शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

NCP शरद पवारांचाही आणि आमचाही, अंतिम निर्णय निवडणूक आयोग देणार- वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 12:51 IST

आपल्या पक्षाला किती पाठिंबा आहे, हे दाखवून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र करून द्यावे...

मंचर (पुणे) : भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय हा एकटे अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांचा नाही, तर बहुसंख्य आमदार व पक्षातील कार्यकर्त्यांचा आहे. या संदर्भात शरद पवार यांच्याशी दोनवेळा चर्चा झाली होती. मात्र, त्यांनी नाही म्हणून सांगितले. आपण भाजपत गेलेलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आपला पक्ष असून, आपण पक्षातच आहोत, असे सांगून वळसे पाटील म्हणाले, आता निर्णय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची व आपलीही आहे. अंतिम निर्णय निवडणूक आयोग देणार आहे. आपल्या पक्षाला किती पाठिंबा आहे, हे दाखवून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र करून द्यावे.

आंबेगाव तालुक्यातून पाच हजार प्रतिज्ञापत्र द्यावीत, अशी सूचना त्यांनी केली. सार्वजनिक जीवनात वावरताना कुणाबद्दलही वाईट बोललो नाही. मात्र, आजकाल काही कार्यकर्ते माझ्याबद्दल काय बोलतात ते कानावर येते. अशा कार्यकर्त्यांना वाईट नाही तर सौम्य भाषेत उत्तर द्या. माझ्यासाठी आमदारकी, मंत्रिपद, मानमरतब महत्त्वाचे नाही. डिंभे धरणातून बोगदा करून माणिकडोहला पाणी नेण्याचा घाट घातला आहे. बोगद्याचा आकार एवढा आहे की, पूर्ण क्षमतेने पाणी नेले तर धरण तीन महिन्यांत रिकामे होईल. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार नाही. परिणामी चार तालुक्यांत १९७२ च्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होईल. आपले पाणी शाबूत ठेवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

देवदत्त निकम यांच्यावर वळसे पाटील यांनी कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, दहा वर्षे कारखान्याचे अध्यक्षपद, बाजार समितीचे सभापतिपद सांभाळत असताना गावागावात जाऊन गट पाडणे, भांडणे लावण्याचे काम त्यांनी केले. पक्षाच्या नावाने कुंकू लावून फिरायचे व गावागावात आपल्याच पक्षाच्या लोकांत भांडणे लावून गट पाडायचे काम त्यांनी केले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत आपला एक उमेदवार पराभूत झाला. त्याचा दोष जनतेला नाही तर आपल्या पक्षातील काही लोकांनी आतून मदत केली आहे. पक्षात ज्याला राहायचे त्यांनी आनंदाने राहावे, ज्यांना नाही राहायचे त्यांनी आनंदाने जावे, असा इशारा त्यांनी दिला. आपण गाफील राहता कामा नये. जास्तीत जास्त संपर्क वाढवून प्रत्येकाने वाडी-वस्तीवर फिरावे. राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षभरात राहिलेले सर्व प्रश्न सोडवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये जाण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. भाजपत नाही तर एनडीए गठबंधनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात शरद पवार हे वेगळ्या पद्धतीचा निर्णय घेतील, असे वाटते. असे सांगून त्यांच्या अडचणी दूर होतील तेव्हा पवार आपल्यासोबत येतील, असा आशावाद व्यक्त केला. राजकीय स्थित्यंतर होऊन अजित पवार मुख्यमंत्री झाले तर तालुक्याचा विकासरथ वेगाने पुढे जाईल. सकारात्मक विचार ठेवा, जे काही घडेल ते चांगले घडेल, असे जगताप म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णूकाका हिंगे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, संचालक दादाभाऊ पोखरकर, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव, युवक अध्यक्ष अंकित जाधव, महिला अध्यक्ष सुषमा शिंदे, कैलासबुवा काळे, भगवान वाघ, सुभाष मोरमारे आदी उपस्थित होते. नीलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले तर उपसभापती सचिन पानसरे यांनी आभार मानले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलPuneपुणे