शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

खासदार साहेब, काेथरूड भागातील NDA टेकडी, बीडीपीकडे दुर्लक्ष नकाे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 10:35 IST

जिजाईनगर परिसरात जवळपास १५ ते २० सोसायट्या आणि ८०० फ्लॅट आहेत. या भागात एनडी टेकडीला जोडून असलेल्या बायो डायव्हर्सिटी पार्कच्या (बीडीपी) आरक्षित क्षेत्रात टेकडी फोडून प्लॉटिंग आणि पक्की बहुमजली इमारतींचे बांधकामे होत आहेत...

पुणे : गेल्या दीड वर्षापासून कोथरूड परिसरातील जिजाईनगर भागातील एनडीए टेकडीला जोडून असलेल्या बायो-डायव्हर्सिटी पार्कच्या (बीडीपी) आरक्षित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध टेकडीफोड, वृक्षतोड आणि अनधिकृत बांधकामे होत आहेत. अनेक मोठी झाडे तोडण्यात आली आहेत. या सगळ्याचा परिसराच्या आणि एकूणच पुणे शहराच्या पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहे, यासंदर्भात परिसरातील जागरूक नागरिकांनी पुणे महापालिकेचे आजी आणि माजी आयुक्त तसेच अतिक्रमण विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून तक्रार केली आहे. वारंवार तक्रारीनंतरही हे प्रकार थांबले नाहीत. उलट बांधकामे वाढली. त्यावर त्वरित कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा जिजाईनगर कोथरूड रहिवासी संघाने दिला आहे.

जिजाईनगर परिसरात जवळपास १५ ते २० सोसायट्या आणि ८०० फ्लॅट आहेत. या भागात एनडी टेकडीला जोडून असलेल्या बायो डायव्हर्सिटी पार्कच्या (बीडीपी) आरक्षित क्षेत्रात टेकडी फोडून प्लॉटिंग आणि पक्की बहुमजली इमारतींचे बांधकामे होत आहेत. या इमारती अनधिकृत असूनही पाणीपुरवठा व वीजजोडणी देण्यात आली आहे. भर उन्हाळ्यात पालिकेचे पाणी बांधकामासाठी वापरून प्रचंड प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करण्यात आला आहे. कोणतीही ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई न केल्यामुळे या गैरप्रकारांना प्रोत्साहनच मिळत आहे. हे सर्व मागील दीड वर्षापासून बिनदिक्कतपणे सुरू असून, महापालिका प्रशासनाने याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसते.

प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या बीडीपी संकल्पनेचाच पूर्णपणे बोजवारा उडाला असून हा परिसर अत्यंत विद्रूप बनत चालला आहे. हे सर्व कोणाच्या ‘आशीर्वादा’ने होत आहे, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक करीत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यामध्ये लक्ष घालून हा प्रकार त्वरित थांबवावा आणि उभी राहिलेली अतिक्रमणे तातडीने जमीनदोस्त करून बीडीपी क्षेत्राचे आणि पुण्याच्या पर्यावरणाचे रक्षण करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. यापूर्वी आंबेगाव, बावधन, खराडी अशा अनेक भागांत बहुमजली अनधिकृत बांधकामे पुणे महानगरपालिकेकडून पाडण्यात आली आहेत; पण कोथरूड भागाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याची टीका होत आहे. पुण्याच्या नवनिर्वाचित लोकसभा खासदारांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Puneपुणेmurlidhar moholमुरलीधर मोहोळEnchroachmentअतिक्रमण