शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

पावसाळापूर्व सफाईची कामे अपूर्णच , ५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 06:50 IST

दरवर्षी पावसाळा नियमितपणे येतो; मात्र महापालिकेची पावसाळीपूर्व स्वच्छतेची कामे नियमित होत नाहीत. तीसुद्धा पावसाळ्याप्रमाणेच वेळापत्रक ठरवून त्याचवेळेत पूर्ण झाली पाहिजेत

पुणे : दरवर्षी पावसाळा नियमितपणे येतो; मात्र महापालिकेची पावसाळीपूर्व स्वच्छतेची कामे नियमित होत नाहीत. तीसुद्धा पावसाळ्याप्रमाणेच वेळापत्रक ठरवून त्याचवेळेत पूर्ण झाली पाहिजेत. ५ जूननंतर शहरात नाले किंवा गटारी सफाईचे एकही काम शिल्लक राहू नये असे आदेश महापालिका आयुक्त सौरव राव यांनी दिले.राव यांनी आपल्या कार्यालयात पावसाळीपूर्व कामांचा संपूर्ण शहराचा क्षेत्रीय कार्यालयनिहाय आढावा घेतला. अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली, राजेंद्र निंबाळकर, घनकचरा विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप, ज्ञानेश्वर मोळक, माधव जगताप, उमेश माळी, माधव देशपांडे, संध्या गागरे, आपत्ती निवारण कक्षाचे प्रमुख गणेश सोनुने; तसेच विविध विभागांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते.सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील एकूण नदी, नाले व त्यांची किती स्वच्छता झाली याची माहिती दिली. अनेक ठिकाणची कामे अपुरी असल्याचे त्यावरून लक्षात आले. काही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील कामे व्यवस्थित सुरू असल्याची माहिती देण्यात आली. पावसाळा दरवर्षी येतो,त्याचप्रमाणे नियमितपणे पावसाळापूर्व कामेही झाली पाहिजेत. त्याला विलंब होता कामा नये.पाऊस जोराचा झाला तर पाणीकुठे साचते, कुठे वाहते, कोणत्या वसाहती धोक्यात येतात याचीसर्व माहिती त्या त्या क्षेत्रीय कार्यालयाकडे असणे गरजेचे आहे. त्यानुसार कामे ठरवून ती पावसाळा सुरू होण्यापूर्वीच संपतील याची काळजी अधिकाºयांनी घ्यायला हवी, असे आयुक्त म्हणाले.धरणातून पाण्याचा विसर्ग कधी सोडतात त्याची पूर्वकल्पना महापालिकेला दिली जाते आहे किंवा नाही, याकडे लक्ष ठेवण्याची सूचना आयुक्तांनी केली. आपत्ती व्यवस्थापन विभागातील कामकाजाचीही माहिती त्यांनी घेतली. हा विभाग कायम सज्ज असावा, त्यांच्याकडे सर्व खात्यांनी त्यांची माहिती द्यावी, एखाद्या आपत्तीत या विभागाचा निरोप आला की, त्या खात्याने त्यांच्याकडे सोपवलेली जबाबदारी पार पाडली पाहिजे. या कामात समन्वय ठेवणे गरजेचे आहे असे आयुक्तांनी सांगितले.पाणी साचल्याच्या किंवा पाणी वसाहतीमध्ये शिरण्याचा धोका निर्माण झाल्यास तसे होण्याआधीच प्रशासनाला त्याची माहिती असायला हवी. तसे होण्यापूर्वीच त्या विभागातील नागरिकांना धोक्याच्या सूचना दिल्या जाव्यात, त्यासाठी सोशल मीडिया; तसेच आकाशवाणीसारख्या प्रसार माध्यमांचा वापर करावा असे आयुक्तांनी सांगितले.नाले, गटारी, ओढे; तसेच पाणी वाहून नेणाºया जागा स्वच्छ झाल्या, तर पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होतो, आपत्तीचे प्रसंग येत नाहीत त्यामुळे या काळात सर्व विभागप्रमुखांनी सतर्क राहावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. ५ जूननंतर एकही काम शिल्लक राहता कामा नये असे त्यांनी अधिकाºयांना बजावले.दरवर्षी महापालिका प्रशासनाच्या वतीने आपत्ती निवारण आराखडा प्रसिद्ध करण्यात येतो. यावर्षी तो अद्याप तयारच झालेला नाही अशी माहिती मिळाली. येत्या आठ दिवसांत सर्व विभागांच्या अधिकारी व त्यांच्या दूरध्वनीक्रमांकांसह, मदत केंद्रांच्या नावांसह हा आराखडा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.