शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

प्रथम पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज- मेधा कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 02:08 IST

प्रत्येक कुटुंबातील मुलांवर चांगले संस्कार होतील आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होऊ शकेल, असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

मुलावर संस्कार करताना तू कोणत्याही मुलीचा अपमान करणार नाहीस, तुझ्या हातून असे काही कृत्य घडल्यास तुला शिक्षा देण्यासाठी मी सर्वांत पुढे असेन, असे आई-वडिलांनी सांगितल्यास पुढील पिढीची मानसिकता बदलण्यास सुरुवात होऊ शकते. पालकांनी आपल्या मुलांची जबाबदारी घेतल्यास प्रत्येक कुटुंबातील मुलांवर चांगले संस्कार होतील आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होऊ शकेल, असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.‘ती’ची अस्मिता टिकवण्याच्या, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ‘लोकमत’ने उचललेले पाऊल स्तुत्य आहे. समाजाची जडणघडण करण्यामध्ये ‘लोकमत’ने पुढचे पाऊल टाकले आहे. गणपती कोणी बसवला, आरती कोणी केली, गणेश मंडळांमध्ये किती महिला पदाधिकारी आहेत, या बाबी महत्त्वाच्या आहेतच; मात्र, याबरोबरच मंडळात जे पदाधिकारी आहेत किंवा गणपती पाहण्यासाठी जे लोक येतात, त्यांच्या मनात महिलांबद्दल किती आदराची भावना आहे, यावरही महिलांची सुरक्षितता अवलंबून आहे. गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांमध्ये महिलांचा समावेश असायलाच हवा. जेणेकरून, मंडळाच्या कार्यपद्धतींमध्ये आखीव-रेखीवपणा येऊ शकतो. मंडळांची विशिष्ट आचारसंहिता तयार होऊन तिचे पालन केले जाईल. जिथे महिला आहेत, तिथे शिस्तप्रियता आहे, असा सार्वत्रिक अनुभव आहे. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये, विशेषत: गणेश मंडळांमध्ये महिलांचा समावेश, सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. यातून अवैध गोष्टींना आळा बसू शकतो. शिस्त आल्यामुळे गणेशोत्सवाचे रूप पालटण्यासही मदत होऊ शकते.दहा दिवसांमध्ये शहरात गणपती पाहण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी असते. यामध्ये महिला, तरुणींचाही समावेश असतो. बरेचदा, महिलांना छेडछाड, शेरेबाजी अशा घटनांना सामोरे जावे लागते आणि मनात भीती उत्पन्न होते. महिला, तरुणींना निर्भयपणे गणपती पाहण्यासाठी येता यावे, सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, यासाठी प्रत्येकाच्या मानसिकतेमध्ये बदल होण्याची गरज आहे. आपल्याही घरामध्ये आई, पत्नी, बहीण, मुलगी असते, त्याप्रमाणे गणपती पाहायला येणाºया महिलाही कोणाची तरी बहीण, मुलगी असतात. त्यामुळे त्यांची सुरक्षितता ही आपलीच जबाबदारी आहे, अशा स्वरूपाची मानसिकता प्रत्येक पुरुषामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे.शाळकरी मुलगी असो महिला अथवा वृद्ध स्त्री, आजकाल समाजात कोणत्याही वयाची महिला सुरक्षित नाही. तिने कोणती चूक केली, म्हणून तिच्यावर अत्याचार झाला? यामध्ये मुलींची कोणत्याही प्रकारची चूक नसून, पुरुषांच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. स्त्रीचा आदर करण्याचे संस्कार बिंबवण्याची सुरुवात घरापासूनच होते. यासाठी आई-वडिलांनी पुढाकार घ्यायला हवा. प्रत्येकाने आपल्या मुलांच्या जडणघडणाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडायला हवी. घरामध्ये मुलगा आणि मुलीवर समान संस्कार करण्याची गरज आहे. मुलीची जडणघडण करताना ‘तू घाबरू नकोस, निर्भयपणे जग, कोणताही न्यूनगंड बाळगू नकोस, तू मुलापेक्षा कोणत्याही गोष्टीत कमी नाहीस’, हा एक संस्कारांचा भाग आहे. समाजाची कल्पना देतानाच तुझ्यावर काही आघात झाल्यास तू त्याचा कशा प्रकारे सामना केला पाहिजे, त्यासाठी कशा पद्धतीने ठाम राहशील, अशी प्रवृत्ती मुलींमध्ये निर्माण केली पाहिजे. मुलावर संस्कार करताना तू कोणत्याही मुलीचा अपमान करणार नाहीस, तुझ्या हातून असे काही कृत्य घडल्यास तुला शिक्षा देण्यासाठी मी सर्वांत पुढे असेन, असे आई-वडिलांनी सांगितल्यास पुढील पिढीची मानसिकता बदलण्यास किमान सुरुवात होऊ शकते. पालकांनी केवळ आपल्या मुलांची जबाबदारी घेतल्यास प्रत्येक कुटुंबातील मुलांवर चांगले संस्कार होतील आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होऊ शकेल. सार्वजनिक उत्सवांच्या वेळी महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य मिळू शकेल. पुरुषांची मानसिकता बदलल्यास अत्याचारांचे प्रमाण रोखता येईल आणि ‘ती’च्या दृष्टीने प्रत्येक दिवस उत्सवी आणि सुरक्षित होईल.

टॅग्स :BJPभाजपाPuneपुणे