शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy Meeting Updates: खूशखबर! ईएमआयचा भार होणार कमी, सामान्यांना मोठा दिलासा, रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात
2
भाजपापाठोपाठ उद्धव ठाकरेंचाही शिंदेसेनेला दणका, तर राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; २ दिवसात काय घडलं?
3
"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ
4
'रोलेक्स'ला जगभरात इतकी मागणी का? ४-५ वर्षांचा वेटींग परियड? ९९% लोकांना कारण माहिती नसेल
5
Rupee Fall Reason Explained: रुपया घसरण्याचे नेमके कारण काय?
6
आणखी ३० टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतं सोनं; 'या' कारणामुळे येऊ शकते जोरदार तेजी, कोणी केली भविष्यवाणी?
7
असीम मुनीर आयुष्यभर वर्दीवरच राहतील, कधीच अटक होणार नाही; पाकिस्तान सैन्याचे सीडीएफ म्हणून नियुक्ती
8
इंडिगोची ५५० उड्डाणे रद्द, DGCA ची कारवाई; नियोजनात मोठी चूक, विमान कंपनीने माफी मागितली
9
सायको पूनम! २ वर्षांत ४ चिमुकल्यांचा जीव घेतला; पोटच्या पोरालाही सोडलं नाही, चौकशीत गूढ उकळलं
10
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
11
Sonu Nigam Property Deal: सोनू निगमनं मुंबईत रेंटवर दिली प्रॉपर्टी, महिन्याचं भाडं पाहून अवाक् व्हाल; डिपॉझिट म्हणूनच मिळाले ९० लाख
12
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
13
"स्वत: काहीही साध्य केलं नाही, ते रोहित- विराटचं भविष्य ठरवतात" Harbhajan Singh भडकला!
14
रुपया रडविणार, खिसा रिकामा करणार! महागाईचा फटका सामान्यांना बसणार; निर्यातदारांना मात्र फायदा
15
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
16
जगभर: माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने दिला खासदारकीचा राजीनामा, रशिया-युक्रेन युद्धाशी कनेक्शन काय?
17
"भारत नशीबवान आहे की, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला"- व्लादिमीर पुतिन
18
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी
19
अग्रलेख: नव्वदीचा रुपया काय म्हणतो? सरकारची झोप उडाली नसेल तर ती उडायला हवी
20
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
Daily Top 2Weekly Top 5

प्रथम पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज- मेधा कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 02:08 IST

प्रत्येक कुटुंबातील मुलांवर चांगले संस्कार होतील आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होऊ शकेल, असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

मुलावर संस्कार करताना तू कोणत्याही मुलीचा अपमान करणार नाहीस, तुझ्या हातून असे काही कृत्य घडल्यास तुला शिक्षा देण्यासाठी मी सर्वांत पुढे असेन, असे आई-वडिलांनी सांगितल्यास पुढील पिढीची मानसिकता बदलण्यास सुरुवात होऊ शकते. पालकांनी आपल्या मुलांची जबाबदारी घेतल्यास प्रत्येक कुटुंबातील मुलांवर चांगले संस्कार होतील आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होऊ शकेल, असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.‘ती’ची अस्मिता टिकवण्याच्या, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ‘लोकमत’ने उचललेले पाऊल स्तुत्य आहे. समाजाची जडणघडण करण्यामध्ये ‘लोकमत’ने पुढचे पाऊल टाकले आहे. गणपती कोणी बसवला, आरती कोणी केली, गणेश मंडळांमध्ये किती महिला पदाधिकारी आहेत, या बाबी महत्त्वाच्या आहेतच; मात्र, याबरोबरच मंडळात जे पदाधिकारी आहेत किंवा गणपती पाहण्यासाठी जे लोक येतात, त्यांच्या मनात महिलांबद्दल किती आदराची भावना आहे, यावरही महिलांची सुरक्षितता अवलंबून आहे. गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांमध्ये महिलांचा समावेश असायलाच हवा. जेणेकरून, मंडळाच्या कार्यपद्धतींमध्ये आखीव-रेखीवपणा येऊ शकतो. मंडळांची विशिष्ट आचारसंहिता तयार होऊन तिचे पालन केले जाईल. जिथे महिला आहेत, तिथे शिस्तप्रियता आहे, असा सार्वत्रिक अनुभव आहे. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये, विशेषत: गणेश मंडळांमध्ये महिलांचा समावेश, सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. यातून अवैध गोष्टींना आळा बसू शकतो. शिस्त आल्यामुळे गणेशोत्सवाचे रूप पालटण्यासही मदत होऊ शकते.दहा दिवसांमध्ये शहरात गणपती पाहण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी असते. यामध्ये महिला, तरुणींचाही समावेश असतो. बरेचदा, महिलांना छेडछाड, शेरेबाजी अशा घटनांना सामोरे जावे लागते आणि मनात भीती उत्पन्न होते. महिला, तरुणींना निर्भयपणे गणपती पाहण्यासाठी येता यावे, सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, यासाठी प्रत्येकाच्या मानसिकतेमध्ये बदल होण्याची गरज आहे. आपल्याही घरामध्ये आई, पत्नी, बहीण, मुलगी असते, त्याप्रमाणे गणपती पाहायला येणाºया महिलाही कोणाची तरी बहीण, मुलगी असतात. त्यामुळे त्यांची सुरक्षितता ही आपलीच जबाबदारी आहे, अशा स्वरूपाची मानसिकता प्रत्येक पुरुषामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे.शाळकरी मुलगी असो महिला अथवा वृद्ध स्त्री, आजकाल समाजात कोणत्याही वयाची महिला सुरक्षित नाही. तिने कोणती चूक केली, म्हणून तिच्यावर अत्याचार झाला? यामध्ये मुलींची कोणत्याही प्रकारची चूक नसून, पुरुषांच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. स्त्रीचा आदर करण्याचे संस्कार बिंबवण्याची सुरुवात घरापासूनच होते. यासाठी आई-वडिलांनी पुढाकार घ्यायला हवा. प्रत्येकाने आपल्या मुलांच्या जडणघडणाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडायला हवी. घरामध्ये मुलगा आणि मुलीवर समान संस्कार करण्याची गरज आहे. मुलीची जडणघडण करताना ‘तू घाबरू नकोस, निर्भयपणे जग, कोणताही न्यूनगंड बाळगू नकोस, तू मुलापेक्षा कोणत्याही गोष्टीत कमी नाहीस’, हा एक संस्कारांचा भाग आहे. समाजाची कल्पना देतानाच तुझ्यावर काही आघात झाल्यास तू त्याचा कशा प्रकारे सामना केला पाहिजे, त्यासाठी कशा पद्धतीने ठाम राहशील, अशी प्रवृत्ती मुलींमध्ये निर्माण केली पाहिजे. मुलावर संस्कार करताना तू कोणत्याही मुलीचा अपमान करणार नाहीस, तुझ्या हातून असे काही कृत्य घडल्यास तुला शिक्षा देण्यासाठी मी सर्वांत पुढे असेन, असे आई-वडिलांनी सांगितल्यास पुढील पिढीची मानसिकता बदलण्यास किमान सुरुवात होऊ शकते. पालकांनी केवळ आपल्या मुलांची जबाबदारी घेतल्यास प्रत्येक कुटुंबातील मुलांवर चांगले संस्कार होतील आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होऊ शकेल. सार्वजनिक उत्सवांच्या वेळी महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य मिळू शकेल. पुरुषांची मानसिकता बदलल्यास अत्याचारांचे प्रमाण रोखता येईल आणि ‘ती’च्या दृष्टीने प्रत्येक दिवस उत्सवी आणि सुरक्षित होईल.

टॅग्स :BJPभाजपाPuneपुणे