शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

MPSC: एमपीएससीचा महत्त्वाचा निर्णय! यापुढील पदभरती 'या' तीन कंपन्यांमार्फतच होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 20:09 IST

यापूर्वी वर्ष २०१७ पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत नसलेल्या पदाची पदभरती ओएमआर पध्दतीने करण्यात येत होती...

पुणे : ओएमआर बेस्ड खासगी कंपन्यांचे काम मंगळवारी अधिकृतरित्या काढून घेण्याचा राज्य शासनाने निर्णय जाहीर केला आहे. यापुढे राज्य शासकीय भरती फक्त आयबीपीएस, टीसीएस आणि एमकेसीएल मार्फत होतील असा अध्यादेश राज्य शासनाने मंगळवारी जाहीर केला आहे. तसेच पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी सध्या असलेल्या कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्यात आले आहे. गट 'क' आणि गट 'ड' परीक्षेसाठी निवडल्या गेलेल्या लेखी पेपर लिहिल्या नंतर विध्यार्थ्यांना एक कार्बन कॉपी मिळते त्यालाच ओएमआर (Opetical mark Recogntion) असे म्हणतात.

विविध विभागांसाठी परीक्षा पद्धती निश्चित करणे, अटी व शर्ती निश्चित करणे व कार्यपद्धती निश्चित करणे या सर्व बाबी सामान्य प्रशासन विभागाशी निगडीत असल्यामुळे संबंधित विभागांना सामान्य प्रशासन विभागांशी सल्लामसलत करून त्यांच्या गरजेनुसार सदर बाबी अंतिम करता येतील. यापूर्वी वर्ष २०१७ पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत नसलेल्या पदाची पदभरती ओएमआर पध्दतीने करण्यात येत होती.

तसेच या पदभरतीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया परीक्षेचे निकाल, तसेच शिफारस झालेल्या/न झालेल्या उमेदवारांच्या याद्या संकेतस्थळावर जाहीर करणे, इ. तथा परीक्षा शुल्क सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रक नुसार विहित करण्यात आलेले आहेत. या अटी/शर्तीमध्ये कोणतीही सुधारणा करावयाची झाल्यास याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून निर्णय घेण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

आजचा शासन निर्णय हे एमपीएससी समन्वय समितीच्या आंदोलनाचे फलीत आहे. सरळसेवा परीक्षा एमपीएससीकडे द्यावे ही आमची मागणी कायम असली तरी आयबीपीएस आणि टीसीएस या दोन्ही संस्था विश्वासार्ह आहेत. या शासन निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. परंतु, यात निवड झालेली एमकेसीएल या कंपनीवर आमचा विश्वास नाही. इतिहासात या कंपनीने केलेल्या चुका जगजाहीर आहे. त्यामुळे एमकेसीएलला या प्रक्रियेतून वगळावे ही मागणी आम्ही करणार आहोत. यापुढे होणाऱ्या भरती प्रक्रियेत प्रामाणिक विद्यार्थीच नोकरीवर लागण्याची शक्यता आहे.- महेश घरबुडे, एमपीएससी समन्वय समिती

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडexamपरीक्षा