शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

टिळकांना दहशतवादी ठरवणे हा राष्ट्रीय गुन्हा : डॉ. श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 21:42 IST

राजस्थानमधील वसुंधरा राजे सरकारच्या साक्षीने आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या इंग्रजी पुस्तकात ‘लोकमान्य टिळक हे दहशतवादाचे जनक होते’ असा निंदनीय मजकूर प्रसिध्द झाला आहे.

ठळक मुद्देदहशतवादाचा कलंक लावणे हा इतिहासासह सत्याचा आणि स्वातंत्र्य चळवळीचा द्रोह

पुणे : राजस्थानमधील वसुंधरा राजे सरकारच्या साक्षीने आठवी इयत्तेच्या समाजशास्त्र विषयाच्या इंग्रजी पुस्तकात ‘लोकमान्य टिळक हे दहशतवादाचे जनक होते’ असा निंदनीय मजकूर प्रसिध्द झाला आहे. टिळकांसारख्या देशभक्ताला दहशतवादी ठरवण्याचा करंटेपणा विद्वानच करत असेल तर समाजाने कोणावर विश्वास ठेवावा, असा परखड सवाल माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे उपस्थित केले आहे.देशभक्ताला दहशतवादी ठरवताना राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीतील सर्वच स्वातंत्र्य योध्दयांचा अवमान झाला आहे. स्वराज्याच्या हक्काचा व्यक्तिगत आणि सामूहिक जाहीरनामा ब्रिटिश राजवटीच्या विरोधात देशभर प्रसारित करणारे टिळक हे अस्सल देशभक्त आहेत. त्यांचे देशप्रेम तुरुंगातील शिक्षा भोगूनही उजळून निघाली आहे. तरीही त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर दहशतवादाचा कलंक लावणे, हा इतिहासासह सत्याचा आणि स्वातंत्र्य चळवळीचा द्रोह आहे. सत्याच्या नावे विकृती पेरणे हा सांस्कृतिक गुन्हा असून, राजस्थान सरकारने संबंधित लेखकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सबनीस यांनी या पत्राद्वारे केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेLokmanya Tilakलोकमान्य टिळकRajasthanराजस्थानShripal Sabnisश्रीपाल सबनीस