शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मोदीजी..तुम्ही कठोर निर्णय घ्या..सैन्याला लागणारी मदत गोळा करण्यास आम्ही सुरुवात केलीय..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 16:28 IST

पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले तसेच असंख्य जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देगणेश बोरा यांनी या जवानांच्या कुटुंबियांसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा मदत निधी उभारण्याचे काम केले सुरु

पिंपरी (रावेत) : पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले तसेच असंख्य जखमी झाले आहेत. ही घटना वाचून,ऐकून आणि पाहून हृदय पिळवटणार नाही असा एकही माणूस भारतात सापडणार नाही. या संकटानंतर देशभर सर्वत्र सहानुभूतीची आणि दु:खाची लाट पसरली. शहीद झालेल्या सर्व जवानांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पण भारत देशाचे नागरिक म्हणून आपली एवढीच जबाबदारी आहे का? मनातील खदखद कुठेतरी व्यक्त झाली म्हणजे आपले कर्तव्य संपणार आहे का ? या प्रश्नांची उत्तर सोशल मीडियावरील तरुणांनी शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून एक भारतीय नागरिक म्हणून राष्ट्रीय सुरक्षा निधीसाठी आर्थिक मदत करण्याचे अनोखे कार्य उभे राहिले. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे गणेश बोरा यांनी या जवानांच्या कुटुंबियांसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा मदत निधी उभारण्याचे काम हाती घेतले . या कार्यात प्रत्येक देशभक्त आणि सामाजिक भान जागृत असणाऱ्या भारतीयाने आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे असे आवाहन गणेश बोरा यांनी  केले होते. काल राष्ट्रीय सुरक्षा निधीसाठी स्वत: पासून त्यांनी सुरवात करत ५०० रुपये निधी दिला आणि सोशल मीडियामधुन आवाहन केले होते की सर्वांनी निधी दयावा ज्यामुळे  पंतप्रधानांना पाकिस्तान आणि दहशतवाद विरोधी युद्धात निधी कमी पडण्याची चिंता वाटणार नाही आणि ते कठोर पाऊले उचलण्यास मागे हटणार नाहीत या आव्हानाला कालपासून असख्य नेटिझनसनी मोठया प्रमाणात प्रतिसाद देत आपल्या आपल्या परीने मदत करण्यास सुरुवात केली आहे. कुणाचे प्राण वाचवण्यासाठी प्राण त्यागणे याच्या इतका निस्सीम त्याग अन्य कोणत्याही गोष्टीत नाही. म्हणूनच असा त्याग करणार-या भारतीय जवानांच्या कुटुंबियांना आणि युद्ध जन्य परिस्थिती निर्माण झाली तर देशाला निधी कमी पडू नये या करिता आपापल्या परीने मदत करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. या भावनेतून सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे गणेश बोरा यांनी या जवानांच्या कुटुंबियांसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा मदत निधी उभारण्याचे काम हाती घेतले ल्लाि. ndf. gov.in या वेबसाईटवर जाऊन आपण आॅनलाईन पैसे देऊ शकतो शिवाय दिलेल्या निधीला आयकरात सवलत मिळते. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडravetरावेतIndian Armyभारतीय जवानNarendra Modiनरेंद्र मोदीSocial Mediaसोशल मीडियाpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला