शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिन्यांवर होणार कोट्यवधींचा चुराडा; पुणे महापालिका प्रशासनाचे मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 15:57 IST

समान पाणी योजनेत शहरातील १ हजार ७०० किलोमीटर अंतराच्या जलवाहिन्या बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते, मात्र एक ते दोन वर्षांपूर्वीच बदलण्यात आलेल्या जलवाहिन्यांचे काय करणार, याविषयी प्रशासन काहीच बोलायचा तयार नाही.

ठळक मुद्देनगरसेवकांकडून त्यांच्या प्रभागातील जलवाहिन्या बदलण्याची खर्चिक कामे सुरू, प्रशासनाचे दुर्लक्षराष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे यांनी मागवला प्रशासनाकडून अहवाल

पुणे : समान पाणी योजनेत शहरातील १ हजार ७०० किलोमीटर अंतराच्या जलवाहिन्या बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते, मात्र एक ते दोन वर्षांपूर्वीच बदलण्यात आलेल्या जलवाहिन्यांचे काय करणार, याविषयी प्रशासन काहीच बोलायचा तयार नाही. योजनेचे प्रत्यक्ष काम सुरू व्हायला आता काही महिन्यांचाच अवधी राहिलेला असतानाही नगरसेवकांकडून त्यांच्या प्रभागातील जलवाहिन्या बदलण्याची खर्चिक कामे सुरू आहेत, व प्रशासनही त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.ही कामे प्रत्येक नगरसेवकाची १० ते २० लाख रूपये अशी लहान दिसतात, मात्र अशा काही नगरसेवकांची कामे एकत्र केली तर ती कोट्यवधी रूपयांची होतात. २४ तास पाणी योजनेत सर्व जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत, त्यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च केला जाणार आहे, तर मग ही लहानलहान कामे करण्यात प्रशासन व नगरसेवकही का रस दाखवत आहे, याविषयी प्रशासनाकडून मौन बाळगण्यात येत आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे यांनी सर्वसाधारण सभेत जाहिरपणे हा प्रश्न उपस्थित केला, मात्र त्याकडे ना प्रशासनाने लक्ष दिले ना पदाधिकार्‍यांनी. तुपे यांनी आता प्रशासनाकडून याबाबतचा अहवालच मागवला आहे.तब्बल १ हजार ८०० कोटी रूपये फक्त जलवाहिन्या बदलण्याच्या कामासाठी लागणार आहेत. संपूर्ण शहरातील सध्या वापरात असलेल्या जलवाहिन्या काढून टाकून नव्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या योजनेसाठी म्हणून शहराचे जवळपास ३५८ भाग करण्यात आले आहेत. प्रत्येक भागात साधारण दीड ते दोन हजार नळजोड असतील. मुख्य वाहिनी, त्याला जोड वाहिन्या, त्यावरून ग्राहकांपर्यंत वाहिनी व त्यावर नळ, यातील मुख्य वाहिनीला व ग्राहकाच्या वाहिनीला मीटर असेल. त्यावर किती पाणी दिले व किती वापरले गेले याची नोंद होईल. त्या नोंदींवरून ग्राहकांना बील पाठवले जाईल. हे काम किमान एक ते दोन वर्ष सुरू राहणार आहे.सध्या वापरात असलेल्या जलवाहिन्या जुन्या आहेत, त्यांना वारंवार गळती लागते. त्यामुळे त्या बदलण्यासाठी नगरसेवकांकडून प्रस्ताव देण्यात येतात. नागरिकांची तशी मागणी असते. गेल्या दोन ते तीन वर्षात हे प्रमाण वाढले आहे. प्राथमिक अंदाजानुसार या एका कामावर महापालिकेने आतापर्यंत कोट्यवधी रूपयांचा खर्च केला आहे. एकदा जलवाहिनी बदलली की किमान २५ वर्षे तरी चालावी असे अपेक्षित असते. नगरसेवकांचे प्रस्ताव पाहिले असता गेल्या काही वर्षात शहरातील बहुतेक भागांमध्ये जलवाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. उपनगरांशिवाय मध्यभागात म्हणजे पेठांमध्येही हे प्रमाण बरेच आहे. या चांगल्या असलेल्या, नुकत्याच टाकलेल्या जलवाहिन्यांचे काय करणार याविषयी प्रशासनाने खुलासा करावा अशी मागणी तुपे यांनी केली आहे.यापूर्वी रस्त्यांवर एलईडी दिवे बसवतानाही जुन्या चांगल्या दिव्यांचे काय करणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. ते सर्व दिवे ठेकेदाराला मिळाले असल्याची चर्चा आहे. शहरातील ७० हजार पथदिवे बदलून तिथे एलईडी दिवे टाकण्यात आले होते. आताही जलवाहिन्या बदलण्याचे काम ठेकेदारामार्फतच करून घेण्यात येणार आहे. जुन्या जलवाहिन्यांची रस्त्यांमधील नेमकी जागा शोधून टाकण्यात आल्या आहेत. नव्या टाकतानाही त्या तिथेच टाकाव्या लागणार आहेत. त्यावेळी जुन्या चांगल्या असलेल्या जलवाहिन्या आहे तशाच राहू दिल्या तर ठेकेदाराचा त्यात फायदा होणार आहे, असे काही नगरसेवकांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणी