैक्षणिक, विचारप्रवाहासाठी म्हणून देखील व्यंगचित्र हेमाध्यमं उपयुक्त आहे. ते जतन केले पाहिजे.----------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेCartoonistव्यंगचित्रकार