शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात राजीनामा घेऊन कोणी फिरलं का?"

By नारायण बडगुजर | Updated: August 6, 2022 21:37 IST

अजित पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर टीका

पिंपरी: शिवसेनेतून बाहेर पडलेले आताचे आमदार युतीच्या सत्ताकाळात राजीनामे खिशात घेऊन फिरत होते. तसेच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे भर सभेत राजीनामा दिला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या काळात अशा पद्धतीने कोणीही राजीनामे खिशात घेऊन कोणी फिरले का, कोणी राजीनामा दिला का, असा प्रश्न उपस्थित करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर निशाणा साधला.

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या चिंचवड येथे झालेल्या संवाद सभेत पवार बोलत होते. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मी अर्थमंत्री असताना सर्वांना निधी दिला. मात्र, तरीही बदनामी केली जाते. शिवसेना, भाजप युतीच्या सत्ताकाळात काही आमदार खिशात राजीनामे घेऊन फिरत होते. महाविकास आघाडीच्या काळात एकाही आमदार राजीनामा घेऊन फिरला नाही. मात्र, मुख्यमंत्री पदाची संधी मिळतेय असे पाहूनच एकनाथ शिंदे आणि इतर आमदार शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांच्याकडे बहुमत आहे. तरीही मंत्रीमंडळ विस्तार होत नाही.

ते दोघेही टिकोजीराव...

काही अधिकाऱ्यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय टिकोजीराव असलेल्या मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. हे चुकीचे आहे, असे पवार म्हणाले.

‘ते’ मिस्टर इंडिया नाहीत...

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन काही दिवसांवर आला आहे. तरीही प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यांच्या ठिकाणी ध्वजावंदन कोण करणार, असा प्रश्न आहेत. मुख्यमंत्री मुंबईत तर उपमुख्यमंत्री नागपूर येथे ध्वजारोहण करतील. इतर ठिकाणचे काय, एकाचवेळी सर्व ठिकाणी जाण्यासाठी ते दोघेही मिस्टर इंडिया नाहीत, असा टोलाही पवार यांनी लगावला.

‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी व्हावे

देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमित्त केंद्र सरकारकडून ‘हर घर तिरंगा’ मोही राबविण्यात येत आहे. कोणत्या एका पक्षाचा तो कार्यक्रम नाही. त्यामुळे त्यात सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही पवार यांनी केले.

निवडणूक कधीही होऊ द्या, त्यासाठी तयार रहा...

सत्तांतर होत राहतात. कोणीही ताम्रपट घेऊन जन्माला येत नाही. सत्ता गेली म्हणून निराश व्हायचे नाही. निवडणुका पुढे गेल्याची चर्चा आहे. मात्र, निवडणुका कधीही होऊ द्या, त्यासाठी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तयार रहावे, असा सल्ला पवार यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी