शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Navale Bridge Accident : नवले पूल अपघातांचा गुन्हेगार आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 12:54 IST

पुण्यातील नवले पुलाजवळची अपघातांची मालिका काही थांबायला तयार नाही...

पुणे : नवले पुलाजवळची अपघातांची मालिका काही थांबायला तयार नाही. कात्रज बोगद्याकडून रस्त्याला असलेला तीव्र उतारच अपघाताला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. काही सरकारी यंत्रणांनीही त्याला दुजोरा दिला आहे. खुद्द विभागीय आयुक्त सौरभ राव यांनीही जाहीरपणे या अपघातांना महापालिका आणि एनएचएआयच जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले आहे. यातील महापालिका मात्र हा भाग आमच्याकडे येऊन फक्त १० महिने झाले, असे सांगत आहे. या अपघाताची जबाबदारी महापालिकेची नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

एनएचएआय म्हणते...रस्ते बांधणारे नव्हे; बेशिस्त वाहनचालकच गुन्हेगार!

नवले पुलाजवळ होणारे अपघात रस्ता चुकीचा बांधल्याने किंवा तीव्र उतार असल्याने नाही तर बेशिस्त व अप्रशिक्षित वाहनचालकांमुळे होतात. त्यामुळे अपघातांचे खरे गुन्हेगार तेच आहेत, अशी स्पष्ट भूमिका भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय- नॅशनल हायवे ॲथाॅरिटी ऑफ इंडिया) यांनी घेतली आहे. अपघात होऊ नयेत यासाठीची सर्व काळजी रस्त्याच्या विकसकाकडून घेतली जाते, असा दावाही त्यांच्याकडून करण्यात आला.

रस्ते प्राधिकरणाने नाकारली जबाबदारी

‘एनएचएआय’चे व्यवस्थापक अंकितकुमार यांनी गुरुवारी दिवसभर नवले पूल परिसरातील अतिक्रमणे काढण्याच्या कामात होते. तिथून फोनवर बोलताना त्यांनी सांगितले की, अपघातासंदर्भात ‘एनएचएआय’ला जबाबदार धरणे चुकीचे आहे. कोणताही रस्ता मनात आला आणि हवा तसा बांधला, असे होत नाही. त्यामागे अभियंत्यांचा, त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अभ्यास असतो. चढ, उतार किती कसावा, त्यावरून कोणती वाहने, किती संख्येने ये-जा करतात या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. हा अभ्यास केल्यानंतरच रस्त्याचे काम सुरू होते.

आरोपात तथ्य नाही : अंकितकुमार

बेशिस्त वाहनचालकच या अपघातांना जबाबदार आहेत, असे अंकित कुमार म्हणाले. या मागे वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, वेग मर्यादा न पाळणे, रात्रीच्या वेळेस गाडी भरधाव पळवणे अशी कारणे आहेत. जड वाहने महामार्गांवरून चालवताना बरेच नियम असतात. अपघात झालेले कोणतेही वाहन पाहिले तर या नियमांचा भंग झाल्याचे लक्षात येते. त्यामुळे रस्ता चुकीचा बांधला आहे, या आरोपात काहीही तथ्य नाही, असे अंकितकुमार यांनी सांगितले.

विकासकाचाही संबंध नाही

बांधा, वापरा व हस्तांतर कर (बीओटी- बील्ट इट, ऑपरेट इट, ट्रान्सफर इट) या तत्त्वावर हा रस्ता बांधला गेला. तरीही जो कोणी विकासक असेल त्याच्यावर फायनल ॲथाॅरिटी म्हणून प्राधिकरणाचेच नियंत्रण असते. आम्ही विकासकाला अपघातांसंदर्भात अनेक पत्रे पाठवली आहेत, असा दावा अंकितकुमार यांनी केला. दिशादर्शक फलक लावणे, अपघातप्रवण क्षेत्रात रात्रीच्या अंधारात चमकणाऱ्या रेडियमच्या सावध करणाऱ्या खुणांचे फलक लावणे यासंबंधी वारंवार कळवण्यात आले. त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाही देखील केली आहे. रम्बलर्स वगैरे उपाय तर कायमच केले जातात, अशी माहिती अंकितकुमार यांनी दिली.

प्रकल्प संचालकांशी संपर्क नाही

‘एनएचएआय’चे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्याशी दिवसभरात संपर्क होऊ शकला नाही. त्यांचा मोबाईल स्वीच ऑफ येत होता. त्यांना पाठवलेल्या मोबाइल संदेशाला प्रतिसाद मिळाला नाही. अंकितकुमार हे या रस्त्यावर असलेली अतिक्रमणे काढण्याच्या मोहिमेत होते. तिथूनच ते मोबाइलवर बोलले.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातNHAIभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण