शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

संगीताचा दर्जा खालावला; गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 12:08 IST

‘दैैनंदिन जीवनाप्रमाणे चित्रसृष्टी आणि संगीतातही आमूलाग्र बदल झाले आहेत. पूर्वीच्या तुलनेत संगीताचा दर्जा खालावला आहे’, अशी खंत प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्दे'एखाद्या कामाचा दर्जा खालावत असेल तर त्याला प्रोत्साहन देणे चुकीचे''आजकाल लोकांना काय आवडते, याचा विचार करून गाणी तयार केली जातात'

पुणे : ‘दैैनंदिन जीवनाप्रमाणे चित्रसृष्टी आणि संगीतातही आमूलाग्र बदल झाले आहेत. त्याप्रमाणे आपणही पुढे गेले पाहिजे. मात्र, आजकाल लोकांना काय आवडते, याचा विचार करून गाणी तयार केली जातात. त्यामुळे, पूर्वीच्या तुलनेत संगीताचा दर्जा खालावला आहे’, अशी खंत प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.ते म्हणाले, ‘रसिकांची अभिरुची लक्षात घेऊन चित्रपट तयार केले जातात, गाणी लिहिली जातात. मात्र, एखाद्या कामाचा दर्जा खालावत असेल तर त्याला प्रोत्साहन देणे चुकीचे आहे. संगीताची उंची कायम राखायची असेल तर अभिरुची आणि दर्जा यांचा समतोल साधायला हवा. त्यातूनच समाजाला चांगल्या संगीताची ओळख होईल आणि त्यांची अभिरुची बदलायला मदत होईल.’‘संगीत क्षेत्रात तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. मात्र, तंत्रज्ञान संगीतापेक्षा मोठे होणार नाही, याची काळजी गायक आणि संगीत संयोजकांनी घेतली पाहिजे. पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्यास संगीताचा बाज बिघडण्याची शक्यता असते. रसिकांमध्ये संगीत साक्षरता आणण्याची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे. त्यापेक्षा संगीतातून ही प्रक्रिया सुलभपणे घडू शकते.

टॅग्स :Puneपुणे