शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

आग्य्राहून सुटका स्मरणदिनाचा निधी महापालिकेने रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 00:51 IST

औरंगजेब बादशहाच्या कैदेतून महत्प्रयासाने निसटून थेट आग्ऱ्याहून कष्टप्रद प्रवास करत राजगडावर छत्रपती शिवाजी महाराज पोहोचले

- राजू इनामदारपुणे : औरंगजेब बादशहाच्या कैदेतून महत्प्रयासाने निसटून थेट आग्ऱ्याहून कष्टप्रद प्रवास करत राजगडावर छत्रपती शिवाजी महाराज पोहोचले, तो दिवस (१६ डिसेंबर) शिवप्रेमींच्या वतीने गेले अनेक वर्षे राजगडावर साजरा करण्यात येतो. या उत्सवाला करत असलेली आर्थिक मदत महापालिकेने गेल्या दोन वर्षांपासून थांबवली आहे.यामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे.महापालिका निवडणुकांच्या आधी थेट सिंहगडावर जाऊन छत्रपतींचे आशीर्वाद घेत सत्तेवर आलेले भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारीही यावर काही करायला तयार नाहीत. राजगड स्मारक मंडळाच्या वतीने हा उत्सव साजरा करण्यात येतो. पुण्यातून त्यासाठी १४ डिसेंबरला महाराजांची पालखी काढण्यात येते. ती १५ डिसेंबरला रात्री राजगडाच्या पायथ्याशी पाली गावात पोहोचते. त्या संपूर्ण रात्री गड जागवण्यात येतो. पहाटे पालखी गडाच्या पहिल्या दरवाजात नेण्यात येते. तिथून ती गडावरच्या पद्मावती देवीच्या दर्शनाला जाते. मग सदरेवर आणण्यात येते. तिथे भाषणे होऊन महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण करण्यात येते.या उत्सवाला पालिकेने सर्वप्रथम सन १९८० मध्ये ३० हजार रुपयांची मदत केली. बरीच वर्षे ती सुरू होती. त्यात वाढही करण्यात येत होती. दोन वर्षांपूर्वीपर्यंत २ लाख रुपये यासाठी देण्यात येत होते. मागील वर्षी प्रशासनातील एका अधिकाºयाने हे काम निविदा काढूनच करणे आवश्यक आहे, असे मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगितले. महापालिका निविदा प्रसिद्ध करेल, तुम्ही निविदा भरा, असा सल्लाही त्यांनी दिला. मंडळाच्या कार्यकर्त्यांना निविदावगैरे माहिती नव्हती.त्यांनी दुर्लक्ष केले व ती मदत काही मिळाली नाही.यंदा त्यांनी आर्थिक मदतीसाठी संपर्क साधला. त्या वेळी त्यांना उच्च न्यायालयाच्या एका आदेशाची माहिती देण्यात आली. मुंबईत सांस्कृतिक कार्यक्रमांवर म्हणून तीनच दिवसांत २ कोटी रुपये खर्च केले. त्याविरोधात काही स्वयंसेवी संस्थांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याचा निर्णय देताना न्यायालयाने महापालिकांनी अशा कार्यक्रमांवर उधळपट्टी करू नये असा आदेश दिला. राज्य सरकारने तोच आदेश सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठवला. त्याचाच आधार घेत महापालिकेने विविध नागरी पुरस्कार तर थांबवलेच; पण छत्रपतींच्या पराक्रमांचे स्मरण करणाºया या उत्सवाचा निधीही थांबवला.

राज्य सरकारकडे दाद मागणारमहापालिका २ लाख रुपयांचा निधी या कार्यक्रमासाठी देत होती. त्यासाठीची सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. विशेष ठराव करण्यात आला होता. निविदा जाहीर करू, ती भरा असे मागील वर्षी सांगण्यात आले. आता या वर्षी उच्च न्यायालयाचा आदेश दाखवण्यात आला. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवते. आम्ही आता राज्य सरकारकडून कायमस्वरूपी निधी मिळावा किंवा त्यांनी महापालिकेला तसे आदेश करावेत यासाठी प्रयत्न करत आहोत.- उदय जोशी, माजी नगरसेवक, पदाधिकारी राजगड स्मारक मंडळ