शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

वर्चस्व टिकवण्यासाठी विचारवंतांच्या हत्या- अॅड. प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 15:15 IST

वंचित समाजावर वर्चस्व टिकवण्यासाठीच विचारवंतांच्या हत्या केल्या जात असल्याचा आरोप भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जेजुरीत केला आहे.

जेजुरी : वंचित समाजावर वर्चस्व टिकवण्यासाठीच विचारवंतांच्या हत्या केल्या जात असल्याचा आरोप भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जेजुरीत केला आहे. हिटलरशाही आणण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जात आहे. वंचित समाजाने वेळीच सावध होऊन एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. येथील पालखी तळावर समस्त धनगर समाज व बहुजन समाजाच्या वतीने जेजुरीत जेजुरीगड दसरा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला भारिपचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी एकाच व्यासपीठावर आले होते. महामेळाव्याला राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते आले होते.अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मनुवादी विचारसरणी बहुजनांचा विचार करूच शकत नाही.

बहुजनांवर वर्चस्व टिकवण्यासाठीच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यासारख्या विचारवंतांच्या हत्या केल्या जात आहेत. जातीजातींमध्ये भांडणे लावली जात आहेत. याचबरोबर राज्यातील बहुजनवर्ग दुष्काळात होरपळतोय पण त्यांना दुष्काळ जाहीर करावयाचा नाही.खासदार राजू शेट्टी म्हणाले, सत्तेत येण्यापूर्वी तत्कालीन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीसांनी बारामतीच्या मेळाव्यात सत्तेत आल्यास धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना आता या आश्वासनाचा विसर पडला आहे. आरक्षणाचे भूत खेळवत ठेवले जात आहे. राज्यातील संविधानप्रेमींनी एकाच व्यासपीठावर यायला हवे तरच परिवर्तन होईल.

यशवंत क्रांती सेनेचे अध्यक्ष नवनाथ पडळकर यांनी जेजुरीत जेजुरीगड दसरा महामेळावयाचे आयोजन केले होते. यावेळी राज्यभरातील धनगर समाजाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यभरातून आलेले धनगर व बहुजन एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी वंचितांची सत्ता आणण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर