शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

वर्चस्व टिकवण्यासाठी विचारवंतांच्या हत्या- अॅड. प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 15:15 IST

वंचित समाजावर वर्चस्व टिकवण्यासाठीच विचारवंतांच्या हत्या केल्या जात असल्याचा आरोप भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जेजुरीत केला आहे.

जेजुरी : वंचित समाजावर वर्चस्व टिकवण्यासाठीच विचारवंतांच्या हत्या केल्या जात असल्याचा आरोप भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जेजुरीत केला आहे. हिटलरशाही आणण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जात आहे. वंचित समाजाने वेळीच सावध होऊन एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. येथील पालखी तळावर समस्त धनगर समाज व बहुजन समाजाच्या वतीने जेजुरीत जेजुरीगड दसरा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला भारिपचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी एकाच व्यासपीठावर आले होते. महामेळाव्याला राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते आले होते.अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मनुवादी विचारसरणी बहुजनांचा विचार करूच शकत नाही.

बहुजनांवर वर्चस्व टिकवण्यासाठीच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यासारख्या विचारवंतांच्या हत्या केल्या जात आहेत. जातीजातींमध्ये भांडणे लावली जात आहेत. याचबरोबर राज्यातील बहुजनवर्ग दुष्काळात होरपळतोय पण त्यांना दुष्काळ जाहीर करावयाचा नाही.खासदार राजू शेट्टी म्हणाले, सत्तेत येण्यापूर्वी तत्कालीन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीसांनी बारामतीच्या मेळाव्यात सत्तेत आल्यास धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना आता या आश्वासनाचा विसर पडला आहे. आरक्षणाचे भूत खेळवत ठेवले जात आहे. राज्यातील संविधानप्रेमींनी एकाच व्यासपीठावर यायला हवे तरच परिवर्तन होईल.

यशवंत क्रांती सेनेचे अध्यक्ष नवनाथ पडळकर यांनी जेजुरीत जेजुरीगड दसरा महामेळावयाचे आयोजन केले होते. यावेळी राज्यभरातील धनगर समाजाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यभरातून आलेले धनगर व बहुजन एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी वंचितांची सत्ता आणण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर