शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

खासदार साहेब, काेथरूड भागातील NDA टेकडी, बीडीपीकडे दुर्लक्ष नकाे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 10:35 IST

जिजाईनगर परिसरात जवळपास १५ ते २० सोसायट्या आणि ८०० फ्लॅट आहेत. या भागात एनडी टेकडीला जोडून असलेल्या बायो डायव्हर्सिटी पार्कच्या (बीडीपी) आरक्षित क्षेत्रात टेकडी फोडून प्लॉटिंग आणि पक्की बहुमजली इमारतींचे बांधकामे होत आहेत...

पुणे : गेल्या दीड वर्षापासून कोथरूड परिसरातील जिजाईनगर भागातील एनडीए टेकडीला जोडून असलेल्या बायो-डायव्हर्सिटी पार्कच्या (बीडीपी) आरक्षित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध टेकडीफोड, वृक्षतोड आणि अनधिकृत बांधकामे होत आहेत. अनेक मोठी झाडे तोडण्यात आली आहेत. या सगळ्याचा परिसराच्या आणि एकूणच पुणे शहराच्या पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहे, यासंदर्भात परिसरातील जागरूक नागरिकांनी पुणे महापालिकेचे आजी आणि माजी आयुक्त तसेच अतिक्रमण विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून तक्रार केली आहे. वारंवार तक्रारीनंतरही हे प्रकार थांबले नाहीत. उलट बांधकामे वाढली. त्यावर त्वरित कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा जिजाईनगर कोथरूड रहिवासी संघाने दिला आहे.

जिजाईनगर परिसरात जवळपास १५ ते २० सोसायट्या आणि ८०० फ्लॅट आहेत. या भागात एनडी टेकडीला जोडून असलेल्या बायो डायव्हर्सिटी पार्कच्या (बीडीपी) आरक्षित क्षेत्रात टेकडी फोडून प्लॉटिंग आणि पक्की बहुमजली इमारतींचे बांधकामे होत आहेत. या इमारती अनधिकृत असूनही पाणीपुरवठा व वीजजोडणी देण्यात आली आहे. भर उन्हाळ्यात पालिकेचे पाणी बांधकामासाठी वापरून प्रचंड प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करण्यात आला आहे. कोणतीही ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई न केल्यामुळे या गैरप्रकारांना प्रोत्साहनच मिळत आहे. हे सर्व मागील दीड वर्षापासून बिनदिक्कतपणे सुरू असून, महापालिका प्रशासनाने याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसते.

प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या बीडीपी संकल्पनेचाच पूर्णपणे बोजवारा उडाला असून हा परिसर अत्यंत विद्रूप बनत चालला आहे. हे सर्व कोणाच्या ‘आशीर्वादा’ने होत आहे, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक करीत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यामध्ये लक्ष घालून हा प्रकार त्वरित थांबवावा आणि उभी राहिलेली अतिक्रमणे तातडीने जमीनदोस्त करून बीडीपी क्षेत्राचे आणि पुण्याच्या पर्यावरणाचे रक्षण करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. यापूर्वी आंबेगाव, बावधन, खराडी अशा अनेक भागांत बहुमजली अनधिकृत बांधकामे पुणे महानगरपालिकेकडून पाडण्यात आली आहेत; पण कोथरूड भागाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याची टीका होत आहे. पुण्याच्या नवनिर्वाचित लोकसभा खासदारांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Puneपुणेmurlidhar moholमुरलीधर मोहोळEnchroachmentअतिक्रमण