शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

चंद्रयान ३ यशस्वी मोहिमेच्या श्रेयवादापेक्षा देशाभिमान महत्वाचे : उदय सामंत

By अजित घस्ते | Updated: August 25, 2023 18:46 IST

तिसरे राज्यस्तरीय युवा परिवर्तन परिषदेचे उद्घाटन नवी पेठ येथील एस.एम जोशी सभागहात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते....

पुणे : चंद्रयान-३ यशस्वी मोहिमचे जगभरात कौतुक केले जात आहे. देशातील शास्त्रज्ञ जगातील शास्त्रज्ञ ठरले. यावर कोणी ही राजकारण नरू नये. देशात श्रेय घेण्यावरून वाद सुरू आहे. यावरून वाद करण्यापेक्षा आपल्या देशातील वैज्ञानिकांनी केलेल्या कार्याचा अभिमान बाळगळा पाहिजे असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. तिसरे राज्यस्तरीय युवा परिवर्तन परिषदेचे उद्घाटन नवी पेठ येथील एस. एम जोशी सभागहात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार रविंद्र धंगेकर, ‘ज्ञान की’चे संस्थापक प्रदीप लोखंडे, परिवर्तन संस्थेचे विश्वस्त शेखर वाल्हेकर,उमेश कुदळे, उदेश पवार इ. उपस्थित होते. यापुढे सामंत म्हणाले, चंद्रयान ३ यशस्वी मोहिमेत महाराष्ट्राचा खारीचा वाटा आहे. यामध्ये इस्त्रोमधील वैज्ञानिकांचे कौतुक करून रतन टाटासह अन्य उद्योग क्षेत्रातील व्यवसायिकांचे मोलाचे योगदान आहे.

तसेच  देशात लोकशाही असल्याने राज्यात आतापर्यंत वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख, मनोहर जोशी, अशोक चव्हाण, नारायण राणे, शरद पवार या सारख्या अनेक मोठ्या नेत्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले. लोकशाहीत मुख्यमंत्री पद गेले हे स्वीकारून ते सर्व नेते विश्वास मिळविण्यासाठी पुन्हा जनतेमध्ये गेले. मात्र, काही जणांचे मुख्यमंत्री पद जावून चौदा महिने झाले तरी ते वास्तव स्विकारायला तयार नाहीत, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतPuneपुणे