शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

एमपीएससी परीक्षार्थीच्या आत्महत्येने संताप; ‘एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’ म्हणत घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 07:20 IST

स्वप्निल २०१९ च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे त्याची मुलाखत झाली नव्हती. त्याबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न मिळाल्याच्या तणावातून स्वप्निल सुनील लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने राज्यात सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. स्पर्धा परीक्षां देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून रोष व्यक्त केला जात आहे. (MPSC examinee's suicide MPSC is magic, don't fall into it he said)स्वप्निलने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ‘एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’ असे म्हटले आहे. स्वप्निलने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली होती. स्वप्निलचे आईवडील हे नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडेचार वाजता घरी आली. तेव्हा स्वप्निलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.स्वप्निल २०१९ च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे त्याची मुलाखत झाली नव्हती. त्याबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्वपरीक्षा तो उत्तीर्ण झाला होता. कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या ‘सुसाईड नोट’वरून दिसून येत आहे.

मराठा आरक्षण व कोरोनामुळे एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा सुमारे दोन वर्षांपासून पुढे ढकलल्या जात आहेत. मात्र, ग्रामीण भागातून येऊन प्रसंगी एक वेळ उपाशी राहून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनस्थितीवर परिणाम झाला आहे. विद्यार्थी नैराश्यात गेले आहेत.

...त्याशिवाय सरकारला जाग येणार नाहीसरकारला माझा तळतळाट लागणार आहे. एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी. त्याशिवाय त्यांना मुलगा जाण्याचे दुःख काय असते हे कळणार नाही, असा हंबरडा फोडत स्वप्नीलची आई छाया लोणकर यांनी दुःख व्यक्त केले. ''गेली दोन वर्षे कोणतीच परीक्षा झाली नाही. विद्यार्थी आता हतबल झाले आहेत. विद्यार्थ्यांना नैराश्य आले आहे. त्यामुळे सरकारला आता तरी जाग आली पाहिजे. आमच्यावर जे संकट आले आहे… ते इतर कुणावर येऊ नये”, असे स्वप्नीलचे कुटुंबीय म्हणाले.

चुकीच्या धोरणाचा बळीशासनाने स्पर्धा परीक्षांबाबत घेतलेल्या चुकीच्या धोरणामुळेच स्वप्निल या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचा बळी गेला. त्यामुळे शासनाने आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध प्रलंबित परीक्षा तत्काळ घ्याव्यात. तसेच राज्यसेवा व इतर परीक्षांमधून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह विविध विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांने केलेली आत्महत्या ही दुर्दैवी घटना घडली असून वेळेवर परीक्षा न घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्याचे वातावरण आहे. त्यामुळे अशा घटना पुन्हा होऊ नये,यासाठी एमपीएससीने यूपीएससी प्रमाणे नियोजन करून परीक्षा घ्याव्यात.     - संध्या सोनवणे, विद्यार्थिनी, स्पर्धा परीक्षा,२०१९ मध्ये जाहिरात आलेली गट ब ची परीक्षा ५ - ६ वेळेस पुढे ढकलण्यात आली. अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुलांना आयोगाच्या कारभारामुळे आणि आर्थिक अडचणीमुळे आपल्या स्वप्नांचा त्याग करावा लागत आहे. संयुक्त पूर्व परीक्षांची तारीख, रखडलेल्या सर्व परीक्षांचे आणि नवीन जाहिरातीचे वेळापत्रक लवकरच जाहीर करावे.- राम लेंडेवाड, विद्यार्थी,स्पर्धा परीक्षा

समिती स्थापन होणारस्वप्निल लोणकर या तरूणाच्या आत्महत्येचे तीव्र पडसाद राज्यात उमटले. रविवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. परीक्षा झाल्यानंतर निवडीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर विलंब कसा टाळता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय झाला.  

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार