शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात राजीनामा घेऊन कोणी फिरलं का?"

By नारायण बडगुजर | Updated: August 6, 2022 21:37 IST

अजित पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर टीका

पिंपरी: शिवसेनेतून बाहेर पडलेले आताचे आमदार युतीच्या सत्ताकाळात राजीनामे खिशात घेऊन फिरत होते. तसेच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे भर सभेत राजीनामा दिला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या काळात अशा पद्धतीने कोणीही राजीनामे खिशात घेऊन कोणी फिरले का, कोणी राजीनामा दिला का, असा प्रश्न उपस्थित करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर निशाणा साधला.

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या चिंचवड येथे झालेल्या संवाद सभेत पवार बोलत होते. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मी अर्थमंत्री असताना सर्वांना निधी दिला. मात्र, तरीही बदनामी केली जाते. शिवसेना, भाजप युतीच्या सत्ताकाळात काही आमदार खिशात राजीनामे घेऊन फिरत होते. महाविकास आघाडीच्या काळात एकाही आमदार राजीनामा घेऊन फिरला नाही. मात्र, मुख्यमंत्री पदाची संधी मिळतेय असे पाहूनच एकनाथ शिंदे आणि इतर आमदार शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांच्याकडे बहुमत आहे. तरीही मंत्रीमंडळ विस्तार होत नाही.

ते दोघेही टिकोजीराव...

काही अधिकाऱ्यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय टिकोजीराव असलेल्या मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. हे चुकीचे आहे, असे पवार म्हणाले.

‘ते’ मिस्टर इंडिया नाहीत...

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन काही दिवसांवर आला आहे. तरीही प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यांच्या ठिकाणी ध्वजावंदन कोण करणार, असा प्रश्न आहेत. मुख्यमंत्री मुंबईत तर उपमुख्यमंत्री नागपूर येथे ध्वजारोहण करतील. इतर ठिकाणचे काय, एकाचवेळी सर्व ठिकाणी जाण्यासाठी ते दोघेही मिस्टर इंडिया नाहीत, असा टोलाही पवार यांनी लगावला.

‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी व्हावे

देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमित्त केंद्र सरकारकडून ‘हर घर तिरंगा’ मोही राबविण्यात येत आहे. कोणत्या एका पक्षाचा तो कार्यक्रम नाही. त्यामुळे त्यात सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही पवार यांनी केले.

निवडणूक कधीही होऊ द्या, त्यासाठी तयार रहा...

सत्तांतर होत राहतात. कोणीही ताम्रपट घेऊन जन्माला येत नाही. सत्ता गेली म्हणून निराश व्हायचे नाही. निवडणुका पुढे गेल्याची चर्चा आहे. मात्र, निवडणुका कधीही होऊ द्या, त्यासाठी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तयार रहावे, असा सल्ला पवार यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी