शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Prithviraj Chavan: भागवत, भाजप फॅसिस्ट, हिटलर त्यांची प्रेरणा; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

By राजू इनामदार | Updated: December 2, 2024 20:31 IST

भागवतांच्या तीन मुले जन्माला घाला या त्यांच्या विचारावर काय बोलणार अशी टीकाही त्यांनी भागवत यांच्यावर केली

पुणे: मोहन भागवत, भारतीय जनता पक्ष हे फॅसिस्ट आहेत, हिटलर ही त्यांची प्रेरणा आहे, त्यामुळे समाज वाचवायचा असेल तर तीन मुले जन्माला घाला या त्यांच्या विचारावर काय बोलणार अशी थेट टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संघ व भाजप यांच्यावर केली. रशियातही लोकशाही आहे, तिथे ९९ टक्के मतदान होते, आपली वाटचालही तिकडेच सुरू आहे असे ते म्हणाले.

पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांबरोबर बोलताना चव्हाण यांनी भाजपला लक्ष्य करत त्यांच्यावर शरसंधान केले. ते म्हणाले, मोहन भागवत यांनी केलेले आवाहन त्यांच्या विचारसरणीला योग्य आहे. ‘हम दो हमारे दो’ हा आपला विचार आहे. देशाने आता १४० कोटी लोकसंख्येची मर्यादाही पार केली आहे. अशा स्थितीत कोणीही असा विचार करणार नाही, मात्र ते करतात. याचे कारण हिटलर त्यांची प्रेरणा आहे. देशात खरोखरच लोकशाही आहे का असा प्रश्न त्यांनी केला.

जगातील सर्व देश आता बॅलटजगातील सर्व देश पेपरवरच मतदान घेतात. याचे कारण इलेक्ट्रॉनिक यंत्रांमधून डेटा घालवता येतो. मी आता नाही तर यापूर्वीही यंत्रांबद्दल बोललो आहे. तपासणी करून काहीही होत नाही, कारण यंत्रात जमा झालेला सर्व डेटा नष्ट करता येतो. बॅलेट पेपरवर ते शक्य होत नाही. त्यामुळेच मी मागणी केली आहे की व्हीव्हीपॅट मधील सर्व चिठ्ठ्यांची मोजणी करावी. आधीची आकडेवारी व ही आकडेवारी जुळली नाही की नक्की काय झाले ते लक्षात येईल. मात्र आयोग तसे करू देत नाही.

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अनेक चांगले निर्णय दिले. या देशातील लोकशाही बळकट करणारा निर्णय देणे मात्र त्यांनी टाळले. आमदारांची अपात्रता व अन्य खटले त्यांच्यासमोर होते. सुनावणी झाली होती. खटला निकालावार होता. विधानसभेची मुदत संपणार आहे हेही चंद्रचुड यांना माहिती होते. तरीही त्यांनी निकाल देणे टाळले. लोकशाही राज्यव्यवस्था बळकट करण्याची संधी त्यांना होती, मात्र त्यांनी घालवली अशी टीका चव्हाण यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMohan Bhagwatमोहन भागवतcongressकाँग्रेसBJPभाजपाrussiaरशियाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ