शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

NCP शरद पवारांचाही आणि आमचाही, अंतिम निर्णय निवडणूक आयोग देणार- वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 12:51 IST

आपल्या पक्षाला किती पाठिंबा आहे, हे दाखवून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र करून द्यावे...

मंचर (पुणे) : भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय हा एकटे अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांचा नाही, तर बहुसंख्य आमदार व पक्षातील कार्यकर्त्यांचा आहे. या संदर्भात शरद पवार यांच्याशी दोनवेळा चर्चा झाली होती. मात्र, त्यांनी नाही म्हणून सांगितले. आपण भाजपत गेलेलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आपला पक्ष असून, आपण पक्षातच आहोत, असे सांगून वळसे पाटील म्हणाले, आता निर्णय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची व आपलीही आहे. अंतिम निर्णय निवडणूक आयोग देणार आहे. आपल्या पक्षाला किती पाठिंबा आहे, हे दाखवून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र करून द्यावे.

आंबेगाव तालुक्यातून पाच हजार प्रतिज्ञापत्र द्यावीत, अशी सूचना त्यांनी केली. सार्वजनिक जीवनात वावरताना कुणाबद्दलही वाईट बोललो नाही. मात्र, आजकाल काही कार्यकर्ते माझ्याबद्दल काय बोलतात ते कानावर येते. अशा कार्यकर्त्यांना वाईट नाही तर सौम्य भाषेत उत्तर द्या. माझ्यासाठी आमदारकी, मंत्रिपद, मानमरतब महत्त्वाचे नाही. डिंभे धरणातून बोगदा करून माणिकडोहला पाणी नेण्याचा घाट घातला आहे. बोगद्याचा आकार एवढा आहे की, पूर्ण क्षमतेने पाणी नेले तर धरण तीन महिन्यांत रिकामे होईल. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार नाही. परिणामी चार तालुक्यांत १९७२ च्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होईल. आपले पाणी शाबूत ठेवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

देवदत्त निकम यांच्यावर वळसे पाटील यांनी कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, दहा वर्षे कारखान्याचे अध्यक्षपद, बाजार समितीचे सभापतिपद सांभाळत असताना गावागावात जाऊन गट पाडणे, भांडणे लावण्याचे काम त्यांनी केले. पक्षाच्या नावाने कुंकू लावून फिरायचे व गावागावात आपल्याच पक्षाच्या लोकांत भांडणे लावून गट पाडायचे काम त्यांनी केले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत आपला एक उमेदवार पराभूत झाला. त्याचा दोष जनतेला नाही तर आपल्या पक्षातील काही लोकांनी आतून मदत केली आहे. पक्षात ज्याला राहायचे त्यांनी आनंदाने राहावे, ज्यांना नाही राहायचे त्यांनी आनंदाने जावे, असा इशारा त्यांनी दिला. आपण गाफील राहता कामा नये. जास्तीत जास्त संपर्क वाढवून प्रत्येकाने वाडी-वस्तीवर फिरावे. राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षभरात राहिलेले सर्व प्रश्न सोडवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये जाण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. भाजपत नाही तर एनडीए गठबंधनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात शरद पवार हे वेगळ्या पद्धतीचा निर्णय घेतील, असे वाटते. असे सांगून त्यांच्या अडचणी दूर होतील तेव्हा पवार आपल्यासोबत येतील, असा आशावाद व्यक्त केला. राजकीय स्थित्यंतर होऊन अजित पवार मुख्यमंत्री झाले तर तालुक्याचा विकासरथ वेगाने पुढे जाईल. सकारात्मक विचार ठेवा, जे काही घडेल ते चांगले घडेल, असे जगताप म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णूकाका हिंगे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, संचालक दादाभाऊ पोखरकर, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव, युवक अध्यक्ष अंकित जाधव, महिला अध्यक्ष सुषमा शिंदे, कैलासबुवा काळे, भगवान वाघ, सुभाष मोरमारे आदी उपस्थित होते. नीलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले तर उपसभापती सचिन पानसरे यांनी आभार मानले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलPuneपुणे