शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

"महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात राजीनामा घेऊन कोणी फिरलं का?"

By नारायण बडगुजर | Updated: August 6, 2022 21:37 IST

अजित पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर टीका

पिंपरी: शिवसेनेतून बाहेर पडलेले आताचे आमदार युतीच्या सत्ताकाळात राजीनामे खिशात घेऊन फिरत होते. तसेच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे भर सभेत राजीनामा दिला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या काळात अशा पद्धतीने कोणीही राजीनामे खिशात घेऊन कोणी फिरले का, कोणी राजीनामा दिला का, असा प्रश्न उपस्थित करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर निशाणा साधला.

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या चिंचवड येथे झालेल्या संवाद सभेत पवार बोलत होते. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मी अर्थमंत्री असताना सर्वांना निधी दिला. मात्र, तरीही बदनामी केली जाते. शिवसेना, भाजप युतीच्या सत्ताकाळात काही आमदार खिशात राजीनामे घेऊन फिरत होते. महाविकास आघाडीच्या काळात एकाही आमदार राजीनामा घेऊन फिरला नाही. मात्र, मुख्यमंत्री पदाची संधी मिळतेय असे पाहूनच एकनाथ शिंदे आणि इतर आमदार शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांच्याकडे बहुमत आहे. तरीही मंत्रीमंडळ विस्तार होत नाही.

ते दोघेही टिकोजीराव...

काही अधिकाऱ्यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय टिकोजीराव असलेल्या मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. हे चुकीचे आहे, असे पवार म्हणाले.

‘ते’ मिस्टर इंडिया नाहीत...

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन काही दिवसांवर आला आहे. तरीही प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यांच्या ठिकाणी ध्वजावंदन कोण करणार, असा प्रश्न आहेत. मुख्यमंत्री मुंबईत तर उपमुख्यमंत्री नागपूर येथे ध्वजारोहण करतील. इतर ठिकाणचे काय, एकाचवेळी सर्व ठिकाणी जाण्यासाठी ते दोघेही मिस्टर इंडिया नाहीत, असा टोलाही पवार यांनी लगावला.

‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी व्हावे

देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमित्त केंद्र सरकारकडून ‘हर घर तिरंगा’ मोही राबविण्यात येत आहे. कोणत्या एका पक्षाचा तो कार्यक्रम नाही. त्यामुळे त्यात सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही पवार यांनी केले.

निवडणूक कधीही होऊ द्या, त्यासाठी तयार रहा...

सत्तांतर होत राहतात. कोणीही ताम्रपट घेऊन जन्माला येत नाही. सत्ता गेली म्हणून निराश व्हायचे नाही. निवडणुका पुढे गेल्याची चर्चा आहे. मात्र, निवडणुका कधीही होऊ द्या, त्यासाठी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तयार रहावे, असा सल्ला पवार यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी