शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ईव्हीएम मशिनविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 3:55 AM

काँग्रेस, राष्ट्रवादीचा पुण्यात नारा : आंदोलन करून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी

पुणे : ‘ईव्हीएम हटाओ, लोकशाही बचाओ’ अशा घोषणा देत ईव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, या मागणीसाठी शहर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसपक्षातर्फे पुणे स्टेशन परिसरातील आंबेडकर पुतळ्याजवळ शनिवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार व राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार जयदेव गायकवाड, माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादीचे प्रवक्ता अंकुश काकडे, नगरसेवक व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.गेल्या काही निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार करण्यात आले आहेत, असा आरोप सर्वच विरोधी पक्षांकडून करण्यात आला. त्यामुळे ईव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरचा वापर करावा, अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले.कर्नाटकच्या निवडणुकीतही ईव्हीएमचा घोळ झाल्याचे समोर आले आहे, असा आरोप करून वंदना चव्हाण म्हणाल्या, ईव्हीएममधील गडबडीमुळे एका मतदार संघातील निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी ईव्हीएमविरोधात आंदोलन पुकारले आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतही ईव्हीएमचा घोळ झाल्याचे समोर आले होते. जेवढे मतदान झाले तेवढीच मते मशिनमध्ये मोजली गेली पाहिजेत. मात्र, अनेक ठिकाणी मतमोजणीत घोळ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ईव्हीएम व्यवस्थित चालत नसल्याचे दिसून येते. लोकशाहीचा महत्त्वाचा भाग असलेले प्रत्येक नागरिकाचे मत हे मोजताना ग्राह्य धरले पाहिजे, तरच नागरिकांचा लोकशाहीवर विश्वास बसेल. त्यामुळे यापुढील काळात ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे.रमेश बागवे म्हणाले, ईव्हीएममध्ये छेडछाड होत असल्याची नागरिकांना शंका आहे. सर्वप्रथम भाजपाचे किरीट सोमय्या आणि सुब्रमण्यम स्वामी यांनीच ईव्हीएमवर आक्षेप घेतला होता. तसेच ईव्हीएमचा शोध लावणाऱ्या देशातही आता ईव्हीएमद्वारे आता मतदान घेतले जात नाही. तसेच जगातील अनेक प्रगत देशांमध्ये ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच मतदान घेतले जाते. परिणामी ईव्हीएममध्ये घोळ होत असल्याचे वारंवार समोर आल्याने ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच मतदान घेण्यात यावे.सत्तेसाठी भाजपाकडून लोकशाहीचा खूनकाँग्रेस व जनता दल सेक्युलर या दोन पक्षांची एकूण ११५ आमदार व दोन अपक्ष, असे दोन्ही पक्षांचे मिळून एकूण ११७ आमदार होत असताना कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाला आमंत्रित केले. त्यांनी संसदीय लोकशाहीचा खून केला. याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने देशात लोकशाहीचा काळा दिवस म्हणून धरणे आंदोलन केले. शहर काँग्रेसच्या वतीने बेलबाग चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, अ‍ॅड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिरोळे, गटनेते अरविंद शिंदे, अजित दरेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Electionनिवडणूक