शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
3
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
4
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
5
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
6
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
7
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
8
Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
9
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
10
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
12
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
13
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
14
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
15
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
16
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
17
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
18
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
19
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
20
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारमुळेच देशातील शेतमालाचे अर्थशास्त्र संकटात, पवारांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 21:24 IST

पुरंदर तालुक्यातील सासवड इथे आयोजित शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहून शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला

पुणे - राज्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. अवकाळीमुळे अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्धवस्त झाले आहेत, त्यामुळेच आत्महत्येचं प्रमाणही वाढत आहे. त्यावरुन, माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. तसेच, मोदी सरकारच्या शेतमाल आयात-निर्यातीच्या धोरणामुळे देशातील शेतीमालाचे अर्थशास्त्र संकटात आले आहे, त्यास भाजप सरकारच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं. 

पुरंदर तालुक्यातील सासवड इथे आयोजित शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहून शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. संपूर्ण देशात कोणता वर्ग अस्वस्थ आहे हा प्रश्न विचारला तर अनेक लोक पुढे येतात. पण देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम आज कशामुळे होतोय आणि देशात आत्महत्येसारख्या संकटामध्ये कोणता वर्ग आहे पाहिले तर शेतकऱ्यांचा विचार पुढे येतो. शेतकरी आज अडचणीत आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये गेलो असता तिथल्या शेतकरी मेळाव्याला भेट दिली. तिथे सोयाबीन, कपाशी तसेच अन्य पीके घेत असताना अवकाळी पाऊस, गारपिट झाली आणि हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाले. यामुळे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. निसर्गाचा लहरीपणा तुमच्या-माझ्या हातात नाही. नैसर्गिक संकट आल्यास संकटग्रस्त माणसाला त्यातून बाहेर काढणे ही सरकारची जबाबदारी असते. मध्य प्रदेश सरकार आणि महाराष्ट्र सरकारने या कामाकडे लक्ष दिले नसल्याने शेतकरी आत्महत्या करतोय. काळ्या आईशी इमान राखणाऱ्या बळीराजावर आत्महत्या करण्याचे संकट राज्यात आणि देशात ठिकठिकाणी येत आहे, यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणती नाही, असे म्हणत शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. 

भाजपामुळेच शेतमालाचं अर्थशास्त्र संकटात

नाशिक जिल्ह्यातही गारपिटीने, पावसाने टोमॅटो, द्राक्ष, कांद्यासारखी अनेक पीकं शेतकऱ्यांच्या हातून गेली. विदर्भात सोयाबीन आणि कापसाचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. याचे पंचनामे झाल्याचे सरकारने सांगितले, तरीही तिथे अजूनही मदतीचा पत्ता नाही. अशा संकटग्रस्तांना मदत नाही. दुसऱ्या बाजूला शेतमालाच्या किमती पडल्या आहेत. माल निर्यात करण्याची आवश्यकता आहे. त्यावर बंदी घालण्यात आली. परदेशातून माल याठिकाणी आयात करण्याची परवानगी दिली. त्याचा परिणाम म्हणून शेतीमालाचे अर्थशास्त्र संकटात आले. त्याची पूर्ण जबाबदारी भाजप सरकारवर आहे. त्यामुळे जे सरकार शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत नाही आणि देशातील बहुसंख्य लोकांच्या हिताची जपणूक करत नाही अशा सरकारला सत्तेत बसण्याचा अधिकार नाही. हा निकाल आपण घेतला पाहिजे. त्यासाठी आपण जागे होण्याची गरज आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbaiमुंबई