शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

Navale Bridge Accident : नवले पूल अपघातांचा गुन्हेगार आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 12:54 IST

पुण्यातील नवले पुलाजवळची अपघातांची मालिका काही थांबायला तयार नाही...

पुणे : नवले पुलाजवळची अपघातांची मालिका काही थांबायला तयार नाही. कात्रज बोगद्याकडून रस्त्याला असलेला तीव्र उतारच अपघाताला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. काही सरकारी यंत्रणांनीही त्याला दुजोरा दिला आहे. खुद्द विभागीय आयुक्त सौरभ राव यांनीही जाहीरपणे या अपघातांना महापालिका आणि एनएचएआयच जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले आहे. यातील महापालिका मात्र हा भाग आमच्याकडे येऊन फक्त १० महिने झाले, असे सांगत आहे. या अपघाताची जबाबदारी महापालिकेची नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

एनएचएआय म्हणते...रस्ते बांधणारे नव्हे; बेशिस्त वाहनचालकच गुन्हेगार!

नवले पुलाजवळ होणारे अपघात रस्ता चुकीचा बांधल्याने किंवा तीव्र उतार असल्याने नाही तर बेशिस्त व अप्रशिक्षित वाहनचालकांमुळे होतात. त्यामुळे अपघातांचे खरे गुन्हेगार तेच आहेत, अशी स्पष्ट भूमिका भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय- नॅशनल हायवे ॲथाॅरिटी ऑफ इंडिया) यांनी घेतली आहे. अपघात होऊ नयेत यासाठीची सर्व काळजी रस्त्याच्या विकसकाकडून घेतली जाते, असा दावाही त्यांच्याकडून करण्यात आला.

रस्ते प्राधिकरणाने नाकारली जबाबदारी

‘एनएचएआय’चे व्यवस्थापक अंकितकुमार यांनी गुरुवारी दिवसभर नवले पूल परिसरातील अतिक्रमणे काढण्याच्या कामात होते. तिथून फोनवर बोलताना त्यांनी सांगितले की, अपघातासंदर्भात ‘एनएचएआय’ला जबाबदार धरणे चुकीचे आहे. कोणताही रस्ता मनात आला आणि हवा तसा बांधला, असे होत नाही. त्यामागे अभियंत्यांचा, त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अभ्यास असतो. चढ, उतार किती कसावा, त्यावरून कोणती वाहने, किती संख्येने ये-जा करतात या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. हा अभ्यास केल्यानंतरच रस्त्याचे काम सुरू होते.

आरोपात तथ्य नाही : अंकितकुमार

बेशिस्त वाहनचालकच या अपघातांना जबाबदार आहेत, असे अंकित कुमार म्हणाले. या मागे वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, वेग मर्यादा न पाळणे, रात्रीच्या वेळेस गाडी भरधाव पळवणे अशी कारणे आहेत. जड वाहने महामार्गांवरून चालवताना बरेच नियम असतात. अपघात झालेले कोणतेही वाहन पाहिले तर या नियमांचा भंग झाल्याचे लक्षात येते. त्यामुळे रस्ता चुकीचा बांधला आहे, या आरोपात काहीही तथ्य नाही, असे अंकितकुमार यांनी सांगितले.

विकासकाचाही संबंध नाही

बांधा, वापरा व हस्तांतर कर (बीओटी- बील्ट इट, ऑपरेट इट, ट्रान्सफर इट) या तत्त्वावर हा रस्ता बांधला गेला. तरीही जो कोणी विकासक असेल त्याच्यावर फायनल ॲथाॅरिटी म्हणून प्राधिकरणाचेच नियंत्रण असते. आम्ही विकासकाला अपघातांसंदर्भात अनेक पत्रे पाठवली आहेत, असा दावा अंकितकुमार यांनी केला. दिशादर्शक फलक लावणे, अपघातप्रवण क्षेत्रात रात्रीच्या अंधारात चमकणाऱ्या रेडियमच्या सावध करणाऱ्या खुणांचे फलक लावणे यासंबंधी वारंवार कळवण्यात आले. त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाही देखील केली आहे. रम्बलर्स वगैरे उपाय तर कायमच केले जातात, अशी माहिती अंकितकुमार यांनी दिली.

प्रकल्प संचालकांशी संपर्क नाही

‘एनएचएआय’चे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्याशी दिवसभरात संपर्क होऊ शकला नाही. त्यांचा मोबाईल स्वीच ऑफ येत होता. त्यांना पाठवलेल्या मोबाइल संदेशाला प्रतिसाद मिळाला नाही. अंकितकुमार हे या रस्त्यावर असलेली अतिक्रमणे काढण्याच्या मोहिमेत होते. तिथूनच ते मोबाइलवर बोलले.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातNHAIभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण