शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी परीक्षार्थीच्या आत्महत्येने संताप; ‘एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’ म्हणत घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 07:20 IST

स्वप्निल २०१९ च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे त्याची मुलाखत झाली नव्हती. त्याबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न मिळाल्याच्या तणावातून स्वप्निल सुनील लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने राज्यात सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. स्पर्धा परीक्षां देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून रोष व्यक्त केला जात आहे. (MPSC examinee's suicide MPSC is magic, don't fall into it he said)स्वप्निलने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ‘एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’ असे म्हटले आहे. स्वप्निलने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली होती. स्वप्निलचे आईवडील हे नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडेचार वाजता घरी आली. तेव्हा स्वप्निलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.स्वप्निल २०१९ च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे त्याची मुलाखत झाली नव्हती. त्याबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्वपरीक्षा तो उत्तीर्ण झाला होता. कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या ‘सुसाईड नोट’वरून दिसून येत आहे.

मराठा आरक्षण व कोरोनामुळे एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा सुमारे दोन वर्षांपासून पुढे ढकलल्या जात आहेत. मात्र, ग्रामीण भागातून येऊन प्रसंगी एक वेळ उपाशी राहून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनस्थितीवर परिणाम झाला आहे. विद्यार्थी नैराश्यात गेले आहेत.

...त्याशिवाय सरकारला जाग येणार नाहीसरकारला माझा तळतळाट लागणार आहे. एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी. त्याशिवाय त्यांना मुलगा जाण्याचे दुःख काय असते हे कळणार नाही, असा हंबरडा फोडत स्वप्नीलची आई छाया लोणकर यांनी दुःख व्यक्त केले. ''गेली दोन वर्षे कोणतीच परीक्षा झाली नाही. विद्यार्थी आता हतबल झाले आहेत. विद्यार्थ्यांना नैराश्य आले आहे. त्यामुळे सरकारला आता तरी जाग आली पाहिजे. आमच्यावर जे संकट आले आहे… ते इतर कुणावर येऊ नये”, असे स्वप्नीलचे कुटुंबीय म्हणाले.

चुकीच्या धोरणाचा बळीशासनाने स्पर्धा परीक्षांबाबत घेतलेल्या चुकीच्या धोरणामुळेच स्वप्निल या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचा बळी गेला. त्यामुळे शासनाने आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध प्रलंबित परीक्षा तत्काळ घ्याव्यात. तसेच राज्यसेवा व इतर परीक्षांमधून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह विविध विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांने केलेली आत्महत्या ही दुर्दैवी घटना घडली असून वेळेवर परीक्षा न घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्याचे वातावरण आहे. त्यामुळे अशा घटना पुन्हा होऊ नये,यासाठी एमपीएससीने यूपीएससी प्रमाणे नियोजन करून परीक्षा घ्याव्यात.     - संध्या सोनवणे, विद्यार्थिनी, स्पर्धा परीक्षा,२०१९ मध्ये जाहिरात आलेली गट ब ची परीक्षा ५ - ६ वेळेस पुढे ढकलण्यात आली. अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुलांना आयोगाच्या कारभारामुळे आणि आर्थिक अडचणीमुळे आपल्या स्वप्नांचा त्याग करावा लागत आहे. संयुक्त पूर्व परीक्षांची तारीख, रखडलेल्या सर्व परीक्षांचे आणि नवीन जाहिरातीचे वेळापत्रक लवकरच जाहीर करावे.- राम लेंडेवाड, विद्यार्थी,स्पर्धा परीक्षा

समिती स्थापन होणारस्वप्निल लोणकर या तरूणाच्या आत्महत्येचे तीव्र पडसाद राज्यात उमटले. रविवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. परीक्षा झाल्यानंतर निवडीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर विलंब कसा टाळता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय झाला.  

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार