शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

बांधकाम व्यावसायिकांना पालिकेच्या पायघड्या

By admin | Updated: February 19, 2015 01:04 IST

शहराच्या विकासाऐवजी बड्या बांधकाम व्यावसायिकांचाच विकास साधण्याचा धक्कादायक प्रकार महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात केल्याचे उघडकीस आले आहे.

पुणे : शहराच्या विकासाऐवजी बड्या बांधकाम व्यावसायिकांचाच विकास साधण्याचा धक्कादायक प्रकार महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात केल्याचे उघडकीस आले आहे. नियोजन समितीतील शासकीय सदस्यांनीच हा प्रकार उघडकीस आणला असून, मुळापर्यंत जाण्याची लेखी मागणी नियोजन अहवालात केली आहे. संगमवाडी परिसरातील शेती झोन म्हणून असलेली ही जागा चक्क निवासी करण्यात आली आहे. या ठिकाणी महापालिकेच्या खर्चाने सुनियोजित पद्धतीने रस्ते आणि उद्यानाचे आरक्षणही टाकण्यात आले आहे.संगमवाडीत नदीच्या बाजूने असलेल्या या जागेत प्रस्तावित करण्यात आलेले रस्ते जणू एखाद्या बड्या टाऊनशिपसाठी निर्माण केले असल्याचे दिसून येत आहे. सुमारे २२ ते २३ एकर जागेवर हे नियोजन करण्यात आले आहे. विकास आराखडा तयार करताना, महापालिकेने केलेल्या प्रत्यक्ष जागावापरमध्ये (एक्झिस्टिंग लँड यूज) या जागेवर शेती झोन होता. मात्र, महापालिका प्रशासनाकडून ही सर्व जागा निवासी करण्यात आली. त्यातील मध्यभागात उद्यानाचे आरक्षण दर्शवीत त्या इतर जागेत नियोजनबद्ध वर्तुळाकार पद्धतीने रस्ते आखण्यात आले आहे. संपूर्ण विकास आराखड्यात कोठेही अशा प्रकारे रस्ते तसेच निवासी झोन प्रस्तावित करण्यात आलेला नाही. विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या या प्रकाराची गंभीर दखल आराखड्यावर आलेल्या हरकती आणि सूचनांची सुनावणी घेणाऱ्या नियोजन समितीमधील सदस्यांनी घेतली आहे. या समितीमध्ये असलेले शासननियुक्त सदस्य सारंग यादवाडकर, अख्तर चौहान तसेच सचिन पुणेकर यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, संगमवाडी परिसरात एका जागेत अत्यंत वेगळ्या प्रकारचे रस्ते आढळून आले आहेत. ते महापालिकेने मान्य केलेल्या ले-आऊटप्रमाणे आहेत. हा जागावापराचा प्रकार विकास आराखड्यात एका खासगी संस्थेसाठी दर्शविण्यात आला आहे. या प्रकाराची तपासणी होणे आवश्यक असून, त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. याशिवाय ही शेतीची जागा महापालिकेने टीपी स्किमप्रमाणे विकसित करावी. त्यामुळे ती लवकर आणि परिणामकारकपणे विकसित होईल, अशी शिफारसही केली आहे. या अहवालाची प्रत सर्व नगरसेवकांनाही देण्यात आली आहे. प्रत्यक्ष जागावापरात गंभीर चुका प्रत्यक्ष जागावापरात गंभीर चुका असल्याचा आक्षेप या तीन सदस्यांनी घेतला आहे. त्यात सध्याचे रस्ते आणि नदीपात्र योग्य पद्धतीने दाखविलेले नाही. राजाराम पूल गायब असणे, अस्तित्वातील रस्ते १५.९९ टक्के असताना ते प्रत्यक्ष १३.६६ टक्के दाखविले आहेत. याशिवाय डोंगरउतार-डोंगरमाथ्याचे क्षेत्रही अस्तित्वातील वापर व भविष्यातील वापरात कमी दाखविण्यात आले आहे.निकष आणि मार्गदर्शक तत्त्वांना हरताळआरक्षणांची संख्या घटविण्यात आल्याचे या समितीच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यात शहरात आणखी ११८ प्राथमिक शाळा आवश्यक असताना, त्यासाठी २८ जागा आरक्षित केल्या आहेत. २१६ माध्यमिक शाळांची आवश्यकता असताना, २९ शाळांचीच आरक्षणे प्रस्तावित केली आहेत. ३७ पोलीस ठाणी आवश्यक असताना, त्यासाठी तीनच जागा प्रस्तावित आहेत.