शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

पीक पद्धतीत बदलाची गरज

By admin | Updated: September 1, 2015 03:52 IST

दुष्काळाची तीव्रता वाढत असताना, बारामतीच्या जिरायती भागातील पेरण्या संपूर्णपणे वाया गेल्या आहेत. पावसाच्या अनिश्तितेच्या पार्श्वभूमीवर बागायती

बारामती : दुष्काळाची तीव्रता वाढत असताना, बारामतीच्या जिरायती भागातील पेरण्या संपूर्णपणे वाया गेल्या आहेत. पावसाच्या अनिश्तितेच्या पार्श्वभूमीवर बागायती भागातील शेतकऱ्यांनीही पीकपद्धतीत बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. बागायती भागातील शेतकऱ्यांनी नियंत्रित शेतीकडे वळाले पाहिजे तरच दुष्काळी परिस्थितीत बागायती भागातील शेती वाचेल, असे मत शेतीतज्ज्ञांनी व्यक्त केले.धरण परिसरातही पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठे पिण्यासाठी आरक्षित केले जाऊ शकतात. सध्या जे पाणी आहे त्याचा शेततळ्यांच्या माध्यमातून साठा करणे गरजेचे आहे. त्यावर कमी पाण्यावर येणारी आणि आर्थिक उत्पन्न मिळवून देणारी पिके घ्यावी, असे आवाहनही शेतीतज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. सध्या पावसाळी ऋतूचा शेवटचा महिना सुरू आहे. या महिन्यातही दुर्दैवाने जर पाऊस पडला नाही, तर पुढील काळात बागायती भागात सध्या केल्या जाणाऱ्या ऊस लागवडींना फटका बसू शकतो. खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांच्या वाढत्या स्पर्धेमुळे उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामानाने उसाचे दर कमालीचे घसरले आहेत. उत्पादन खर्चाचा विचार करता सध्या उसाला मिळणारा दर शेतकऱ्याला परवडणारा नाही. असे असताना आता पाण्याअभावी ऊसशेतीदेखील धोक्यात आली आहे. बारामती-इंदापूर परिसरातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसलागवडी झाल्या आहेत. उसापेक्षा मक्याची लागवड फायद्याची उसापेक्षा मकापिकाला पाणी कमी लागते. तसेच हे पीक तीन महिन्यांच्या कालावधीत येते. सध्या मका प्रतिक्विंटल १२८० रुपये दराने विकली जात आहे. एकरी अंदाजे सरासरी २० ते २५ क्विंटल मक्याचे उत्पादन निघाले तरी उसापेक्षा मका शेतकऱ्याला फायद्याची ठरणार आहे. तसेच मक्याचा उत्पादन खर्चदेखील कमी आहे. मात्र उसाचा उत्पादन खर्च मिळणाऱ्या दराच्या तुलनेत कमालीचा वाढला आहे. मशागतीपासून ते बांधणीपर्यंत ३० ते ३५ हजारांपर्यंत उसाचा उत्पादन खर्च जातो. विहिरींच्या पाण्याची पातळी खोलवर...सध्या नीरा नदीत वाळूमाफियांचे रात्रंदिवस वाळू उपशाचे काम वेगाने सुरू आहे. गावातील बोअरवेल व विहिरींच्या पाण्याची पातळी अधिकच खोल गेली आहे. इंदापूरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी निमसाखर या ठिकाणी गावालगतचा वाळूउपसा त्वरित बंद करावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे. निरवांगी : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निरवांगी, निमसाखर, दगडवाडी, हगारवाडी, रणगाव या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाटबंधारे खात्याचे पाणी वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर जळून खाक झाली आहेत. मात्र, एकही शासकीय व राजकीय पदाधिकारी साधी पाहणी व चौकशीसाठीसुद्धा फिरकले नसल्याचे चित्र आहे. इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत या भागाला तत्काळ भेट द्यावी. येथील सर्व पिकांची पाहणी करावी, अशी मागणी निमसाखर येथील चंद्रकांत गोपाळराव रणवरे यांनी केली आहे.