शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

G20 Pune Summit | जूननंतर भारताला आर्थिक मंदीचा फटका; G20 परिषदेत व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 12:40 IST

केंद्रीय अवजड मंत्री नारायण राणे : दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन...

पुणे/श्रीकिशन काळे : जगभरात मंदीचे सावट आहे. अमेरिकेमध्येही मंदी आलेली आहे. परंतु, त्याची झळ भारताला पोचलेली नाही. कारण आपली आर्थिक स्थिती मजबूत आहे. परंतु, जागतिक मंदीचा फटका आपल्याला जूननंतर होण्याची शक्यता आहे, अशी धोक्याची शक्यता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.

शहरांचा विकास नियोजनबध्द करण्यावर भर दिला जाईल. कारण आता ५० टक्के लोकसंख्या शहरात राहते. त्यांना पायाभूत सुविधा मिळणे आवश्यक आहेत. पुणे, नागपूर, मुंबई या शहरांकडे जगाचे लक्ष लागले आहे. पुण्याचा विकास गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने झाला आहे. त्याचा अनुभव जी २० मधील देशांना इथे आल्यानंतर मिळणार आहे. शहरांमध्ये पायाभूत सुविधा मिळाव्यात, त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, म्हणून जी २० मध्ये चर्चा होईल आणि म्हणून ही परिषद महत्त्वाची आहे, असे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

पुण्यात जी २० परिषदेचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते सोमवारी सकाळी झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी या वेळी या परिषदेविषयी आणि सरकारच्या भूमिकेबद्दल माहिती दिली. पायाभूत गुंतवणकीवर या परिषदेत आज व उद्या (दि.१७) चर्चा होत आहे. त्यासाठी जी २० मधील सर्व देशांचे प्रतिनिधी व जागतिक बँकांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

राणे म्हणाले, सध्या जीडीपीमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून, भारत पाचव्या क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्नशील आहे. तो लवकरच येईल. कारण केंद्र सरकारकडून जीडीपी वाढविण्यावर भर दिला जात आहे. २०१४ मध्ये भारत दहाव्या क्रमांकावर होता, आता तो पाचव्या क्रमांकावर येत आहे. आपल्याकडे आर्थिक क्षेत्रातील गुंतवणूक देखील वाढत असून, त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती मजबूत होत आहे, असे राणे म्हणाले.

राणे काय म्हणाले...

- सुंदर शहरे बनविण्यासाठी आपल्याकडे योजना आहेत. त्यानूसार काम केले जात आहे. तसेच त्या योजनांना निधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सुंदर शहरांचा भारत हा अभिप्रेत आहे. त्याकडे आपली वाटचाल होत आहे.

- २ लाख कोटी रूपयांचे अनुदान आपण अन्नधान्यासाठी देत आहोत. देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कोणीही अन्नाविना राहणार नाही, याची शाश्वती सरकार घेत आहे.

- जी २० परिषदेमध्ये पर्यावरण हा देखील विषय आहे. आता देशातील अनेक शहरांत हवेची गुणवत्ता खालावलेली आहे. त्यात पुण्याचाही समावेश आहे. परंतु, पुण्याची हवा चांगली करण्यासाठी भविष्यात यंत्रसामग्रीचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल.

- जी २० परिषदेच्या लोगोमध्ये कमळाचे चित्र आहे. ते कमळ म्हणजे शाश्वत विकास आहे. परंतु, कोणाला जर वाटत असेल की, ते भाजपचे कमळ आहे, तर तसे मानायलाही काहीच हरकत नाही.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड