शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

“जातीयवाद पसरवणारा एकमेव माणूस म्हणजे राज ठाकरे,” जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 22:47 IST

कधीच राष्ट्रवादी किंवा पवारांनी जातीयवाद पसरवला नसल्याचं आव्हाड यांचं वक्तव्य.

राज ठाकरे वारंवार पुरंदरेंचं नाव घेतात, ज्या मेहेंदळेंचं नाव घेत त्यांनी प्रतापराव गुजरांचा इतिहास सांगितला ते मेहेंदळे बोललेलेच नाहीत हे मी जाणीवपूर्वक सांगतो. जयसिंगराव पवारांनीही बाहेर येऊन स्पष्टीकरण दिलं. जातीयवाद पसरवणारा एकमेव माणूस आहे महाराष्ट्रात राज ठाकरे,” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले. शुक्रवारी पुण्यात माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी यावर भाष्य केलं.

“कधीच राष्ट्रवादी किंवा पवारांनी जातीयवाद पसरवला नाही. आमची काँग्रेस संस्कृती आहे ती सर्व जाती-पाती-धर्मांना एकत्र घेऊन चालणारी संस्कृती आहे. त्या संस्कृतीत आमचा जन्म आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे,” असं आव्हाड म्हणाले. “भोंगा कोणी काढला? ते ध्रुवीकरण होतं. त्यामुळे सर्व काकड आरत्याही बंद झाल्या. उगाच कारण नसताना वेडेवाकडे आरोप करू नये,” असंही त्यांनी नमूद केलं.भारत जोडोची स्तुतीस्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय योगदान असलेल्या काँग्रेसची विचारधारा प्रेमाची, आपलेपणाची आहे. राहुल गांधी आपल्या परिवाराचा तोच वारसा पदयात्रेतून चालवत आहे. द्वेषाने विखरत असलेल्या भारताला जोडण्याचे काम ते करत असल्याचं वक्तव्य त्यांनी यापूर्वी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा वाढदिवस व त्यांनी पंतप्रधानपद नाकारल्याचे स्मरण म्हणून आयोजित १८ व्या सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताहाच्या कार्यक्रमादरम्यान केलं.

"काँग्रेसच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचा माणूस असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मात्र, संविधान वाचवण्यासाठी मिळालेल्या कोणत्याही व्यासपीठावर बोललेच पाहिजे म्हणून आलो. देशाच्या सद्भावनेचे प्रतिक असलेल्या महात्मा गांधींजींना मारणाऱ्याचे होत असलेले उदात्तीकरण दुर्दैवी आहे. इतिहासाचे विकृतीकरण आणि वर्ण वर्चस्ववादाचा प्रसार करण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे,” असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडRaj Thackerayराज ठाकरे