शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
4
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
5
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
6
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
7
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
8
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
9
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
10
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
11
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
12
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
13
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
14
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
15
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
16
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
17
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
18
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
19
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
20
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार

MPSC: परीक्षार्थींपाठोपाठ राज्यमंत्री बच्चू कडू यांचीही MPSC ला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 19:18 IST

बच्चू कडूंनी लिहलेल्या पत्रामध्ये राज्यात होत असलेल्या महत्त्वाच्या परीक्षा एमपीएससीमार्फत आयोजित करण्याची मागणी केली आहे

पुणे: मागील काही दिवसांपासून आरोग्य भरतीवरून राज्यात मोठा गोंधळ माजला होता. या गोंधळामुळे पहिल्यांदा या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. नंतर या परीक्षा राज्यभरात झाल्या, पण काही ठिकाणी काही प्रमाणात पुन्हा गोंधळ दिसला होता. अशा परीक्षांच्या नियोनातील अभावामुळे राज्यातील लाखों परीक्षार्थींचे भवितव्य टांगणीला लागले आहे. आता राज्य शासकीय सेवेतील सर्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महामंडळ यातील अराजपत्रित गट-ब व गट-क पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे राबवावी, अशी मागणी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पत्र लिहून मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांनीही राज्यातील इतर विभागातील भरती एमपीएससीतून करावी अशी मागणी केली आहे.  

बच्चू कडूंनी लिहलेल्या पत्रामध्ये राज्यात होत असलेल्या महत्त्वाच्या परीक्षा एमपीएससीमार्फत आयोजित करण्याची मागणी केली आहे. सद्यस्थितीत राज्य शासनात सुमारे चार ते पाच लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यामध्ये दरवर्षी २-३६ सेवा निवृत्तांची भर पडते. गेल्या ७ ते ८ वर्षात नोकरभरती कमालीची रोडावली असून, रिक्त पदांमुळे प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे. प्रशासकीय व्यवस्था बळकट करण्यासाठी ही रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. तथापि, गुणवत्ताधारक योग्य उमेदवारांची निवड विश्वासार्ह अशा घटनादत्त स्वायत्त संस्थेकडून होणे अपेक्षित असताना, वादग्रस्त अशा बाह्य यंत्रणेद्वारे भरती प्रक्रिया राबविली जाते. ही बाब गुणात्मक प्रशासनाला बाधा पोहचणारी आहे, असा उल्लेख मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात राज्यमंत्री बच्चू कडूंनी केला आहे. 

अलीकडील वृत्तांकने तसेच विविध संघटना यांची निवेदने यावरून राज्य शासनाने पदभरतीसाठी निवडलेल्या बाह्य कंपन्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे. या बाबींमध्ये जर तथ्य असेल तर शासकीय नोकरीच्या स्वप्नपूर्तीसाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावून कष्ट करणाऱ्या लाखो गुणवत्ताधारक उमेदवारांचा भ्रमनिरास होईल, अशी चिंता राज्यमंत्री कडू यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षा