शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

‘ना थकता हूं ना थकने देता हूं’, एवढा कार्यक्षम नेता पहिल्यांदाचा पाहिला, जावडेकरांकडून मोदींचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 13:34 IST

समोरील व्यक्तीचे म्हणणे प्रतिवाद न करता शांतपणे ऐकून घेणे हे नरेंद्र मोदींचे स्वभाव वैशिष्ट्य असून त्यांची कार्यक्षमता अफाट आहे

पुणे : गुजरातचे मुख्यमंत्री असताना ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ अशी घोषणा केली होती. त्यानंतर पंतप्रधान झाल्यावर ‘ना थकता हूं ना थकने देता हूं’ असे सहज स्वर्गीय अरुण जेटली गमतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून म्हणाले होते आणि यावर एकच हशा पिकला होता. तर नवरात्र असल्याने उपवासाचे दिवस होते. त्या दरम्यान पंतप्रधानांना अमेरिकेचा दौरा करावा लागला. उपवासादरम्यान मोदींनी १०० तासांत ५० कार्यक्रम केले. एवढा कार्यक्षम नेता माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिला, असे मत भाजपा नेते तथा माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

ते संस्कृती प्रतिष्ठान आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आँख ये धन्य है’ आणि ‘साक्षी भाव’ या पुस्तकांमधील कवितांवर आधारित ‘मन का गीत’ या विशेष कार्यक्रमावेळी बोलत होते. यावेळी मोनिका मुरलीधर मोहोळ, प्रसिद्ध रंगकर्मी आणि कार्यक्रमाचे दिग्दर्शक योगेश सोमण, संगीत संयोजक डॉ. सलील कुलकर्णी, संवाद पुणेचे सुनील महाजन, माजी नगरसेवक आदित्य माळवे, माधवी सहस्त्रबुद्धे, उत्कर्ष प्रकाशनाचे सु. वा. जोशी, नृत्य दिग्दर्शक निकिता मोघे आणि ‘मन का गीत’ कार्यक्रमाची संहिता लिहिलेल्या डॉ. माधवी वैद्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील महाजन यांनी केले.

प्रकाश जावडेकर पुढे म्हणाले की, मोदी हे अत्यंत संवेदनशील व्यक्ती असल्याने त्यांच्याकडून काव्यनिर्मिती झाली आहे. ते संन्यस्त कर्मयोगी आहेत. समोरील व्यक्तीचे म्हणणे प्रतिवाद न करता शांतपणे ऐकून घेणे हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य असून त्यांची कार्यक्षमता अफाट आहे. पंतप्रधान म्हणूनच नव्हे, तर एक संवेदनशील कवी म्हणून मी त्यांना जवळून पाहिलेले आहे.

दिग्दर्शनाची बाजू अभिनेते योगेश सोमण यांनी सांभाळली. नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले असून डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीत संयोजन केले आहे. प्रभावी अभिवाचन सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जमेनिस आणि अक्षय वाटवे यांनी केले. विविध गीते, कवितांवर शिल्पा दातार, शर्वरी ओतरी, श्रुतिका अत्रे, अदिती देवधर, ईश्वरी बापट, प्राजक्ता सांभू, अंतरा बोरगावकर यांनी नृत्याविष्कार सादर केला. महेश लिमये (दृकश्राव्य), अक्षर वडके (प्रकाश योजना), अमन वरखेडकर (की बोर्ड) यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुलकर्णी यांनी, तर संयोजन केतकी महाजन-बोरकर यांनी केले.

कविता संगीतबद्ध करता आल्या हे भाग्य : डॉ. सलील कुलकर्णी

फार चांगला योग आहे. कारण पंतप्रधानांच्या कवितांना संगीतबद्ध करता आले. अनेक प्रकारच्या कविता आपण वाचतो. पण अनेक शब्द मला या कवितांच्या माध्यमातून समजली. भारतासह परदेशात भ्रमंती करणारे आणि अनुभव पाठीशी घेऊन त्यातून कविता साकारल्या गेल्या आहेत. यात शैक्षणिक, नैसर्गिक आणि हिंदुत्व अशा सर्व गोष्टी दिसतात. तसेच कवितांच्या माध्यमातून त्यांची संवेदनशीलता समजली.

टॅग्स :PuneपुणेPrakash Javadekarप्रकाश जावडेकरNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानBJPभाजपा