शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

“जातीयवाद पसरवणारा एकमेव माणूस म्हणजे राज ठाकरे,” जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 22:47 IST

कधीच राष्ट्रवादी किंवा पवारांनी जातीयवाद पसरवला नसल्याचं आव्हाड यांचं वक्तव्य.

राज ठाकरे वारंवार पुरंदरेंचं नाव घेतात, ज्या मेहेंदळेंचं नाव घेत त्यांनी प्रतापराव गुजरांचा इतिहास सांगितला ते मेहेंदळे बोललेलेच नाहीत हे मी जाणीवपूर्वक सांगतो. जयसिंगराव पवारांनीही बाहेर येऊन स्पष्टीकरण दिलं. जातीयवाद पसरवणारा एकमेव माणूस आहे महाराष्ट्रात राज ठाकरे,” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले. शुक्रवारी पुण्यात माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी यावर भाष्य केलं.

“कधीच राष्ट्रवादी किंवा पवारांनी जातीयवाद पसरवला नाही. आमची काँग्रेस संस्कृती आहे ती सर्व जाती-पाती-धर्मांना एकत्र घेऊन चालणारी संस्कृती आहे. त्या संस्कृतीत आमचा जन्म आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे,” असं आव्हाड म्हणाले. “भोंगा कोणी काढला? ते ध्रुवीकरण होतं. त्यामुळे सर्व काकड आरत्याही बंद झाल्या. उगाच कारण नसताना वेडेवाकडे आरोप करू नये,” असंही त्यांनी नमूद केलं.भारत जोडोची स्तुतीस्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय योगदान असलेल्या काँग्रेसची विचारधारा प्रेमाची, आपलेपणाची आहे. राहुल गांधी आपल्या परिवाराचा तोच वारसा पदयात्रेतून चालवत आहे. द्वेषाने विखरत असलेल्या भारताला जोडण्याचे काम ते करत असल्याचं वक्तव्य त्यांनी यापूर्वी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा वाढदिवस व त्यांनी पंतप्रधानपद नाकारल्याचे स्मरण म्हणून आयोजित १८ व्या सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताहाच्या कार्यक्रमादरम्यान केलं.

"काँग्रेसच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचा माणूस असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मात्र, संविधान वाचवण्यासाठी मिळालेल्या कोणत्याही व्यासपीठावर बोललेच पाहिजे म्हणून आलो. देशाच्या सद्भावनेचे प्रतिक असलेल्या महात्मा गांधींजींना मारणाऱ्याचे होत असलेले उदात्तीकरण दुर्दैवी आहे. इतिहासाचे विकृतीकरण आणि वर्ण वर्चस्ववादाचा प्रसार करण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे,” असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडRaj Thackerayराज ठाकरे