अवयवदानाबाबत जनजागृतीची अधिक गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST2021-07-20T04:09:25+5:302021-07-20T04:09:25+5:30
डॉ. अंबिके म्हणाले, ‘अवयवदानाच्या प्रक्रियेसाठी आपल्याकडे पुरेशा पायाभूत सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, यंत्रणा उपलब्ध आहे. मात्र, सध्या जनजागृतीची मोठ्या प्रमाणात ...

अवयवदानाबाबत जनजागृतीची अधिक गरज
डॉ. अंबिके म्हणाले, ‘अवयवदानाच्या प्रक्रियेसाठी आपल्याकडे पुरेशा पायाभूत सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, यंत्रणा उपलब्ध आहे. मात्र, सध्या जनजागृतीची मोठ्या प्रमाणात गरज आहे. दाता आणि रुग्ण अशा दोन्ही बाजूंमध्ये ही जागृती आवश्यक आहे.’
डॉ. शिंपी म्हणाले, ‘अवयव प्रत्यारोपणानंतर सामान्य आयुष्य जगता येईल का, याबाबत हयात दाते आणि प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेले रुग्ण यांच्यामध्ये अनेक शंका असतात. त्यांच्या मनातील गैैरसमज दूर व्हावेत, यासाठी माहितीचे योग्य स्त्रोत आणि जनजागृती गरजेची आहे.’
आरती गोखले यांनी अवयवदानाची प्रक्रिया, त्यातील झेडटीसीसीची भूमिका याबाबत माहिती दिली. पत्नीच्या निधनानंतर तीनच महिन्यांमध्ये राहुल जोशी यांनी घेतलेल्या या पुढाकाराची त्यांनी प्रशंसा केली. मंजू फडके यांनी अवयवदानाच्या जनजागृतीसाठी रोटरी क्लबने घेतलेल्या पुढाकाराची माहिती दिली. रोटरीच्या माध्यमातून अवयवदानाबाबत २२,३११ लोकांनी शपथ घेतल्याचे त्यांनी सांगितले. निरुपमा यांनी चर्चासत्राचे निवेदन केले.
नेहा जोशी यांचे किडनीच्या विकारामुळे निधन झाले. आयुष्यातील अवघड काळालाही सकारात्मकतेने सामोरे जाण्याच्या पत्नीच्या दृष्टिकोनामुळे जोशी यांनी स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. कार्यक्रमप्रसंगी विश्वस्त शोभा जोशी, राहुल जोशी यांच्यासह स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मीनू अगरवाल उपस्थित होते. सविता पटवर्धन आणि योगिनी जोशी यांनी सूत्रसंचालन केले.