शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देशातील बहुतांश विमानतळे तोट्यात, २५ विमानतळांचे खासगीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 10:03 IST

नवी मुंबईसह २५ विमानतळांचे खासगीकरण

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : कोविडनंतर वाहतूक वाढल्याने २०२३-२५ या कालावधीत नागपूरसह आणखी २५ विमानतळांचे खासगीकरण करण्याचा सरकारचा विचार आहे. दहा ग्रीनफिल्ड विमानतळांपैकी दुर्गापूर, कन्नूर, सिंधुदुर्ग आणि मोपा संबंधित राज्य सरकारांनी खासगी विकासकांच्या मदतीने विकसित केले आहेत. जेवर, भोगापुरम, नवी मुंबई, कराईकल आणि डबरा येथील नवीन ग्रीनफिल्ड विमानतळांचा विकासदेखील खासगी ऑपरेटर्सना देण्यात येत आहे.देशातील विमानतळांची संख्या गेल्या नऊ वर्षात दुप्पट करण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेऊ शकतात. नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे शेतकऱ्यांसाठी किसान उडान सुरू करण्याचा विचार करत आहेत. परंतु, पुणे, कोलकाता आणि गोवा तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) नियंत्रणाखालील १२४ विमानतळांपैकी बहुतांश विमानतळांना गेल्या पाच वर्षांपासून मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. 

एएआयचा गेल्या पाच वर्षातील तोटा ५२८५ कोटी रुपयांचा आहे. या काळात पुणे (महाराष्ट्र), कोलकाता (पश्चिम बंगाल) आणि गोवा यांनी नफा कमावला नसता तर तोटा गगनाला भिडला असता. २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये कोविड महामारीमुळे ही तीन विमानतळेही तोट्यात होती. या विमानतळांनी १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२० दरम्यान प्रचंड नफा कमावला.

अकोला, जळगाव, जुहू, कोल्हापूर आणि सोलापूरसह एएआयकडून चालवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व  विमानतळांना सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे. तिरूपती, अमृतसर, चंदीगड, हैदराबाद, जोधपूर, शिमला, श्रीनगर आणि यांसारखी काही लोकप्रिय पर्यटन स्थळांचा विमान प्रवास गेल्या पाच वर्षांपासून तोट्यात आहे. २०१८-२०२० मध्ये नफा कमावल्यानंतर २०२०-२१ मध्ये १४ खासगी विमानतळांनादेखील १८४७ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेAirportविमानतळ