शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
4
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
5
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
6
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
7
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
8
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
9
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
10
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
11
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
12
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
13
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
14
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
15
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
16
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
17
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
18
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
19
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
20
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...

नयनतारा सेहगल यांचं अप्रकाशित भाषण पाेहचलं विद्यार्थ्यांपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 16:11 IST

साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून आमंत्रित करण्यात आलेल्या नयनतारा सेहगल यांचे निमंत्रण मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे त्या जे भाषण उद्घाटनाच्या दिवशी करणार हाेत्या ते भाषण आता चर्चेचा विषय झाले आहे.

पुणे : साहित्य अकादमी पुरास्कार प्राप्त इंग्रजी लेखिका नयनतारा सेहगल यांना 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून बाेलवण्यात आले हाेते, परंतु त्यांच्या सराकारवर टीका करणाऱ्या भाषणामुळे त्यांना पाठवलेलं निमंत्रण मागे घेण्यात आल्याचे बाेलले जात आहे. सरकारने आयाेजकांवर दबाव टाकून त्यांना पाठवलेले निमंत्रण मागे घ्यायला लावले अशी टीकाही सर्वच क्षेत्रातून केली जात आहे. नयनतारा सेहगल या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून येणार नसल्या तरी त्या जे भाषण करणार हाेत्या ते सध्या चांगलेच गाजत आहे. त्यांचे हेच भाषण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध संघटनांच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील विविध ठिकाणी जात तेथील विद्यार्थ्यांना वाटले. त्यामुळे ज्या भाषणासाठी सेहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले तेच भाषण आता चर्चेचा विषय झाले आहे. 

    यवतमाळ येथे 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हाेणार आहे. यंदा पहिल्यांदाच निवडणुकीशिवाय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. डाॅ. अरुणा ढेरे यांची निवड अध्यक्ष म्हणून करण्यात आली. या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सेहगल यांना निमंत्रित करण्यात आले हाेते. परंतु संमेलन सुरु हाेण्याच्या काहीच दिवस आधी सुरक्षेचे कारण पुढे करत त्यांना पाठविण्यात आलेले निमंत्रण मागे घेण्यात आले. सेहगल यांच्या अप्रकाशित भाषणात त्यांनी सराकरवर जाेरदार टीका केली हाेती. देशात चाललेली झुंडशाही ही सरकार पुरस्कृत आहे असे परखड मत त्यांनी त्यांच्या भाषणात मांडले हाेते. त्यांचे निमंत्रण मागे घेतले असले तरी त्यांचे भाषण सर्वच वर्तमानपत्र आणि व्हाॅट्सअपच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पाेहचले आहे.     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध पुराेगामी संघटनांच्या विद्यार्थ्यांनी साेमवारी सेहगल यांच्या भाषणाच्या 300 प्रती विद्यापीठात वाटल्या. विद्यापीठातील अनिकेत कॅन्टींन, जयकर ग्रंथालय, ललित कला केंद्र, विद्यार्थी वसतीगृह या ठिकाणी या प्रतिंचे वाटप करण्यात आले. या प्रती वाटणारा आकाश दाैंडे म्हणाला, नयनतारा सेहगल यांच्या भाषणामुळे त्यांचे निमंत्रण नाकारणे म्हणजे हा एक प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील घाला आहे. सराकराने त्यांचे भाषण दाबण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचे उलटेच झाले. लाेक आता सेहगल यांचे साहित्य माेठ्याप्रमाणावर वाचू लागले आहेत. विद्यार्थ्यांनाही त्यांच्या साहित्याबाबत उत्सुकता दिसून येत आहे. राजकरण्यांच्या दबावाला साहित्यिकांनी बळी पडणे याेग्य नाही. त्यामुळे आम्ही त्यांचे भाषण विद्यार्थ्यांपर्यंत पाेहचविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या भाषणाच्या 300 प्रती आम्ही विद्यापीठात वाटल्या. विद्यार्थी आणि नागरिकांनीही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला. 

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकारMaharashtraमहाराष्ट्र