शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

एमआयटीच्या प्रांगणात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 19:23 IST

एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील जगविख्यात घुमटामध्ये जगातील संत, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ यांचे ५४ पुतळे बसवण्यात आले आहेत. मात्र,छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या घुमटामध्ये बसवण्यात आलेला नाही.

ठळक मुद्देएमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वारावर ‘जनआक्रोश आंदोलन’ मोर्चा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय असल्याने तरुण पिढी या आंदोलनात खुपच सक्रिय महाराजांचा ब्रॉन्झचा पुतळा लवकरात लवकर बसवण्यात येईल असे आश्वासन

लोणी काळभोर : एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रॉन्झचा पुतळा लवकरात लवकर बसवण्यात येईल असे आश्वासन एमआयटी शिक्षण संस्थेचे मंगेश कराड यांनी दिल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आयोजित केलेले आंदोलन स्थगित करण्यात आले.एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात एक जगविख्यात घुमट तयार करण्यात आला आहे.२ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी या घुमटाचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या घुमटामध्ये जगातील संत, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ यांचे ५४ पुतळे बसवण्यात आले आहेत.मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या घुमटामध्ये बसवण्यात आलेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये एक प्रकारची नाराजी निर्माण झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.    छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सन्मान कृती समितीच्या माध्यमातून गेले काही दिवस हवेली तालुक्याच्या पुर्व भागातील बहुतेक सर्व गावांमध्ये बैठका घेऊन जनजागृती करण्यात येत होती. त्यानुसार आज महाराष्ट्र बॅकेपासून एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वारावर ‘जनआक्रोश आंदोलन’ मोर्चा काढण्यात येणार होता. या मोर्चाच्या प्रारंभाच्या ठिकाणी येऊन मंगेश कराड यांनी मोर्चेकरी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. व त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना ते म्हणाले , छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचेच आराध्य दैवत आहेत. एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रांझचा पुतळा बसवण्यात येईल. .............छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय असल्याने तरुण पिढी या आंदोलनात खुपच सक्रिय होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत होते. वातावरणात एक अनामिक तणाव होता. परंतु, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड व लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी आपला अनुभव पणाला लावून परिस्थिती अतिशय कौशल्याने हाताळली. त्या बद्दल ते दोघे व संपूर्ण पोलीस प्रशासन कौतुकास पात्र आहेत. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरmitएमआयटीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज