शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

कात्रज घाटावरील डोंगररांगेत भीषण वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:13 IST

पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील कात्रज घाटावरील डोंगररांगेमध्ये बुधवारी रात्री वणवा लागला. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने ही आग वेगाने पसरत ...

पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील कात्रज घाटावरील डोंगररांगेमध्ये बुधवारी रात्री वणवा लागला. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने ही आग वेगाने पसरत गेली. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धावले. तसेच पुणे महानगर विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या अग्निशामक दलाचे दोन बंब तत्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. परंतु, डोंगरांची उंची पाहता तिथपर्यंत वाहने पोचू शकली नाहीत. जवानांनी वनविभागाच्या मदतीने झाडांच्या फांद्या तोडून ही आग विझविण्याचा प्रयत्न चालविला होता.

वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साधारणपणे साडेआठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान कात्रज घाटातील बोगद्याच्या वरच्या डोंगरांमध्ये आग लागली. सध्या डोंगरांवरील गवत आणि झाडोरा वाळलेला असल्याने घर्षणामुळे आग लागू शकते, असे सांगण्यात आले. ही आग रात्रीच्या अंधारात लांबूनही दिसत होती. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने झपाट्याने आग पसरत चालली होती. याबाबत काही नागरिकांनी छायाचित्रे आणि व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित करून सोशल मीडियावर पाठविले.

याबाबत वनविभागाला माहिती समजताच उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी संबंधित क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांना घटनास्थळी रवाना केले. दरम्यान, हे क्षेत्र खासगी मालकी क्षेत्र असल्याचे तसेच ते वन क्षेत्र नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. ही हद्द पीएमआरडीएची असल्याने त्यांनाही माहिती कळविण्यात आली. पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी दोन बंबांसह १५ जवान घटनास्थळी रवाना केले. डोंगराच्या खाली उभ्या करण्यात आलेली ही वाहने वर जाऊ शकली नाहीत. तसेच, या वाहनांमधील पाण्याचे पाईपही वरपर्यंत नेता आले नाहीत.

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने अग्निशामक दलाचे जवान डोंगर चढत वर गेले. झाडांच्या आणि झुडपांच्या ओल्या फांद्या तोडून आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. आग वेगाने पसरत चालल्याने आणखी मनुष्यबळ मागविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याची ही कसरत सुरू होती. हे क्षेत्र वन विभागाचे होते की नव्हते, या आगीमध्ये वन्य जीव होरपळले आहेत काय हे रात्रीच्या अंधारात समजत नव्हते. आग विझल्यानंतर दिवसाउजेडीच याबाबत समजू शकेल असे अग्निशामन अधिकारी सुजीत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.