शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

"माझ्या एकनिष्ठतेचा आज कडेलोट झाला..." राजीनाम्यानंतर वसंत मोरे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 14:17 IST

मनसे पक्षाला रामराम ठोकल्यानंतर ते बोलत होते. त्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत पक्षाच्या सदस्याचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले...

पुणे : 'वारंवार माझ्या एकनिष्ठतेवर संशय घेतला जात होता. मी पक्षात आहे हे सांगून सुद्धा माझ्यावर कारवाया झाल्या. पुणे लोकसभा लढवण्यास मी इच्छूक आहे, हे सांगत होतो. अशावेळी वरिष्ठांपर्यंत पुणे लोकसभा मतदारसंघात मनसे नकारात्मक आहे, असा अहवाल दिला जात होता त्यामुळे वरिष्ठांपर्यंत चुकीचा निरोप  पोहचत होता, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली. मनसे पक्षाला रामराम ठोकल्यानंतर ते बोलत होते. आज (मंगळवार) मोरे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत पक्षाच्या सदस्याचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

पुढे बोलताना वसंत मोरे म्हणाले, मला वारंवार त्रास दिला जात होता. माझ्यासोबत असलेल्या लोकांना डावलले जात होते. मी वारंवार तक्रारी साहेबांपर्यंत पोहचवल्या, परंतु त्यानंतरही काहीच बदल झाला नाही. माझ्यावर अन्याय होत असेल, माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांना डावललं जात असेल तर त्या पक्षात न राहिलेलेच बरे असंही मोरे म्हणाले.

'मी कधीही राज ठाकरे आणि मनसेवर नाराज नाही. परंतु पुण्यात ज्याप्रकारे संघटनेत राजकारण सुरू आहे. ते संघटनेसाठी चांगली नाही. मी जी भूमिका घेतली ती पूर्णपणे विचार करून घेतली आहे. पुढील २-३ दिवसांत मी पुढची भूमिका स्पष्ट करेन. माझ्या एकनिष्ठतेचा आज कडेलोट झाला', असल्याचीही तिखट प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली.

सध्या वसंत मोरे यांच्या कात्रज परिसरातील ऑफिसजवळ कार्यकर्त्यांची गर्दी होण्यास सुरूवात झाली आहे. काही वेळातच ते माध्यमांशी सविस्तर बोलणार आहेत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे