शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

G20 Pune Summit | जूननंतर भारताला आर्थिक मंदीचा फटका; G20 परिषदेत व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 12:40 IST

केंद्रीय अवजड मंत्री नारायण राणे : दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन...

पुणे/श्रीकिशन काळे : जगभरात मंदीचे सावट आहे. अमेरिकेमध्येही मंदी आलेली आहे. परंतु, त्याची झळ भारताला पोचलेली नाही. कारण आपली आर्थिक स्थिती मजबूत आहे. परंतु, जागतिक मंदीचा फटका आपल्याला जूननंतर होण्याची शक्यता आहे, अशी धोक्याची शक्यता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.

शहरांचा विकास नियोजनबध्द करण्यावर भर दिला जाईल. कारण आता ५० टक्के लोकसंख्या शहरात राहते. त्यांना पायाभूत सुविधा मिळणे आवश्यक आहेत. पुणे, नागपूर, मुंबई या शहरांकडे जगाचे लक्ष लागले आहे. पुण्याचा विकास गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने झाला आहे. त्याचा अनुभव जी २० मधील देशांना इथे आल्यानंतर मिळणार आहे. शहरांमध्ये पायाभूत सुविधा मिळाव्यात, त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, म्हणून जी २० मध्ये चर्चा होईल आणि म्हणून ही परिषद महत्त्वाची आहे, असे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

पुण्यात जी २० परिषदेचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते सोमवारी सकाळी झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी या वेळी या परिषदेविषयी आणि सरकारच्या भूमिकेबद्दल माहिती दिली. पायाभूत गुंतवणकीवर या परिषदेत आज व उद्या (दि.१७) चर्चा होत आहे. त्यासाठी जी २० मधील सर्व देशांचे प्रतिनिधी व जागतिक बँकांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

राणे म्हणाले, सध्या जीडीपीमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून, भारत पाचव्या क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्नशील आहे. तो लवकरच येईल. कारण केंद्र सरकारकडून जीडीपी वाढविण्यावर भर दिला जात आहे. २०१४ मध्ये भारत दहाव्या क्रमांकावर होता, आता तो पाचव्या क्रमांकावर येत आहे. आपल्याकडे आर्थिक क्षेत्रातील गुंतवणूक देखील वाढत असून, त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती मजबूत होत आहे, असे राणे म्हणाले.

राणे काय म्हणाले...

- सुंदर शहरे बनविण्यासाठी आपल्याकडे योजना आहेत. त्यानूसार काम केले जात आहे. तसेच त्या योजनांना निधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सुंदर शहरांचा भारत हा अभिप्रेत आहे. त्याकडे आपली वाटचाल होत आहे.

- २ लाख कोटी रूपयांचे अनुदान आपण अन्नधान्यासाठी देत आहोत. देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कोणीही अन्नाविना राहणार नाही, याची शाश्वती सरकार घेत आहे.

- जी २० परिषदेमध्ये पर्यावरण हा देखील विषय आहे. आता देशातील अनेक शहरांत हवेची गुणवत्ता खालावलेली आहे. त्यात पुण्याचाही समावेश आहे. परंतु, पुण्याची हवा चांगली करण्यासाठी भविष्यात यंत्रसामग्रीचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल.

- जी २० परिषदेच्या लोगोमध्ये कमळाचे चित्र आहे. ते कमळ म्हणजे शाश्वत विकास आहे. परंतु, कोणाला जर वाटत असेल की, ते भाजपचे कमळ आहे, तर तसे मानायलाही काहीच हरकत नाही.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड