शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

NCP शरद पवारांचाही आणि आमचाही, अंतिम निर्णय निवडणूक आयोग देणार- वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 12:51 IST

आपल्या पक्षाला किती पाठिंबा आहे, हे दाखवून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र करून द्यावे...

मंचर (पुणे) : भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय हा एकटे अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांचा नाही, तर बहुसंख्य आमदार व पक्षातील कार्यकर्त्यांचा आहे. या संदर्भात शरद पवार यांच्याशी दोनवेळा चर्चा झाली होती. मात्र, त्यांनी नाही म्हणून सांगितले. आपण भाजपत गेलेलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आपला पक्ष असून, आपण पक्षातच आहोत, असे सांगून वळसे पाटील म्हणाले, आता निर्णय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची व आपलीही आहे. अंतिम निर्णय निवडणूक आयोग देणार आहे. आपल्या पक्षाला किती पाठिंबा आहे, हे दाखवून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र करून द्यावे.

आंबेगाव तालुक्यातून पाच हजार प्रतिज्ञापत्र द्यावीत, अशी सूचना त्यांनी केली. सार्वजनिक जीवनात वावरताना कुणाबद्दलही वाईट बोललो नाही. मात्र, आजकाल काही कार्यकर्ते माझ्याबद्दल काय बोलतात ते कानावर येते. अशा कार्यकर्त्यांना वाईट नाही तर सौम्य भाषेत उत्तर द्या. माझ्यासाठी आमदारकी, मंत्रिपद, मानमरतब महत्त्वाचे नाही. डिंभे धरणातून बोगदा करून माणिकडोहला पाणी नेण्याचा घाट घातला आहे. बोगद्याचा आकार एवढा आहे की, पूर्ण क्षमतेने पाणी नेले तर धरण तीन महिन्यांत रिकामे होईल. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार नाही. परिणामी चार तालुक्यांत १९७२ च्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होईल. आपले पाणी शाबूत ठेवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

देवदत्त निकम यांच्यावर वळसे पाटील यांनी कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, दहा वर्षे कारखान्याचे अध्यक्षपद, बाजार समितीचे सभापतिपद सांभाळत असताना गावागावात जाऊन गट पाडणे, भांडणे लावण्याचे काम त्यांनी केले. पक्षाच्या नावाने कुंकू लावून फिरायचे व गावागावात आपल्याच पक्षाच्या लोकांत भांडणे लावून गट पाडायचे काम त्यांनी केले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत आपला एक उमेदवार पराभूत झाला. त्याचा दोष जनतेला नाही तर आपल्या पक्षातील काही लोकांनी आतून मदत केली आहे. पक्षात ज्याला राहायचे त्यांनी आनंदाने राहावे, ज्यांना नाही राहायचे त्यांनी आनंदाने जावे, असा इशारा त्यांनी दिला. आपण गाफील राहता कामा नये. जास्तीत जास्त संपर्क वाढवून प्रत्येकाने वाडी-वस्तीवर फिरावे. राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षभरात राहिलेले सर्व प्रश्न सोडवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये जाण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. भाजपत नाही तर एनडीए गठबंधनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात शरद पवार हे वेगळ्या पद्धतीचा निर्णय घेतील, असे वाटते. असे सांगून त्यांच्या अडचणी दूर होतील तेव्हा पवार आपल्यासोबत येतील, असा आशावाद व्यक्त केला. राजकीय स्थित्यंतर होऊन अजित पवार मुख्यमंत्री झाले तर तालुक्याचा विकासरथ वेगाने पुढे जाईल. सकारात्मक विचार ठेवा, जे काही घडेल ते चांगले घडेल, असे जगताप म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णूकाका हिंगे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, संचालक दादाभाऊ पोखरकर, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव, युवक अध्यक्ष अंकित जाधव, महिला अध्यक्ष सुषमा शिंदे, कैलासबुवा काळे, भगवान वाघ, सुभाष मोरमारे आदी उपस्थित होते. नीलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले तर उपसभापती सचिन पानसरे यांनी आभार मानले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलPuneपुणे