शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

कर्जाच्या पैशातून साखरपुडा, लग्ने करतात वक्तव्य भोवले;कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राष्ट्रवादीकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 20:25 IST

निवडणुकीआधी याच मंत्र्यांच्या पक्षाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे निवडणूक जाहीरनाम्यात म्हटले होते

पुणे : शेतकरी कर्ज काढतात व ते माफ होईल याची वाट पाहत बसतात. नंतर त्या कर्जाच्या पैशातून साखरपुडा व लग्ने करतात, असे जाहीर वक्तव्य करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सरकारचेच मत व्यक्त करीत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने केली. निवडणुकीआधी याच मंत्र्यांच्या पक्षाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे निवडणूक जाहीरनाम्यात म्हटले होते. याचीही आठवण राष्ट्रवादी काँग्रेसने कोकाटे यांनी करून दिली.

पक्षाचे राज्य प्रवक्ते सुनील माने म्हणाले, हा कोकाटे यांचा असंवेदनशीलपणा आहेच, पण ते ज्या सरकारमध्ये मंत्री आहेत, त्या सरकारचाही आहे. एक प्रकारे सरकारचेच मत त्यांनी बोलून दाखविले आहे. अवकाळी पावसाने झालेले शेतीचे नुकसान पाहणीसाठी गेलेले कृषिमंत्री दिवसभर बैठका घेतात, रात्री शेती पाहायला जातात व तिथे असे वक्तव्य करतात. कृषी खात्याचा इतका मोठा अवमान याआधी कोणीही केला नसेल.

कर्जमाफी करणार असे आश्वासन देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार एकीकडे शेतकऱ्यांना कसलीही कर्जमाफी मिळणार नाही. हप्ते जमा करायला सुरुवात करा असा दम देतात, तर दुसरीकडे त्यांचे कृषिमंत्री शेतकरी कर्जाचे पैसे साखरपुडा, लग्नासाठी वापरतात असे सांगत त्यांची चेष्टा करतात, असे मंत्री, उपमुख्यमंत्री राज्याला मिळाले हे राज्यातील शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे असे माने यांनी म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड