शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नयनतारा सेहगल यांचं अप्रकाशित भाषण पाेहचलं विद्यार्थ्यांपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 16:11 IST

साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून आमंत्रित करण्यात आलेल्या नयनतारा सेहगल यांचे निमंत्रण मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे त्या जे भाषण उद्घाटनाच्या दिवशी करणार हाेत्या ते भाषण आता चर्चेचा विषय झाले आहे.

पुणे : साहित्य अकादमी पुरास्कार प्राप्त इंग्रजी लेखिका नयनतारा सेहगल यांना 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून बाेलवण्यात आले हाेते, परंतु त्यांच्या सराकारवर टीका करणाऱ्या भाषणामुळे त्यांना पाठवलेलं निमंत्रण मागे घेण्यात आल्याचे बाेलले जात आहे. सरकारने आयाेजकांवर दबाव टाकून त्यांना पाठवलेले निमंत्रण मागे घ्यायला लावले अशी टीकाही सर्वच क्षेत्रातून केली जात आहे. नयनतारा सेहगल या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून येणार नसल्या तरी त्या जे भाषण करणार हाेत्या ते सध्या चांगलेच गाजत आहे. त्यांचे हेच भाषण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध संघटनांच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील विविध ठिकाणी जात तेथील विद्यार्थ्यांना वाटले. त्यामुळे ज्या भाषणासाठी सेहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले तेच भाषण आता चर्चेचा विषय झाले आहे. 

    यवतमाळ येथे 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हाेणार आहे. यंदा पहिल्यांदाच निवडणुकीशिवाय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. डाॅ. अरुणा ढेरे यांची निवड अध्यक्ष म्हणून करण्यात आली. या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सेहगल यांना निमंत्रित करण्यात आले हाेते. परंतु संमेलन सुरु हाेण्याच्या काहीच दिवस आधी सुरक्षेचे कारण पुढे करत त्यांना पाठविण्यात आलेले निमंत्रण मागे घेण्यात आले. सेहगल यांच्या अप्रकाशित भाषणात त्यांनी सराकरवर जाेरदार टीका केली हाेती. देशात चाललेली झुंडशाही ही सरकार पुरस्कृत आहे असे परखड मत त्यांनी त्यांच्या भाषणात मांडले हाेते. त्यांचे निमंत्रण मागे घेतले असले तरी त्यांचे भाषण सर्वच वर्तमानपत्र आणि व्हाॅट्सअपच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पाेहचले आहे.     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध पुराेगामी संघटनांच्या विद्यार्थ्यांनी साेमवारी सेहगल यांच्या भाषणाच्या 300 प्रती विद्यापीठात वाटल्या. विद्यापीठातील अनिकेत कॅन्टींन, जयकर ग्रंथालय, ललित कला केंद्र, विद्यार्थी वसतीगृह या ठिकाणी या प्रतिंचे वाटप करण्यात आले. या प्रती वाटणारा आकाश दाैंडे म्हणाला, नयनतारा सेहगल यांच्या भाषणामुळे त्यांचे निमंत्रण नाकारणे म्हणजे हा एक प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील घाला आहे. सराकराने त्यांचे भाषण दाबण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचे उलटेच झाले. लाेक आता सेहगल यांचे साहित्य माेठ्याप्रमाणावर वाचू लागले आहेत. विद्यार्थ्यांनाही त्यांच्या साहित्याबाबत उत्सुकता दिसून येत आहे. राजकरण्यांच्या दबावाला साहित्यिकांनी बळी पडणे याेग्य नाही. त्यामुळे आम्ही त्यांचे भाषण विद्यार्थ्यांपर्यंत पाेहचविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या भाषणाच्या 300 प्रती आम्ही विद्यापीठात वाटल्या. विद्यार्थी आणि नागरिकांनीही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला. 

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकारMaharashtraमहाराष्ट्र