शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

G20 Pune Summit | जूननंतर भारताला आर्थिक मंदीचा फटका; G20 परिषदेत व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 12:40 IST

केंद्रीय अवजड मंत्री नारायण राणे : दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन...

पुणे/श्रीकिशन काळे : जगभरात मंदीचे सावट आहे. अमेरिकेमध्येही मंदी आलेली आहे. परंतु, त्याची झळ भारताला पोचलेली नाही. कारण आपली आर्थिक स्थिती मजबूत आहे. परंतु, जागतिक मंदीचा फटका आपल्याला जूननंतर होण्याची शक्यता आहे, अशी धोक्याची शक्यता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.

शहरांचा विकास नियोजनबध्द करण्यावर भर दिला जाईल. कारण आता ५० टक्के लोकसंख्या शहरात राहते. त्यांना पायाभूत सुविधा मिळणे आवश्यक आहेत. पुणे, नागपूर, मुंबई या शहरांकडे जगाचे लक्ष लागले आहे. पुण्याचा विकास गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने झाला आहे. त्याचा अनुभव जी २० मधील देशांना इथे आल्यानंतर मिळणार आहे. शहरांमध्ये पायाभूत सुविधा मिळाव्यात, त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, म्हणून जी २० मध्ये चर्चा होईल आणि म्हणून ही परिषद महत्त्वाची आहे, असे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

पुण्यात जी २० परिषदेचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते सोमवारी सकाळी झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी या वेळी या परिषदेविषयी आणि सरकारच्या भूमिकेबद्दल माहिती दिली. पायाभूत गुंतवणकीवर या परिषदेत आज व उद्या (दि.१७) चर्चा होत आहे. त्यासाठी जी २० मधील सर्व देशांचे प्रतिनिधी व जागतिक बँकांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

राणे म्हणाले, सध्या जीडीपीमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून, भारत पाचव्या क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्नशील आहे. तो लवकरच येईल. कारण केंद्र सरकारकडून जीडीपी वाढविण्यावर भर दिला जात आहे. २०१४ मध्ये भारत दहाव्या क्रमांकावर होता, आता तो पाचव्या क्रमांकावर येत आहे. आपल्याकडे आर्थिक क्षेत्रातील गुंतवणूक देखील वाढत असून, त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती मजबूत होत आहे, असे राणे म्हणाले.

राणे काय म्हणाले...

- सुंदर शहरे बनविण्यासाठी आपल्याकडे योजना आहेत. त्यानूसार काम केले जात आहे. तसेच त्या योजनांना निधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सुंदर शहरांचा भारत हा अभिप्रेत आहे. त्याकडे आपली वाटचाल होत आहे.

- २ लाख कोटी रूपयांचे अनुदान आपण अन्नधान्यासाठी देत आहोत. देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कोणीही अन्नाविना राहणार नाही, याची शाश्वती सरकार घेत आहे.

- जी २० परिषदेमध्ये पर्यावरण हा देखील विषय आहे. आता देशातील अनेक शहरांत हवेची गुणवत्ता खालावलेली आहे. त्यात पुण्याचाही समावेश आहे. परंतु, पुण्याची हवा चांगली करण्यासाठी भविष्यात यंत्रसामग्रीचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल.

- जी २० परिषदेच्या लोगोमध्ये कमळाचे चित्र आहे. ते कमळ म्हणजे शाश्वत विकास आहे. परंतु, कोणाला जर वाटत असेल की, ते भाजपचे कमळ आहे, तर तसे मानायलाही काहीच हरकत नाही.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड