शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

एमआयटीच्या प्रांगणात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 19:23 IST

एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील जगविख्यात घुमटामध्ये जगातील संत, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ यांचे ५४ पुतळे बसवण्यात आले आहेत. मात्र,छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या घुमटामध्ये बसवण्यात आलेला नाही.

ठळक मुद्देएमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वारावर ‘जनआक्रोश आंदोलन’ मोर्चा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय असल्याने तरुण पिढी या आंदोलनात खुपच सक्रिय महाराजांचा ब्रॉन्झचा पुतळा लवकरात लवकर बसवण्यात येईल असे आश्वासन

लोणी काळभोर : एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रॉन्झचा पुतळा लवकरात लवकर बसवण्यात येईल असे आश्वासन एमआयटी शिक्षण संस्थेचे मंगेश कराड यांनी दिल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आयोजित केलेले आंदोलन स्थगित करण्यात आले.एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात एक जगविख्यात घुमट तयार करण्यात आला आहे.२ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी या घुमटाचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या घुमटामध्ये जगातील संत, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ यांचे ५४ पुतळे बसवण्यात आले आहेत.मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या घुमटामध्ये बसवण्यात आलेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये एक प्रकारची नाराजी निर्माण झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.    छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सन्मान कृती समितीच्या माध्यमातून गेले काही दिवस हवेली तालुक्याच्या पुर्व भागातील बहुतेक सर्व गावांमध्ये बैठका घेऊन जनजागृती करण्यात येत होती. त्यानुसार आज महाराष्ट्र बॅकेपासून एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वारावर ‘जनआक्रोश आंदोलन’ मोर्चा काढण्यात येणार होता. या मोर्चाच्या प्रारंभाच्या ठिकाणी येऊन मंगेश कराड यांनी मोर्चेकरी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. व त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना ते म्हणाले , छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचेच आराध्य दैवत आहेत. एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रांझचा पुतळा बसवण्यात येईल. .............छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय असल्याने तरुण पिढी या आंदोलनात खुपच सक्रिय होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत होते. वातावरणात एक अनामिक तणाव होता. परंतु, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड व लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी आपला अनुभव पणाला लावून परिस्थिती अतिशय कौशल्याने हाताळली. त्या बद्दल ते दोघे व संपूर्ण पोलीस प्रशासन कौतुकास पात्र आहेत. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरmitएमआयटीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज