शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

G20 Pune Summit | जूननंतर भारताला आर्थिक मंदीचा फटका; G20 परिषदेत व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 12:40 IST

केंद्रीय अवजड मंत्री नारायण राणे : दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन...

पुणे/श्रीकिशन काळे : जगभरात मंदीचे सावट आहे. अमेरिकेमध्येही मंदी आलेली आहे. परंतु, त्याची झळ भारताला पोचलेली नाही. कारण आपली आर्थिक स्थिती मजबूत आहे. परंतु, जागतिक मंदीचा फटका आपल्याला जूननंतर होण्याची शक्यता आहे, अशी धोक्याची शक्यता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.

शहरांचा विकास नियोजनबध्द करण्यावर भर दिला जाईल. कारण आता ५० टक्के लोकसंख्या शहरात राहते. त्यांना पायाभूत सुविधा मिळणे आवश्यक आहेत. पुणे, नागपूर, मुंबई या शहरांकडे जगाचे लक्ष लागले आहे. पुण्याचा विकास गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने झाला आहे. त्याचा अनुभव जी २० मधील देशांना इथे आल्यानंतर मिळणार आहे. शहरांमध्ये पायाभूत सुविधा मिळाव्यात, त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, म्हणून जी २० मध्ये चर्चा होईल आणि म्हणून ही परिषद महत्त्वाची आहे, असे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

पुण्यात जी २० परिषदेचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते सोमवारी सकाळी झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी या वेळी या परिषदेविषयी आणि सरकारच्या भूमिकेबद्दल माहिती दिली. पायाभूत गुंतवणकीवर या परिषदेत आज व उद्या (दि.१७) चर्चा होत आहे. त्यासाठी जी २० मधील सर्व देशांचे प्रतिनिधी व जागतिक बँकांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

राणे म्हणाले, सध्या जीडीपीमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून, भारत पाचव्या क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्नशील आहे. तो लवकरच येईल. कारण केंद्र सरकारकडून जीडीपी वाढविण्यावर भर दिला जात आहे. २०१४ मध्ये भारत दहाव्या क्रमांकावर होता, आता तो पाचव्या क्रमांकावर येत आहे. आपल्याकडे आर्थिक क्षेत्रातील गुंतवणूक देखील वाढत असून, त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती मजबूत होत आहे, असे राणे म्हणाले.

राणे काय म्हणाले...

- सुंदर शहरे बनविण्यासाठी आपल्याकडे योजना आहेत. त्यानूसार काम केले जात आहे. तसेच त्या योजनांना निधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सुंदर शहरांचा भारत हा अभिप्रेत आहे. त्याकडे आपली वाटचाल होत आहे.

- २ लाख कोटी रूपयांचे अनुदान आपण अन्नधान्यासाठी देत आहोत. देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कोणीही अन्नाविना राहणार नाही, याची शाश्वती सरकार घेत आहे.

- जी २० परिषदेमध्ये पर्यावरण हा देखील विषय आहे. आता देशातील अनेक शहरांत हवेची गुणवत्ता खालावलेली आहे. त्यात पुण्याचाही समावेश आहे. परंतु, पुण्याची हवा चांगली करण्यासाठी भविष्यात यंत्रसामग्रीचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल.

- जी २० परिषदेच्या लोगोमध्ये कमळाचे चित्र आहे. ते कमळ म्हणजे शाश्वत विकास आहे. परंतु, कोणाला जर वाटत असेल की, ते भाजपचे कमळ आहे, तर तसे मानायलाही काहीच हरकत नाही.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड